शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

ही तर काहीही उगवू न शकणाऱ्या काळाची चाहूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 08:36 IST

तुम्ही फेसबुकवर आहात ना, असा प्रश्न नुकतीच ओळख झालेल्या माणसालाही विचारला जाऊ लागला आणि जो नसेल त्याच्याकडे आदिम काळातील एखादी व्यक्ती असावी, असं आश्चर्यानं पाहिलं जाऊ लागलं.

- नीरजालेखिका धारणपणे दहा-बारा वर्षांपूर्वी स्मार्टफोन्स आले आणि सर्वसामान्य माणसाचं जगही बदललं. स्मार्टफोन्स जे केवळ कॉर्पोरेट आणि श्रीमंत लोकांच्या आवाक्यात होते ते हळूहळू सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात आले. मग फेसबुक आणि व्हॉट्सॲप लोकप्रिय झालं आणि लोकांना गॉसिप, वाद, चर्चा करायला हक्काची चावडी मिळाली.

तुम्ही फेसबुकवर आहात ना, असा प्रश्न नुकतीच ओळख झालेल्या माणसालाही विचारला जाऊ लागला आणि जो नसेल त्याच्याकडे आदिम काळातील एखादी व्यक्ती असावी, असं आश्चर्यानं पाहिलं जाऊ लागलं. सुरुवातीला या फेसबुकचा उपयोग एकमेकांच्या भेटीगाठींसाठी व्हायला लागला. विशेषतः खूप पूर्वी हरवलेले शाळेतले, महाविद्यालयातले किंवा ज्या चाळीत एकत्र राहत होते ते जरा बऱ्या घरात शिफ्ट झालेले मित्र शोधण्यासाठी होत होता. भेटल्यावर आनंदानं रियुनिअन करण्याची टूम निघाली होती त्या काळात. पण गेल्या दहा वर्षात याचा उपयोग वेगवेगळ्या कारणांनी व्हायला लागला. एकेकाळी म्हणजे साठ-सत्तरच्या दशकात जन्मलेले जे लोक साहित्य, नाटक, कला, संगीत यांचा आस्वाद घेत होते, ते लोक आता त्यांचा वेळ घालवण्यासाठी फेसबुकवर वेळ घालवायला लागले. आठवणी, त्या त्या दिवसातल्या काही महत्त्वाच्या घटना, त्यातून आलेला नॉस्टाल्जिया यात रमायला लागले. कधी शेसव्वाशे शब्दात तर कधी तीनचारशे शब्दात मनात येईल ते लिहायला लागले. सगळेच लेखक झाले आणि वाचक हरवून गेले. जे लिहीत नव्हते ते लिहिलेले हे शब्द इथून तिकडे पोचवणारे निरोपे झाले. रात्रंदिवस मोबाईल हातात घेऊन बसणारे लोक आता आपल्या आजूबाजूला दिसत असतात. रस्त्यातून चालताना, ट्रेन बस, एसटी, विमान, कशातूनही प्रवास करताना, रस्त्याच्या कडेला बाईक लावून तर कधी शेताच्या मेरांवर बसून लोक काहीतरी पाहताना, नाहीतर क्वचित काहीतरी वाचताना दिसत असतात.

एका दिवसात दोनशे पानं वाचून संपवणारी आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा ग्रंथालयात जाऊन दुसरं पुस्तक बदलून आणणारी आमच्या पिढीतली माणसंही या उद्योगात सामील झाली. शंभर-दोनशे शब्दात अत्यंत चमकदार शब्दात लिहिलेल्या सोसण्याच्या कथा, कधी नव्या पिढीला दिलेले सल्ले तर कधी कवितांचा पाऊस या फेसबुक नामक चावडीवर पडायला लागला आणि माणसं त्यातच गुंतून गेली. 

केवळ गुंतून गेली असं नाही तर तोच इतिहास, तोच भूगोल, तेच साहित्य आणि तेच सत्य असंही मानायला लागली. आता हजार पानांची किंवा त्याहूनही जास्त पानं असलेली दोन-दोन खंडात विभागल्या गेलेल्या ‘वार अँड पीस’ किंवा ‘अना कॅरेनिना’ सारख्या टॉलस्टायच्या कादंबऱ्या किंवा ‘दास कॅपिटल’ सारखा कार्ल मार्क्सचा ग्रंथ, ‘१९८४’ सारखी मुराकामीची तेराशे पानांची कादंबरी किंवा ‘बदलता भारत’ सारख्या अतिशय महत्त्वाच्या दोन खंडातील वैचारिक लेख वाचण्याची लोकांची क्षमता संपत चालली आहे. विचार करायला लावणारं आणि बौद्धिक किंवा वैचारिक समज वाढवणारं साहित्यिक खाद्य वाचनालयांच्या रॅकवर धूळ खात पडायला लागलं आहे आणि भडकवणारं, लोकांना हिंस्र करणारे चार ओळींचे संदेश लोकप्रिय होत चालले आहेत. 

अशा काळात अनेकदा एक प्रकारची पोकळी निर्माण होते. लोक केवळ निरर्थक करमणुकीत, रिल्स पाहण्यात वेळ घालवायला लागतात. आता ना दोन अंकी नाटक पाहण्याइतका वेळ आहे आपल्याकडे की दोन तासांचा सलग साहित्यिक वैचारिक कार्यक्रम ऐकण्यासाठी वेळ आहे.

अशा या दिवसांत काही सन्माननीय अपवाद वगळता काहीही अर्थपूर्ण प्रसवू न शकणाऱ्या लोकांचं पीक वाढत चाललं आहे. ते असंच वाढत गेलं तर सर्जनशील जमीन बंजर, मूल्यहीन होऊन जाईल. साहित्य कलांमध्येही चमकदार लेखन करणारे लोक पुढे येतील आणि खोल तळाशी नेणारं आयुष्याच्या गुंतागुंतीची जटिल वाट धुंडाळणारं, त्यावर वैचारिक मांडणी करणारं लेखन संपून जाईल.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया