शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

टीसीएसचा 'कॅम्पस इंटरव्ह्यू' ना रामराम...प्रक्रियाच बदलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 13:37 IST

टाटा कंसल्टंसी सर्विसेस ही भारतात सर्वाधिक कर्मचारी असलेली कंपनी आहे. यामुळे ही कंपनी मोठ्या प्रमाणावर फ्रेशर्स विद्यार्थ्यांनाही नोकरी देते.

बेंगळुरु : देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसने उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचे स्वरूप बदलले असून ऑनलाईन टेस्ट आणि व्हिडिओद्वारे इंटरव्ह्यूमुळे देशातील कानाकोपऱ्यातील हुशार उमेदवारांपर्यंत पोहोचली आहे. याचबरोबर कॉलेजमध्ये जाऊन मुलाखती घेण्याच्या पद्धतीवरही टीसीएस कमी अवलंबून राहणार आहे.

टाटा कंसल्टंसी सर्विसेस ही भारतात सर्वाधिक कर्मचारी असलेली कंपनी आहे. यामुळे ही कंपनी मोठ्या प्रमाणावर फ्रेशर्स विद्यार्थ्यांनाही नोकरी देते. मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागत असल्याने कंपनीला चांगल्या उमेदवारांच्या शोधात देशातील मोठ्या शहरांच्या कॉलेजमध्ये जावे लागत होते. मात्र, यामध्ये वेळ जाण्याबरोबरच बऱ्याचदा हुशार उमेदवारही सापडत नव्हते. यामुळे देशातील अन्य भागातील चांगली मुले दुर्लक्षितच राहत होती. 

यामुळे टीसीएसने नॅशनल क्वालिफायर टेस्ट नावाची एक पॅन इंडिया ऑनलाईन टेस्ट सुरु केली आहे. ही टेस्ट देशातील कोणत्याही ठिकाणावरून देता येते. यानंतर निवडलेल्या उमेदवारांची टीसीएसचे अधिकारी व्हिडिओद्वारे मुलाखत घेतात. कंपनीनुसार या टेस्टद्वारे कंपनी दूरवरील उमेदवारांपर्यंत पोहोचत आहे. तसेच नियुक्ती प्रक्रिया 3 ते ४ आठवड्यांत पूर्ण होते. याआधी कंपनी 370 कॉलेजांमध्ये जाऊन कॅम्पस इंटरव्ह्यू घेत होती. मात्र, ऑनलाईनमुळे टीसीएस 2000 कॉलेजांपर्यंत पोहोचत आहे. 

कंपनीच्या या डिजिटल iON प्लॅटफॉर्मसाठी 24 राज्यांतील 100 शहरांतून 2.8 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. जुन्या पद्धताने अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा हे प्रमाण 175 टक्के जास्त होते. आता कंपनी या कॉलेजांमध्ये जात नसून मान्यताप्राप्त कॉलेजांमध्ये हे विद्यार्थी मुलाखत देण्यासाठी येत आहेत. यामुळे वेळ आणि पैसाही वाचत असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :TataटाटाITमाहिती तंत्रज्ञानinterviewमुलाखतcollegeमहाविद्यालय