शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
5
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
6
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
7
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
8
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
9
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
10
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
11
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
12
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
13
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
14
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
15
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
16
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
17
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
18
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
19
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
20
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार

समुद्रात अडकलेल्या २२ बोटी परतल्या; कोस्टगार्डची २ जहाजे, हेलिकॉप्टरच्या मदतीने शोध मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 08:09 IST

कोळीवाड्यातील चिंता दूर

मीरा रोड : वादळी पाऊस व खवळलेल्या समुद्रात असलेल्या भाईंदरच्या उत्तन-चौक भागातील सुमारे २२ बोटी बुधवारी सकाळपर्यंत किनाऱ्यावर परतल्या आहेत. काही बोटींशी संपर्क होत नसल्याने कोळीवाड्यात चिंतेचे वातावरण होते. कोस्टगार्डने दाेन जहाज व हेलिकॉप्टरच्या मदतीने बोटींना शोधण्यासाठी मोहीम राबवली होती. मासेमारीसाठी गेलेल्या २२ मच्छीमार बोटी समुद्रात असल्याने त्या किनाऱ्याकडे परतण्याची प्रतीक्षा मच्छीमार करत होते. त्यातच काही बोटींशी संपर्क होत नव्हता.

बोटीवर गेलेल्या मच्छीमारांच्या कुटुंबातील महिलांनी मंगळवारी मच्छीमार संस्थांच्या कार्यालयात गर्दी केली. समुद्रात गेलेल्या नाखवांचा संपर्क होत नसल्याने कोळी महिला चिंता व्यक्त करत होत्या. त्यामुळे मच्छीमार संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी समुद्रातून परत न आलेल्या बोटींची माहिती घेण्यास सुरुवात केली. उत्तन मच्छीमार सहकारी संस्थेच्या एकूण पाच बोटी, डोंगरी चौक सोसायटीच्या १६ व पाली उत्तन मच्छीमार सोसायटीची एक अशा एकूण २२ बोटी मंगळवारी दुपारपर्यंत समुद्रात अडकून होत्या. त्यातील काही बोटींचा संपर्क होत नव्हता. 

उत्तन भागातील बोटी समुद्रात अडकल्या असल्याने अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी मत्स्य विभाग, कोस्टगार्ड आदींना कळवल्यावर मंगळवारी तातडीने कोस्टगार्डने दाेन जहाज व एक हेलिकॉप्टरने समुद्रात बोटींची शोध मोहीम सुरू केली.  त्यावेळी उत्तन बंदरापासून खोल समुद्रात काही बोटी आढळल्या. मंगळवारी व बुधवारी सकाळपर्यंत सर्व बोटी किनाऱ्याला सुखरूप आल्याचे मच्छीमार नेते बर्नड डिमेलो यांनी सांगितले.

 डिझेल, किराणा, मजुरीचे माेठे नुकसान  

डोंगरी-चौक संस्थेच्या १० बोटी मंगळवारी रात्री उशिरा व ६ बोटी बुधवारी सकाळी किनाऱ्याजवळ आल्या, असे संस्थेच्या विल्यम गोविंद यांच्याकडून सांगण्यात आले. मासेमारीसाठी गेलेल्या अनेक बोटींना वादळी पावसामुळे रिकाम्या हाताने परतावे लागल्याने त्यांच्या डिझेल, किराणा, बर्फ, खलाशांची मजुरी आदींचे मोठे नुकसान झाले आहे, असे विल्यम म्हणाले.

टॅग्स :Fishermanमच्छीमारRainपाऊसMira Bhayanderमीरा-भाईंदर