शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
4
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
5
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
6
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
7
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
8
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
9
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
10
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
11
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
12
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
13
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
14
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
15
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
16
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
17
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
18
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
19
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
20
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 

१४ लाख तरुणांच्या आत्महत्या, कौटुंबिक हिंसाचारावर ठेवले बोट; भरपाई देणे अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 3:29 AM

ठाणे : भारतीय कुटुंबव्यवस्थेतील संवेदना, संस्कार पती-पत्नीच्या नात्यातील अहंकारमुळे हरवले आहेत.

ठाणे : भारतीय कुटुंबव्यवस्थेतील संवेदना, संस्कार पती-पत्नीच्या नात्यातील अहंकारमुळे हरवले आहेत. महिलांच्या संरक्षणासाठी २००५ साली कौटुंबिक हिंसाचार कायदा आला. त्याची अंमलबजावणीला सुरू होताच दहा वर्षात २६ ते ४० वयोगटांतील सुमारे १४ लाख नऊ हजार मुलांनी केवळ पोटगीच्या नुकसानभरपाईपोटी आत्महत्या केल्या आहेत, तर तीन लाख ४० हजार घटस्फोटासाठीचे अर्ज न्यायालयात प्रलंबित आहेत, अशी माहिती अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर यांनी दिली.सारा फाऊंडेशनच्या चौथ्या वर्धापनिदनानिमित्त सहयोग मंदिर येथे ‘चला नाते जपू या’ या कार्यक्र मात त्या बोलात होत्या. महिलांवर अन्याय होतो, म्हणून कौटुंबिक हिंसाचार कायदा अस्तित्वात आला. पण यामुळे भारतीय कुटुंबसंस्था खिळखिळी होत असल्याचे चित्र दिसत आहे. विवाहानंतर केवळ चार दिवसांतच सासू, पती शारीरिक, मानसिक छळ करतात म्हणून मुली कोर्टात घटस्फोटाचे दावे दाखल करतात आणि याचा गैरफायदा घेत गल्लाभरू वकील मुलांना तीस ते चाळीस पानी नाेिटसा पाठवून त्यांचे जीणे नकोसे करून टाकतात. २० लाख, ५० लाख, एक कोटी नुकसानभरपाईची मागणी मुलीकडचे करतात. दुर्देवाने ही मागणी मुलाला पूर्ण करणे शक्य नसेल, तर त्याच्यापुढे आत्महत्त्या करण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही, अशी उदाहरणे त्यांनी दिली. देशात १४ लाख मुलांना नुकसानभरपाई देणे शक्य झाले नाही म्हणून अशा २६ ते ४० या वयोगटातील मुलांनी आत्महत्त्या केल्याचे त्यांनी सांगितले. मुलाच्या आईने त्याचे लग्न होताच संसाराच्या चाव्या सुनेकडे सोपवल्या तरच मुलांचा संसार आणि पर्यायाने घर आनंदात राहील, असा सल्लाही त्यांनी दिला. हल्ली जावई सांभाळणे सोपे, पण सून सांभाळणे अवघड होऊन बसले आहे. कारण सासूचे हात कायद्याने बांधले गेले आहेत. त्यामुळे सासूनेही बदलत्या काळानुसार तडजोड करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक भास्कर पाटील,डॉ. रोहित गोखले, ब्राह्मण विद्यालय पूर्व प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, माटे अँण्ड सन्सचे माटे, वास्तूविराज मंजुषा अहिरराव यांना गौरविण्यात आले. सारा फाऊंडेशनच्या सारंगी महाजन उपस्थित होत्या.