शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
3
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
4
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
5
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
6
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
7
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
8
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
9
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
10
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
11
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
12
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
13
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
14
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
15
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
16
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
17
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
18
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
19
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

समुद्रात अडकलेल्या २२ बोटी परतल्या; कोस्टगार्डची २ जहाजे, हेलिकॉप्टरच्या मदतीने शोध मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 08:09 IST

कोळीवाड्यातील चिंता दूर

मीरा रोड : वादळी पाऊस व खवळलेल्या समुद्रात असलेल्या भाईंदरच्या उत्तन-चौक भागातील सुमारे २२ बोटी बुधवारी सकाळपर्यंत किनाऱ्यावर परतल्या आहेत. काही बोटींशी संपर्क होत नसल्याने कोळीवाड्यात चिंतेचे वातावरण होते. कोस्टगार्डने दाेन जहाज व हेलिकॉप्टरच्या मदतीने बोटींना शोधण्यासाठी मोहीम राबवली होती. मासेमारीसाठी गेलेल्या २२ मच्छीमार बोटी समुद्रात असल्याने त्या किनाऱ्याकडे परतण्याची प्रतीक्षा मच्छीमार करत होते. त्यातच काही बोटींशी संपर्क होत नव्हता.

बोटीवर गेलेल्या मच्छीमारांच्या कुटुंबातील महिलांनी मंगळवारी मच्छीमार संस्थांच्या कार्यालयात गर्दी केली. समुद्रात गेलेल्या नाखवांचा संपर्क होत नसल्याने कोळी महिला चिंता व्यक्त करत होत्या. त्यामुळे मच्छीमार संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी समुद्रातून परत न आलेल्या बोटींची माहिती घेण्यास सुरुवात केली. उत्तन मच्छीमार सहकारी संस्थेच्या एकूण पाच बोटी, डोंगरी चौक सोसायटीच्या १६ व पाली उत्तन मच्छीमार सोसायटीची एक अशा एकूण २२ बोटी मंगळवारी दुपारपर्यंत समुद्रात अडकून होत्या. त्यातील काही बोटींचा संपर्क होत नव्हता. 

उत्तन भागातील बोटी समुद्रात अडकल्या असल्याने अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी मत्स्य विभाग, कोस्टगार्ड आदींना कळवल्यावर मंगळवारी तातडीने कोस्टगार्डने दाेन जहाज व एक हेलिकॉप्टरने समुद्रात बोटींची शोध मोहीम सुरू केली.  त्यावेळी उत्तन बंदरापासून खोल समुद्रात काही बोटी आढळल्या. मंगळवारी व बुधवारी सकाळपर्यंत सर्व बोटी किनाऱ्याला सुखरूप आल्याचे मच्छीमार नेते बर्नड डिमेलो यांनी सांगितले.

 डिझेल, किराणा, मजुरीचे माेठे नुकसान  

डोंगरी-चौक संस्थेच्या १० बोटी मंगळवारी रात्री उशिरा व ६ बोटी बुधवारी सकाळी किनाऱ्याजवळ आल्या, असे संस्थेच्या विल्यम गोविंद यांच्याकडून सांगण्यात आले. मासेमारीसाठी गेलेल्या अनेक बोटींना वादळी पावसामुळे रिकाम्या हाताने परतावे लागल्याने त्यांच्या डिझेल, किराणा, बर्फ, खलाशांची मजुरी आदींचे मोठे नुकसान झाले आहे, असे विल्यम म्हणाले.

टॅग्स :Fishermanमच्छीमारRainपाऊसMira Bhayanderमीरा-भाईंदर