शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सावधान! ५ सेकंदात चोरी होऊ शकतात ५ लाख रुपये; स्मार्टफोनवर चुकूनही असं करू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 12:17 IST

सध्याच्या जगात स्मार्टफोन, सोशल मीडिया आणि इंटरनेटला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालं आहे.

नवी दिल्ली-

सध्याच्या जगात स्मार्टफोन, सोशल मीडिया आणि इंटरनेटला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. बातम्या पाहायच्या  असतील किंवा सोशल मीडियावर काही शोध घ्यायचा असेल तर आपल्या सर्वांना इंटरनेटची रोजची गरज भासते. डिजिटल जग जितके उपयुक्त आहे तितकेच ते धोकादायक देखील आहे. त्याचे अनेक नकारात्मक पैलू देखील आहेत. एक छोटीशी चूक आणि तुमच्या खात्यातून अवघ्या ५ सेकंदात ५ लाख रुपये जाऊ शकतात. 

भारतात २०२२ च्या अखेरीस ८४ कोटी इंटरनेट युझर्स होतील, जे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या ६० टक्के इतकं आहे. इंटरनेटशी जोडलेली प्रत्येक व्यक्ती दररोज सुमारे २.५ तास व्यतित करते. आपल्या सर्वांचं फोनवर अवलंबून राहणं, सोशल मीडिया आणि इंटरनेटचं व्यसन प्रचंड वाढलं आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. जितकं आपण या गोष्टींवर अवलंबून राहू तितकाच सायबर सुरक्षेचा धोकाही वाढणार आहे. कोविडमुळे ऑनलाइन व्यवहारांना चालना मिळाली असून त्यामुळे सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बँकिंगपासून ऑनलाइन शॉपिंगपर्यंत, औषधांपासून रेशनपर्यंत आपण तंत्रज्ञानावर अवलंबून झालो आहोत.

स्केअरवेअरचा वापरस्केअरवेअरद्वारे हॅकर्स पीडितांना खोटे अलार्म आणि नोटिफिकेशन पाठवतात. त्यांना त्यांच्या सिस्टमवर मालवेअरचा फटका बसल्याचं सांगण्यात येतं. युझर्स या नोटिफिकेशनला घाबरतात आणि घाईघाईनं असे सॉफ्टवेअर डाऊनलोड करतात जे मालवेअर असू शकतं. Scareware हा एक कॉम्प्युटर प्रोग्राम आहे जो युझर्सना अनावश्यक प्रोग्राम खरेदी करण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी वापरला जातो. यामुळे तुमचे डिव्हाइस व्हायरसने प्रभावित होते आणि तुमचे सर्व तपशील हॅकर्सकडे जाऊ लागतात.

फसवणूक करणाऱ्यांची हुशारीतु्म्हाला लॉटरी लागली आहे किंवा तुमचे नाव लकी ड्रॉमध्ये आले आहे, अशा वेगवेगळ्या सबबी हॅकर्स तुम्हाला अनेकदा देतात. तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकलात की ते तुमच्या बँकेचा पासवर्ड, OTP किंवा KYC तपशील मिळतात. जसं जसं आपण तंत्रज्ञानावर अधिक अवलंबून राहू त्याच प्रमाणात आपल्याला अधिक चांगल्या ऑनलाइन सुरक्षा सिस्टम तयार करणं देखील आवश्यक आहे. ऑनलाइन फसवणूक गुन्हे हाताळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे इंटरनेट सावधगिरीनं वापर हाच आहे.  अशा घटनांना बळी पडण्यापासून स्वत:ला वाचवण्याचा सर्वात महत्वाचा मार्ग म्हणजे सतर्क राहणे आणि कोणत्याही भूलथापांना बळी न पडणे.

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोन