शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

सावधान! ५ सेकंदात चोरी होऊ शकतात ५ लाख रुपये; स्मार्टफोनवर चुकूनही असं करू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 12:17 IST

सध्याच्या जगात स्मार्टफोन, सोशल मीडिया आणि इंटरनेटला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालं आहे.

नवी दिल्ली-

सध्याच्या जगात स्मार्टफोन, सोशल मीडिया आणि इंटरनेटला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. बातम्या पाहायच्या  असतील किंवा सोशल मीडियावर काही शोध घ्यायचा असेल तर आपल्या सर्वांना इंटरनेटची रोजची गरज भासते. डिजिटल जग जितके उपयुक्त आहे तितकेच ते धोकादायक देखील आहे. त्याचे अनेक नकारात्मक पैलू देखील आहेत. एक छोटीशी चूक आणि तुमच्या खात्यातून अवघ्या ५ सेकंदात ५ लाख रुपये जाऊ शकतात. 

भारतात २०२२ च्या अखेरीस ८४ कोटी इंटरनेट युझर्स होतील, जे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या ६० टक्के इतकं आहे. इंटरनेटशी जोडलेली प्रत्येक व्यक्ती दररोज सुमारे २.५ तास व्यतित करते. आपल्या सर्वांचं फोनवर अवलंबून राहणं, सोशल मीडिया आणि इंटरनेटचं व्यसन प्रचंड वाढलं आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. जितकं आपण या गोष्टींवर अवलंबून राहू तितकाच सायबर सुरक्षेचा धोकाही वाढणार आहे. कोविडमुळे ऑनलाइन व्यवहारांना चालना मिळाली असून त्यामुळे सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बँकिंगपासून ऑनलाइन शॉपिंगपर्यंत, औषधांपासून रेशनपर्यंत आपण तंत्रज्ञानावर अवलंबून झालो आहोत.

स्केअरवेअरचा वापरस्केअरवेअरद्वारे हॅकर्स पीडितांना खोटे अलार्म आणि नोटिफिकेशन पाठवतात. त्यांना त्यांच्या सिस्टमवर मालवेअरचा फटका बसल्याचं सांगण्यात येतं. युझर्स या नोटिफिकेशनला घाबरतात आणि घाईघाईनं असे सॉफ्टवेअर डाऊनलोड करतात जे मालवेअर असू शकतं. Scareware हा एक कॉम्प्युटर प्रोग्राम आहे जो युझर्सना अनावश्यक प्रोग्राम खरेदी करण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी वापरला जातो. यामुळे तुमचे डिव्हाइस व्हायरसने प्रभावित होते आणि तुमचे सर्व तपशील हॅकर्सकडे जाऊ लागतात.

फसवणूक करणाऱ्यांची हुशारीतु्म्हाला लॉटरी लागली आहे किंवा तुमचे नाव लकी ड्रॉमध्ये आले आहे, अशा वेगवेगळ्या सबबी हॅकर्स तुम्हाला अनेकदा देतात. तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकलात की ते तुमच्या बँकेचा पासवर्ड, OTP किंवा KYC तपशील मिळतात. जसं जसं आपण तंत्रज्ञानावर अधिक अवलंबून राहू त्याच प्रमाणात आपल्याला अधिक चांगल्या ऑनलाइन सुरक्षा सिस्टम तयार करणं देखील आवश्यक आहे. ऑनलाइन फसवणूक गुन्हे हाताळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे इंटरनेट सावधगिरीनं वापर हाच आहे.  अशा घटनांना बळी पडण्यापासून स्वत:ला वाचवण्याचा सर्वात महत्वाचा मार्ग म्हणजे सतर्क राहणे आणि कोणत्याही भूलथापांना बळी न पडणे.

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोन