शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

‘तानसा’चे १९ दरवाजे उघडले; शहापूरात २ घरांचे नुकसान, गावांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 09:07 IST

तानसा धरणाचे १९ दरवाजे उघडून तीन हजार ३१५ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. 

ठाणे : जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी दिवसभर पावसाचा जोर वाढला होता. शुक्रवारी सकाळपासून दुपारी १ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३२.३ मि.मी. पाऊस नोंदवला गेला असून आतापर्यंत एकूण ५८५ मि.मी. (७७ टक्के) पाऊस पडला आहे. शहापूरमध्ये एक घर कोसळले असून अन्य घटनेत घराच्या भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या. मात्र, सुदैवाने दिवसभरात जिल्ह्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच, तानसा धरणाचे १९ दरवाजे उघडण्यात आल्याने आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.शहापूर तालुक्यातील सोगाव येथील लक्ष्मण कचरू यांचे कच्चे बांधकाम असलेले घर शुक्रवारी पावसात कोसळले. तसेच गणेश महादू वाघ, (रा. वेहळोली बुद्रुक) यांच्या घराची एक भिंत पावसामुळे कोसळली असून दुसऱ्या भिंतीला तडा गेला. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, खबरदारीच्या उपाययोजना म्हणून तानसा धरणाचे १९ दरवाजे उघडून तीन हजार ३१५ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. 

कोणतीही जीवितहानी नाहीअशाच प्रकारे भातसा, अपर वैतरणा, मोडकसागर आणि मध्य वैतरणा धरणांचे दरवाजेही उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात पावसामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.

काळू नदी, उल्हास नदी इशारा पातळीच्या उंबरठ्यावरजिल्ह्यात पडणाऱ्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, उपनगरीय रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याने रेल्वे प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दुपारी शाळा सुटत असताना सतत पडणाऱ्या पावसामुळे शालेय विद्यार्थ्यांनाही अडचणींना सामोरे जावे लागले आहे. जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. काळू नदी टिटवाळ्याजवळ धोक्याचा इशारा पातळी गाठण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्याचप्रमाणे उल्हास नदीसह जांभूळपाडा, मोहने आणि बदलापूरजवळही नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

टॅग्स :Waterपाणीthaneठाणे