शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

हॉर्न ओके प्लीज! आता वाहनांएवजी रस्तेच वाजवणार हॉर्न! कसे? घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 21:35 IST

आता वाहन चालकांचे दुर्लक्ष झाले तरी रस्तेच हॉर्न वाजवतील असे तंत्र विकसित केले आहे. २०१७ मध्येच जम्मू श्रीनगर हायवे १ वर या साठी खास तयार केलेले खांब बसविले गेले असून त्याच्या चाचण्या कमालीच्या यशस्वी झाल्या असल्याचे समजते.

जगात सर्वाधिक मृत्यू रस्ते अपघातात होतात. जसजशी प्रगती होते तसतशी नवीनवी वाहने रस्त्यांवर येऊ लागतात. वाहनांची संख्या वाढली कि अपघात वाढतात. त्यातही डबल लेन रस्त्यांवर अपघाताचे प्रमाण अधिक असते आणि पहाडी भागात, घाट रस्त्यात अपघातांची शक्यता अधिक वाढते. वळणदार रस्त्यांवर वाहन चालकांना फार सावध राहून वाहन चालवावे लागते कारण वळणांमुळे विरुध्द बाजूने येणारी वाहने समजत नाहीत. अश्या वेळी हॉर्न वाजवून विरुध्द दिशेने येणाऱ्या वाहनांना सूचना दिली जाते. तरीही अनेकदा हॉर्न वाजविले जात नाहीत आणि मग अपघात होतात. हिमालय पर्वत रांगा आणि पहाडी भागात असे अपघात जास्त प्रमाणात होतात.

यावर एक स्मार्ट उपाय हिंदुस्तान पेट्रोलियम आणि लिओ बर्नेट यांनी संयुक्त प्रयत्नातून काढला आहे. त्यांनी आता वाहन चालकांचे दुर्लक्ष झाले तरी रस्तेच हॉर्न वाजवतील असे तंत्र विकसित केले आहे. २०१७ मध्येच जम्मू श्रीनगर हायवे १ वर या साठी खास तयार केलेले खांब बसविले गेले असून त्याच्या चाचण्या कमालीच्या यशस्वी झाल्या असल्याचे समजते. जेथे घाट रस्ते आणि खूपच वळणे आहेत तेथे वळणावरच कोपऱ्यात हे स्मार्ट लाईट पोल बसविले गेले आहेत. या पोल्सच्या जवळ वाहन आले कि आवाज येऊ लागतो आणि त्यामुळे विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनचालकांना समोरून वाहन येत आहे याची सूचना मिळते. परिणामी वाहनांची टक्कर होऊन अपघात होण्याची शक्यता कमी होते.

या रस्त्यावर स्मार्ट लाईट पोलचा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे आत्ता देशाच्या अन्य भागात, जेथे रस्ते अपघाताचे प्रमाण अधिक आहे अश्या ठिकाणी असे पोल उभारले जाणार आहेत. जम्मू श्रीनगर हायवे भागात या पोल्स मुळे अपघाताचे प्रमाण खूपच कमी झाले असल्याचे आकडेवारी सांगते. आता रोहतांग पास, मनाली लेह हायवे वर सुद्धा असे स्मार्ट लाईट पोल बसविले जाणार आहेत.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेtechnologyतंत्रज्ञान