शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! ५ सेकंदात चोरी होऊ शकतात ५ लाख रुपये; स्मार्टफोनवर चुकूनही असं करू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 12:17 IST

सध्याच्या जगात स्मार्टफोन, सोशल मीडिया आणि इंटरनेटला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालं आहे.

नवी दिल्ली-

सध्याच्या जगात स्मार्टफोन, सोशल मीडिया आणि इंटरनेटला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. बातम्या पाहायच्या  असतील किंवा सोशल मीडियावर काही शोध घ्यायचा असेल तर आपल्या सर्वांना इंटरनेटची रोजची गरज भासते. डिजिटल जग जितके उपयुक्त आहे तितकेच ते धोकादायक देखील आहे. त्याचे अनेक नकारात्मक पैलू देखील आहेत. एक छोटीशी चूक आणि तुमच्या खात्यातून अवघ्या ५ सेकंदात ५ लाख रुपये जाऊ शकतात. 

भारतात २०२२ च्या अखेरीस ८४ कोटी इंटरनेट युझर्स होतील, जे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या ६० टक्के इतकं आहे. इंटरनेटशी जोडलेली प्रत्येक व्यक्ती दररोज सुमारे २.५ तास व्यतित करते. आपल्या सर्वांचं फोनवर अवलंबून राहणं, सोशल मीडिया आणि इंटरनेटचं व्यसन प्रचंड वाढलं आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. जितकं आपण या गोष्टींवर अवलंबून राहू तितकाच सायबर सुरक्षेचा धोकाही वाढणार आहे. कोविडमुळे ऑनलाइन व्यवहारांना चालना मिळाली असून त्यामुळे सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बँकिंगपासून ऑनलाइन शॉपिंगपर्यंत, औषधांपासून रेशनपर्यंत आपण तंत्रज्ञानावर अवलंबून झालो आहोत.

स्केअरवेअरचा वापरस्केअरवेअरद्वारे हॅकर्स पीडितांना खोटे अलार्म आणि नोटिफिकेशन पाठवतात. त्यांना त्यांच्या सिस्टमवर मालवेअरचा फटका बसल्याचं सांगण्यात येतं. युझर्स या नोटिफिकेशनला घाबरतात आणि घाईघाईनं असे सॉफ्टवेअर डाऊनलोड करतात जे मालवेअर असू शकतं. Scareware हा एक कॉम्प्युटर प्रोग्राम आहे जो युझर्सना अनावश्यक प्रोग्राम खरेदी करण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी वापरला जातो. यामुळे तुमचे डिव्हाइस व्हायरसने प्रभावित होते आणि तुमचे सर्व तपशील हॅकर्सकडे जाऊ लागतात.

फसवणूक करणाऱ्यांची हुशारीतु्म्हाला लॉटरी लागली आहे किंवा तुमचे नाव लकी ड्रॉमध्ये आले आहे, अशा वेगवेगळ्या सबबी हॅकर्स तुम्हाला अनेकदा देतात. तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकलात की ते तुमच्या बँकेचा पासवर्ड, OTP किंवा KYC तपशील मिळतात. जसं जसं आपण तंत्रज्ञानावर अधिक अवलंबून राहू त्याच प्रमाणात आपल्याला अधिक चांगल्या ऑनलाइन सुरक्षा सिस्टम तयार करणं देखील आवश्यक आहे. ऑनलाइन फसवणूक गुन्हे हाताळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे इंटरनेट सावधगिरीनं वापर हाच आहे.  अशा घटनांना बळी पडण्यापासून स्वत:ला वाचवण्याचा सर्वात महत्वाचा मार्ग म्हणजे सतर्क राहणे आणि कोणत्याही भूलथापांना बळी न पडणे.

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोन