शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

उल्हासनगरात १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक, सोमवारी रवानगी

By सदानंद नाईक | Updated: April 27, 2025 18:41 IST

भारतीय सिंधी सभेच्या पर्यंत्नाने आतापर्यंत १४० सिंधी पाकिस्तानी नागरिकांना भारतीय नागरिकत्व

सदानंद नाईक उल्हासनगर : शॉर्ट टर्म व्हिसावर १७ पाकिस्तानी नागरिक शहरांत वास्तव्यास राहत असल्याची माहिती उघड होऊन त्याला पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी कबुली दिली. पहलगाम दहशदवादी हल्ल्यानंतर त्यांना देश सोडून जाण्याचे फर्मान सरकारने काढल्याने, ते सोमवारी देश सोडून जाणार असल्याचेही गोरे म्हणाले. सर्व १७ पाकिस्तानी नागरिक हे सिंधी समाजाचे आहेत.

फाळणीच्या वेळी विस्थापित झालेला सिंधी समाजाला देशाच्या विविध भागात वसविण्यात आले. उल्हासनगरात वसविण्यात आलेल्या सिंधी समाजाचे अनेक नातेवाईक आजही पाकिस्तान मध्ये आहेत. सण व विविध उत्सावावेळी ते एकत्र येतात. भारतीय सिंधी सभेच्या पर्यंत्नातून आजपर्यंत १४० जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आल्याची माहिती सिंधी अकादमीचे महेश सुखरामनी यांनी दिली. गेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात शहरातील सिंधूभवन मध्ये भारतीय नागरीकत्व देण्यात आलेल्या ६५ सिंधी नागरिकांनाचा सत्कार करण्यात आला होता. शॉर्ट टर्म व्हिसावर आलेल्या १७ सिंधी समाजाच्या पाकिस्तानी नागरिकांना पहलगाम हल्ल्यानंतर देश सोडून जाण्याचे सरकारने आदेश काढले आहे. पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी हे १७ पाकिस्तानी नागरिक २७ व २८ एप्रिल रोजी पाकिस्तान मध्ये जाणार असल्याची माहिती दिली. 

शहरांत राहणाऱ्या बहुतांश सिंधी समाजाचे मूळ गाव पाकिस्तान मधील असून ८० वर्ष वयाच्या नागरिकांचा जन्म पाकिस्तान मधील आहे. एकमेकांचे नातेसंबंध टिकविन्यासाठी पाकिस्तान मधील सिंधी बांधव शहरांत राहत असलेल्या नातेवाईकाना भेटण्यासाठी शॉर्ट टर्म व्हिसा घेऊन येतात. उल्हासनगर मध्ये राहत असलेल्या सिंधी नागरिकांच्या शेती, घरे, दुकाने, नातेवाईक आजही पाकिस्तान मध्ये असल्याच्या आठवणी सांगतात. काही कारणास्तव त्यांचे भाऊ बहीण पाकिस्तान राहिले असून भीतीच्या वातावरणात जीवन जगत असल्याची माहिती देतात. पाकिस्तान मधील शेकडो सिंधी समाजाने भारतीय नागरिकत्व घेतले. भारतीय सिंधू सभा अश्या नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी पुढाकार घेत असल्याची माहिती महेश सुखरामनी यांनी दिली आहे.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानulhasnagarउल्हासनगर