शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
2
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
3
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
4
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
5
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
6
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
7
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
8
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
9
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
10
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
11
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
12
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
13
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
14
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
15
Varlin Panwar : वडील आर्मी ऑफिसर, लेकही होती IAF स्क्वाड्रन लीडर; आता प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सना देतेय ट्रेनिंग
16
वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य
17
IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? अजित आगरकर यांनी असं दिलं उत्तर
18
Rohit Pawar: समविचारी पक्ष सोबत आले तर ठिक, नाही तर...; रोहित पवार स्पष्टच बोलले
19
बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता...
20
Covid-19: चिंता वाढली! कळव्यात २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू

‘अवकाळी’ने १६ जणांचा मृत्यू; १०७ घरांची पडझड!

By सुरेश लोखंडे | Updated: May 23, 2025 10:00 IST

ठाणे जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांत मोठ्या प्रमाणात नुकसान 

सुरेश लोखंडे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांत झालेल्या वादळ वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसामुळे इमारत दुर्घटना, वीज, झाडे पडून १६ जणांचा मृत्यू झाला आहे. गाय, म्हैस अशी तीन पशुधन दगावला आहेत. तसेच इमारतीसह १०७ घरांची पडझड हाेऊन नागरिक बेघर झाले. ३०३ शेतकऱ्यांच्या फळबागा, तृणधान्य आणि भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार गेल्या १५ दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस पडत आहे. ठाण्यासह मुरबाड, शहापूर, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर  या तालुक्यांमधील नागरिकांना विविध समस्यांना ताेंड द्यावे लागले. घरांवरील पत्रे व कौले उडून रहिवाशांचे मोठे नुकसान झाले. कल्याणला पूर्वेला इमारत काेसळून सहा जणांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी कल्याण शहरात रिक्षावर झाड पडून तीन जणांचा मृत्यू झाला होता. 

स्फोटात एक, वीज पडून तिघांचा मृत्यू

शहापूरला शाॅर्टसर्किटमुळे गॅस सिलिंडरच्या स्फाेटात एका व्यक्तीचा तर वीज पडून तीन जणांच्या मृत्यूची नाेंद झाली आहे. ठाणे शहरात झाड पडून एक जण दगावला. मुरबाड तालुक्यात दाेघांवर वीज पडून ते मरण पावले. 

८८ हेक्टरवरील फळबागा, भाजीपाल्यांचे नुकसान 

जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे अंशत: पडझड झालेल्या घरांमध्ये सर्वाधिक ७२  घरे शहापूर तालुक्यामधील आहेत. या खालाेखाल भिवंडी तालुक्यातील २५ घरांची पडझड झाली. कल्याण तालुक्यामधील पाच घरे असून, उल्हासनगर शहरातीलही पाच घरांचे माेठे नुकसान झाले. 

शहापूर तालुक्यात दाेन गायी आणि एक म्हैस दगावली. ३०३ शेतकऱ्यांना तब्बल ८८ हेक्टर शेतजमिनीवरील फळबागा, भाजीपाला, तृणधान्याच्या नुकसानीला ताेंड द्यावे लागले आहे. यामध्ये मुरबाड तालुक्यातील ५६ हेक्टरवरील आंब्याच्या बागांच्या नुकसानीचा १९४ शेतकऱ्यांना फटका बसला. 

शेती नुकसानीमुळे मुरबाडचे ३३ गावांमधील शेतकरी बाधित झाले. भिवंडी तालुक्यामधील ३२ गावांच्या १०२ शेतकऱ्यांना ३२ हेक्टरचे नुकसान झाले. कल्याणमधील चार गावांच्या सात शेतकऱ्यांना तीन हेक्टरवरील शेतीच्या नुकसानीचा फटका बसला. 

टॅग्स :Rainपाऊस