शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

उल्हासनगरात १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक, सोमवारी रवानगी

By सदानंद नाईक | Updated: April 27, 2025 18:41 IST

भारतीय सिंधी सभेच्या पर्यंत्नाने आतापर्यंत १४० सिंधी पाकिस्तानी नागरिकांना भारतीय नागरिकत्व

सदानंद नाईक उल्हासनगर : शॉर्ट टर्म व्हिसावर १७ पाकिस्तानी नागरिक शहरांत वास्तव्यास राहत असल्याची माहिती उघड होऊन त्याला पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी कबुली दिली. पहलगाम दहशदवादी हल्ल्यानंतर त्यांना देश सोडून जाण्याचे फर्मान सरकारने काढल्याने, ते सोमवारी देश सोडून जाणार असल्याचेही गोरे म्हणाले. सर्व १७ पाकिस्तानी नागरिक हे सिंधी समाजाचे आहेत.

फाळणीच्या वेळी विस्थापित झालेला सिंधी समाजाला देशाच्या विविध भागात वसविण्यात आले. उल्हासनगरात वसविण्यात आलेल्या सिंधी समाजाचे अनेक नातेवाईक आजही पाकिस्तान मध्ये आहेत. सण व विविध उत्सावावेळी ते एकत्र येतात. भारतीय सिंधी सभेच्या पर्यंत्नातून आजपर्यंत १४० जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आल्याची माहिती सिंधी अकादमीचे महेश सुखरामनी यांनी दिली. गेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात शहरातील सिंधूभवन मध्ये भारतीय नागरीकत्व देण्यात आलेल्या ६५ सिंधी नागरिकांनाचा सत्कार करण्यात आला होता. शॉर्ट टर्म व्हिसावर आलेल्या १७ सिंधी समाजाच्या पाकिस्तानी नागरिकांना पहलगाम हल्ल्यानंतर देश सोडून जाण्याचे सरकारने आदेश काढले आहे. पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी हे १७ पाकिस्तानी नागरिक २७ व २८ एप्रिल रोजी पाकिस्तान मध्ये जाणार असल्याची माहिती दिली. 

शहरांत राहणाऱ्या बहुतांश सिंधी समाजाचे मूळ गाव पाकिस्तान मधील असून ८० वर्ष वयाच्या नागरिकांचा जन्म पाकिस्तान मधील आहे. एकमेकांचे नातेसंबंध टिकविन्यासाठी पाकिस्तान मधील सिंधी बांधव शहरांत राहत असलेल्या नातेवाईकाना भेटण्यासाठी शॉर्ट टर्म व्हिसा घेऊन येतात. उल्हासनगर मध्ये राहत असलेल्या सिंधी नागरिकांच्या शेती, घरे, दुकाने, नातेवाईक आजही पाकिस्तान मध्ये असल्याच्या आठवणी सांगतात. काही कारणास्तव त्यांचे भाऊ बहीण पाकिस्तान राहिले असून भीतीच्या वातावरणात जीवन जगत असल्याची माहिती देतात. पाकिस्तान मधील शेकडो सिंधी समाजाने भारतीय नागरिकत्व घेतले. भारतीय सिंधू सभा अश्या नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी पुढाकार घेत असल्याची माहिती महेश सुखरामनी यांनी दिली आहे.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानulhasnagarउल्हासनगर