शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

भाजी मंडईतील १५ टक्के गाळे शेतक-यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 5:41 AM

राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिकांच्या क्षेत्रांतील भाजी मंडईतील १५ टक्के गाळे खास शेतक-यांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

नारायण जाधव ।ठाणे : कर्जमाफी, हमीभाव आदी मागण्यांकरिता शेतकरी संघटनांकडून करण्यात येणा-या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी राज्य शासनाने राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिकांच्या क्षेत्रांतील भाजी मंडईतील १५ टक्के गाळे खास शेतक-यांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.‘संतशिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडाबाजार अभियानां’तर्गत नगरविकास विभागाने याबाबतचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले असून राज्य कृषी पणन मंडळाच्या शिफारशीवरून हे गाळे शेतकरी उत्पादित गट किंवा कंपनीस द्यावयाचे आहेत.यामुळे मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर, वसई-विरार आणि पनवेल या नऊ महापालिकांसह अंबरनाथ, बदलापुरातील रहिवाशांना आता शेतकºयांनी पिकवलेला ताजा शेतमाल, वाजवी किमतीत मिळेल. शिवाय, त्या त्या क्षेत्रातील महापालिका अधिकाºयांसह फेरीवाला संघटनांच्या दादागिरीपासूनही शेतकºयांची सुटका होणार आहे. याशिवाय, शेतकºयांनी उत्पादित केलेला शेतमाल शहरात विकता यावा, याकरिता नगरपालिका क्षेत्रात आठवड्यातून एक मैदान आणि महापालिका क्षेत्रात किमान तीन मैदाने दरशनिवारी किंवा रविवारी उपलब्ध करून द्यावीत. तसेच या शेतकरी बाजाराकरिता शेड्स उभाराव्यात, असे आदेश यापूर्वीच दिले आहेत. आठवडाबाजाराची संकल्पना महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या मार्गदर्शनानुसार राबवावी, यासाठी निवडलेली जागा योग्य आहे किंवा नाही, याबाबत पणन मंडळाचा अभिप्राय घ्यावा, असेही बजावण्यात आले आहे. शेतकरी आठवडाबाजाराच्या जागेसाठी आवश्यकता असेल, तेथे आरक्षणाची तरतूद करावी, असे नगरविकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांना पाठवलेल्या आदेशात म्हटले आहे.>महापालिकांच्या मालकीच्या भाजी मंडयांमध्ये १५ गाळे आरक्षित ठेवण्याच्या शासन निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मात्र, त्यात खºया शेतकºयांना प्राधान्य मिळायलाच हवे. बोगस शेतकरी त्यात घुसता कामा नये. तसेच शेतकºयांना हमीभाव, कर्जमाफी मिळायलाच हवी. त्यासाठीचे आमचे आंदोलन सुरूच राहील. शेतकºयांच्या आंदोलनाची धार अशा निर्णयांमुळे कमी होणार नाही. त्यासाठी राज्य शासनाकडून व्यापक प्रयत्न व्हायला हवेत. अशा तुटपुंजा प्रयत्नांतून काहीही साध्य होणार नाही.- डॉ. अजित नवले, नेते, शेतकरी किसान सभा