शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
3
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
4
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
5
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
6
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
7
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
8
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
9
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
10
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
11
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

‘अवकाळी’ने १६ जणांचा मृत्यू; १०७ घरांची पडझड!

By सुरेश लोखंडे | Updated: May 23, 2025 10:00 IST

ठाणे जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांत मोठ्या प्रमाणात नुकसान 

सुरेश लोखंडे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांत झालेल्या वादळ वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसामुळे इमारत दुर्घटना, वीज, झाडे पडून १६ जणांचा मृत्यू झाला आहे. गाय, म्हैस अशी तीन पशुधन दगावला आहेत. तसेच इमारतीसह १०७ घरांची पडझड हाेऊन नागरिक बेघर झाले. ३०३ शेतकऱ्यांच्या फळबागा, तृणधान्य आणि भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार गेल्या १५ दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस पडत आहे. ठाण्यासह मुरबाड, शहापूर, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर  या तालुक्यांमधील नागरिकांना विविध समस्यांना ताेंड द्यावे लागले. घरांवरील पत्रे व कौले उडून रहिवाशांचे मोठे नुकसान झाले. कल्याणला पूर्वेला इमारत काेसळून सहा जणांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी कल्याण शहरात रिक्षावर झाड पडून तीन जणांचा मृत्यू झाला होता. 

स्फोटात एक, वीज पडून तिघांचा मृत्यू

शहापूरला शाॅर्टसर्किटमुळे गॅस सिलिंडरच्या स्फाेटात एका व्यक्तीचा तर वीज पडून तीन जणांच्या मृत्यूची नाेंद झाली आहे. ठाणे शहरात झाड पडून एक जण दगावला. मुरबाड तालुक्यात दाेघांवर वीज पडून ते मरण पावले. 

८८ हेक्टरवरील फळबागा, भाजीपाल्यांचे नुकसान 

जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे अंशत: पडझड झालेल्या घरांमध्ये सर्वाधिक ७२  घरे शहापूर तालुक्यामधील आहेत. या खालाेखाल भिवंडी तालुक्यातील २५ घरांची पडझड झाली. कल्याण तालुक्यामधील पाच घरे असून, उल्हासनगर शहरातीलही पाच घरांचे माेठे नुकसान झाले. 

शहापूर तालुक्यात दाेन गायी आणि एक म्हैस दगावली. ३०३ शेतकऱ्यांना तब्बल ८८ हेक्टर शेतजमिनीवरील फळबागा, भाजीपाला, तृणधान्याच्या नुकसानीला ताेंड द्यावे लागले आहे. यामध्ये मुरबाड तालुक्यातील ५६ हेक्टरवरील आंब्याच्या बागांच्या नुकसानीचा १९४ शेतकऱ्यांना फटका बसला. 

शेती नुकसानीमुळे मुरबाडचे ३३ गावांमधील शेतकरी बाधित झाले. भिवंडी तालुक्यामधील ३२ गावांच्या १०२ शेतकऱ्यांना ३२ हेक्टरचे नुकसान झाले. कल्याणमधील चार गावांच्या सात शेतकऱ्यांना तीन हेक्टरवरील शेतीच्या नुकसानीचा फटका बसला. 

टॅग्स :Rainपाऊस