शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
3
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
4
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
5
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
6
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
7
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
8
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
9
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
10
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
11
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
12
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
13
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
14
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
15
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
16
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
17
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
18
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
19
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
20
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली

 यूएलसीमुळे मिळालेली १००९ एकर जमिन शासनाने परवडणा-या घरांसाठी द्यावी - विश्वास उटगी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 16:30 IST

मुंबई, ठाणे, रायगड येथिल लाखो नागरिकांना तेथे जन्माला येऊनही व भूमीपुत्र असूनही हक्काचे घर मिळू शकत नाही. याबद्दल निवारा अभियान, मुंबई या संस्थेची एक सभा रविवारी डोंबिवलीत झाली. त्या सभेत मुंबई उच्च न्यायालयाच्या डिसेंबर २०१४ मधील निर्णयानुसार १००९ एकर जमीन सरकारने ताब्यात घेतली आहे.

डोंबिवली - मुंबई, ठाणे, रायगड येथिल लाखो नागरिकांना तेथे जन्माला येऊनही व भूमीपुत्र असूनही हक्काचे घर मिळू शकत नाही. याबद्दल निवारा अभियान, मुंबई या संस्थेची एक सभा रविवारी डोंबिवलीत झाली. त्या सभेत मुंबई उच्च न्यायालयाच्या डिसेंबर २०१४ मधील निर्णयानुसार १००९ एकर जमीन सरकारने ताब्यात घेतली आहे. कायद्यान्वये ही जागा मुंबईकरांना परवडणा-या घरांसाठी द्यायला हवी. त्यासाठी नागरिकांनी एकत्र यायला हवे असे आवाहन या चळवळीचे कार्याध्यक्ष विश्वास उटगी यांनी केले.डोंबिवलीत बोडस मंगल कार्यालयात झालेल्या सभेत ते उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. निवारा अभियान, मुंबई सहकारी गृहनिर्माण संस्था उभारुन सरकारकडे जमिनीची मागणी करत आहे. सरकारी दराने हाऊसिंग सोसायट्यांना जागा मिळाल्यास कोणतेही मोठे बिल्डर न आणता, मुंबई,ठाणेकर आपली हाऊसिंग सोसायटी कमी किंमतीत उभी करु शकतात. आम्हाला आमच्या हक्काची जमिन द्या, मुंबई आमच्या हक्काची असून ती कॉर्पोरेट कंपन्यांच्या खिशात जाऊ देणार नाही असे आवाहन त्यांनी यावेळी केले. ५ आॅगस्ट पासून संस्थेने सुरु केलेल्या नोंदणी अभियानात आतापर्यंत सुमारे ३ हजार नागरिकांनी सदस्य नोंदणी केली आहे. केंद्रासह राज्याने परवडणा-या दरात घरे उपलब्ध करण्याची घोषणा केली. राज्याने तर ११ लाख घरे देण्याचा संकल्प सोडला, पण आता तर अडीच वर्षे झाली एकही घर बांधलेले नाही अशी टिका त्यांनी केली. यापूर्वी जनता दलाचे दिवंगत नेते बाबूराव सामंत, मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली नागरि निवारा परिषदेने गोरेगाव दिंडोशी येथे ६५०० हजार घरे बांधून स्वस्तात जमिन मिळवली होती. राज्य सरकारनेही माथाडी कामगारांना ५८ एकर जागा उपलब्ध करुन देत तेथे बांधकाम सुरु असून ८ लाख रुपयात ५०० फुटांचे घर मिळणार आहे. कमाल जमीन धारणा कायद्यांतर्गत ते शक्य होते. पण जागतिक बँक, कें्रद्र सरकार आणि जमीन मालकांच्या दबावाखाली येत आधीच्या सरकारने तो कायदाच रद्द करुन टाकला. पण तरीही त्या दरम्यान ताब्यात घेतलेली १००९ एकरची जागा घरांसाठी उपलब्ध करुन द्यावीच लागेल अशी भूमिका या चळवळीची असून नागरिकांनी त्याला सहकार्य करावे असे आवाहन उटगी यांनी डोंबिवलीकरांना केले. त्यावेळी व्यासपीठावर काळू कोमास्कर, अरुण वेळासकर, महेश बनसोडे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Homeघर