शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

कळवा रुग्णालयात सात महिन्यांत १,०६१ मृत्यू; मागील वर्षीच्या तुलनेत ३२५ अधिक मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 06:11 IST

मागील १४ दिवसांत सुमारे ५० हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मागील सात महिन्यांत तब्बल १०६१ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मागील १४ दिवसांत सुमारे ५० हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला. उपचारार्थ दाखल झालेल्या सरासरी एक हजार रुग्णांमागे मृत्यूचे प्रमाण हे ५१ ते ५४ असे आहे. 

कळवा रुग्णालयात ठाण्यासह पालघर, मुंबई येथूनही रुग्ण उपचारासाठी येतात. मागील काही महिन्यांत रुग्णालयावरील ताण वाढला आहे. ओपीडीत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या १५०० वरून दोन हजारांच्या घरात गेली. मागील आठवड्यात गुरुवारी पाच रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर शनिवारी रात्री ते रविवारी सकाळपर्यंत आणखी १८ रुग्णांची भर पडली. जानेवारी ते जुलै २०२३ या सात महिन्यांत १०६१ रुग्णांचा मृत्यू या रुग्णालयात झाला. २०२२ मध्ये जानेवारी ते जुलै या कालावधीत ७३६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद कळवा रुग्णालयात झाली होती. यंदा त्यात ३२५ रुग्णांची अधिकची भर पडली. २०२२ मध्ये जानेवारी ते डिसेंबरपर्यंत १३३६ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

१४ हजार रुग्णांना डिस्चार्ज

मागील वर्षी जानेवारी २०२२  ते जुलै २०२२ या सात महिन्यांच्या कालावधीत विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी १६ हजार ९६९ रुग्ण दाखल झाले, तर उपचाराअंती १४ हजार ६२६ रुग्णांना सोडून देण्यात आले. यापैकी ३ हजार २४२ प्रसुती करण्यात आली. तसेच याच कालावधीत ७३६ रुग्णांचा मृत्यू झाला.

यंदाच्या वर्षी जानेवारी २०२३ ते जुलै २०२३ या कालावधीत विविध आजारांवर उपचार घेण्याबरोबरच शस्त्रक्रियेसाठी २१ हजार ६०६ रुग्ण दाखल झाले. उपचाराअंती १८ हजार ४१३ रुग्णांना सोडून देण्यात आले होते. ३, २६५ प्रसूती करण्यात आली. याच कालावधीत एक हजार ६१ रुग्णांचा मृत्यू झाला. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी ३२५ ने मृत्यू वाढले.

रुग्णालयाचे अनेक भाग खासगी संस्थेला आंदण

कळवा रुग्णालयात खासगी संस्थेला डायलिसिससाठी जागा देण्यात आली आहे. तसेच सीटी स्कॅन व इतर टेस्टसाठी जागा खासगी संस्थेला दिली आहे. कमी खर्चात येथे सिटी स्कॅन केले जात असल्याचा दावा करण्यात येतो परंतु रुग्णालयाचे अनेक भाग हे खासगी संस्थेला आंदण दिले आहेत. या निर्णयांना तत्कालीन अधिष्ठातांनी विरोध केला होता म्हणून त्यांचीच उचलबांगडी करण्यात आली होती.

त्रुटी सुधारण्यावर भर द्या; तज्ज्ञांचे मत

कालची घटना हे प्रशासनाचे अपयश आहे की सांगता येत नाही; परंतु मृत्यू होण्यामागे वेगवेगळी कारणे असतात. अशा घटनांमध्ये दरवेळी हलगर्जीपणा असतोच असे नाही. हे मी सायन हॉस्पिटलमधील २८ वर्षांच्या अनुभवाने सांगतो. एखाद्या ठिकाणी हलगर्जीपणा होऊ शकतो. कळवा रुग्णालयाच्या घटनेत विविध आजारांचे रुग्ण होते. ठरावीक वॉर्डात घटना घडलेली नाही. अशा घटना प्रत्येक हॉस्पिटलमध्ये कधी ना कधी होऊ शकतात. त्यांना अनेक कारणे असू शकतात. - डॉ. विनोद इंगळहळीकर, ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ.

कोणतेही रुग्णालय हे रुग्णांना वाचविण्याचा प्रयत्नच करत असते; पण सरकारी रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांची आर्थिक स्थिती आणि अनेक ठिकाणी फिरून आल्यावर झालेली गंभीर अवस्था यामुळे प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही काही वेळा त्यांना वाचविणे हे मानवी प्रयत्नांच्या पलीकडे असते. अशा वेळी डॉक्टर, प्रशासन आणि अतिरिक्त ताण पडलेले कर्मचारी यांच्यावर आरोप करणे चुकीचे असून त्यासाठी जनसामान्यांचे प्रबोधन करण्याची गरज आहे. - डॉ. उदय कुलकर्णी, ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ.

कळवा रुग्णालय ठाण्यातले  मोठे रुग्णालय असून, ते आणखी सुसज्ज होण्याची गरज आहे; परंतु सरसकट सगळ्यांना दोष देण्यापेक्षा चौकशीत जे दोषी आढळतील केवळ त्यांच्यावरच कारवाई झाली पाहिजे. अशा घटनांत राजकारण आणून काही होत नाही, उलट सगळ्यांनी एकत्र येऊन काम करावे, रुग्णालयातील त्रुटी कशा सुधारता येतील याचा अभ्यास प्रशासनाने करावा. चौकशी अहवाल येईपर्यंत कोणाला दोष देता कामा नये. - डॉ. महेश बेडेकर, सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ.

 

टॅग्स :kalwaकळवाhospitalहॉस्पिटल