शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

अरे बापरे! WhatsApp ने भारतात बॅन केले ८५ लाखांहून अधिक अकाऊंट्स, करू नका 'ही' चूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 16:42 IST

भारतातील लाखो WhatsApp अकाउंट्सवर बंदी घातली आहे.

WhatsApp हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. पण आता कंपनीने पॉलिसीचं उल्लंघन करणाऱ्या भारतातील लाखो WhatsApp अकाउंट्सवर बंदी घातली आहे. युजर्सची सुरक्षा वाढवण्यासाठी आणि गैरवापर रोखण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचललं आहे. कंपनीने आपल्या पॉलिसीचं उल्लंघन केल्याबद्दल सप्टेंबरमध्ये भारतात ८.५ मिलियन (जवळपास ८५ लाख) मलिशियस अकाऊंट्सवर बंदी घातली. नवीन आयटी नियम २०२१ अंतर्गत WhatsApp ने आपल्या मंथली कम्प्लायन्स रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे.

रिपोर्टनुसार, १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान, WhatsApp ने ८५८४००० खाती बॅन केली आहेत, त्यापैकी १६५८००० अकाऊंट्सना युजर्सचा कोणताही रिपोर्ट मिळण्यापूर्वीच बॅन करण्यात आले आहेत. भारतात ६०० मिलियनहून अधिक युजर्स असलेल्या WhatsApp कडे सप्टेंबरमध्ये ८१६१ तक्रारी आल्या, त्यापैकी ९७ वर कारवाई करण्यात आली. 

"आम्ही आमच्या कामात पारदर्शकता ठेवू आणि भविष्यातील रिपोर्टमध्ये आमच्या प्रयत्नांची माहिती देऊ" असं कंपनीने म्हटलं आहे. या प्रयत्नांवर देखरेख ठेवण्यासाठी इंजिनिअर्स, डेटा सायंटिस्ट, एनालिस्ट, रिसर्चर्स आणि लॉ, ऑनलाईन सेफ्टी आणि टेक्नॉलॉडी डेव्हलपमेंट एक्स्पर्टची एक टीम नियुक्त केली आहे.

व्हॉट्सॲपने म्हटले आहे, "आम्ही युजर्सना ॲपमध्येच कोणत्याही कॉन्टॅक्ट्सना ब्लॉक करण्याची आणि रिपोर्ट करण्याची सुविधा देतो. आम्ही युजर्सचा फीडबॅककडे बारकाईने लक्ष देतो आणि चुकीची माहिती रोखण्यासाठी, सायबर सुरक्षेला चालना देण्यासाठी आणि निवडणुकीची अखंडता राखण्यासाठी कटिबद्ध आहोत."

१ ऑगस्ट २०२४ ते ३१ ऑगस्ट २०२४ या कालावधीत कंपनीने ८४५८००० WhatsApp खाती बंद केली होती. यापैकी १६६१००० खाती युजर्सकडून तक्रारी येण्यापूर्वीच बॅन करण्यात आली होती. ऑगस्ट महिन्यातही देशभरातून १० हजार ७०७ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ९३ तक्रारींवर कारवाई करण्यात आली आहे. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान