शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

 यूएलसीमुळे मिळालेली १००९ एकर जमिन शासनाने परवडणा-या घरांसाठी द्यावी - विश्वास उटगी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 16:30 IST

मुंबई, ठाणे, रायगड येथिल लाखो नागरिकांना तेथे जन्माला येऊनही व भूमीपुत्र असूनही हक्काचे घर मिळू शकत नाही. याबद्दल निवारा अभियान, मुंबई या संस्थेची एक सभा रविवारी डोंबिवलीत झाली. त्या सभेत मुंबई उच्च न्यायालयाच्या डिसेंबर २०१४ मधील निर्णयानुसार १००९ एकर जमीन सरकारने ताब्यात घेतली आहे.

डोंबिवली - मुंबई, ठाणे, रायगड येथिल लाखो नागरिकांना तेथे जन्माला येऊनही व भूमीपुत्र असूनही हक्काचे घर मिळू शकत नाही. याबद्दल निवारा अभियान, मुंबई या संस्थेची एक सभा रविवारी डोंबिवलीत झाली. त्या सभेत मुंबई उच्च न्यायालयाच्या डिसेंबर २०१४ मधील निर्णयानुसार १००९ एकर जमीन सरकारने ताब्यात घेतली आहे. कायद्यान्वये ही जागा मुंबईकरांना परवडणा-या घरांसाठी द्यायला हवी. त्यासाठी नागरिकांनी एकत्र यायला हवे असे आवाहन या चळवळीचे कार्याध्यक्ष विश्वास उटगी यांनी केले.डोंबिवलीत बोडस मंगल कार्यालयात झालेल्या सभेत ते उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. निवारा अभियान, मुंबई सहकारी गृहनिर्माण संस्था उभारुन सरकारकडे जमिनीची मागणी करत आहे. सरकारी दराने हाऊसिंग सोसायट्यांना जागा मिळाल्यास कोणतेही मोठे बिल्डर न आणता, मुंबई,ठाणेकर आपली हाऊसिंग सोसायटी कमी किंमतीत उभी करु शकतात. आम्हाला आमच्या हक्काची जमिन द्या, मुंबई आमच्या हक्काची असून ती कॉर्पोरेट कंपन्यांच्या खिशात जाऊ देणार नाही असे आवाहन त्यांनी यावेळी केले. ५ आॅगस्ट पासून संस्थेने सुरु केलेल्या नोंदणी अभियानात आतापर्यंत सुमारे ३ हजार नागरिकांनी सदस्य नोंदणी केली आहे. केंद्रासह राज्याने परवडणा-या दरात घरे उपलब्ध करण्याची घोषणा केली. राज्याने तर ११ लाख घरे देण्याचा संकल्प सोडला, पण आता तर अडीच वर्षे झाली एकही घर बांधलेले नाही अशी टिका त्यांनी केली. यापूर्वी जनता दलाचे दिवंगत नेते बाबूराव सामंत, मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली नागरि निवारा परिषदेने गोरेगाव दिंडोशी येथे ६५०० हजार घरे बांधून स्वस्तात जमिन मिळवली होती. राज्य सरकारनेही माथाडी कामगारांना ५८ एकर जागा उपलब्ध करुन देत तेथे बांधकाम सुरु असून ८ लाख रुपयात ५०० फुटांचे घर मिळणार आहे. कमाल जमीन धारणा कायद्यांतर्गत ते शक्य होते. पण जागतिक बँक, कें्रद्र सरकार आणि जमीन मालकांच्या दबावाखाली येत आधीच्या सरकारने तो कायदाच रद्द करुन टाकला. पण तरीही त्या दरम्यान ताब्यात घेतलेली १००९ एकरची जागा घरांसाठी उपलब्ध करुन द्यावीच लागेल अशी भूमिका या चळवळीची असून नागरिकांनी त्याला सहकार्य करावे असे आवाहन उटगी यांनी डोंबिवलीकरांना केले. त्यावेळी व्यासपीठावर काळू कोमास्कर, अरुण वेळासकर, महेश बनसोडे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Homeघर