शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

UPI Payment: आता साध्या फोनमधूनही पाठवता येणार पैसे; इंटरनेटचीही गरज नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 07:14 IST

एकट्या फेब्रुवारी महिन्यात ४५३ कोटींचे व्यवहार झाले. त्यामुळे डिजिटल व्यवहार १०० लाख कोटी होण्यासाठी अधिक वेळ लागणार नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आता अगदी साध्या, इंटरनेट नसलेल्या फोनच्या मदतीनेही एकमेकांना पैसे पाठवता येणार आहेत. आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी मंगळवारी यासाठी स्वतंत्र यूपीआय योजना सादर केली आहे. याला यूपीआय१२३पे नाव देण्यात आले आहे.

डिजिटल पेमेंटसाठी २४ तास हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. याचे नाव डीजीसाथी देण्यात आले आहे. यूपीआय१२३पेच्या मदतीने वापरकर्ते अगदी साध्या फोनवरून यूपीआय पेमेंट करू शकणार आहेत. स्कॅन आणि पे वगळता सर्व प्रकारचे व्यवहार याद्वारे केले जाऊ शकतात. यामुळे पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासणार नाही. ही सुविधा वापरण्यासाठी वापरकर्त्यांना त्यांचा मोबाइल क्रमांक आणि बँक खाते लिंक करावे लागेल.

गावागावांमध्ये डिजिटल व्यवहारn यूपीआय पेमेंटची सुरुवात २०१६ मध्ये झाली. आतापर्यंत यूपीआय पेमेंटसाठी स्मार्टफोन आवश्यक होता. n यामुळे ग्रामीण भागातील ४० कोटी जणांना डिजिटल व्यवहार करता येत नव्हते. n गावांमध्ये अनेकांकडे स्मार्टफोन नसतो तसेच इंटरनेटचीही समस्या असते. आरबीआयच्या नव्या सेवेमुळे प्रत्येक गावात डिजिटल व्यवहार वाढणार आहेत. 

एकट्या फेब्रुवारी महिन्यात ४५३ कोटींचे व्यवहार झाले. त्यामुळे डिजिटल व्यवहार १०० लाख कोटी होण्यासाठी अधिक वेळ लागणार नाही. 

ओटीपी, सीव्हीव्ही कुणालाही देऊ नकागव्हर्नर दास यांनी सायबर सुरक्षेबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन केले. अनेक जण पैशांच्या लोभाने मोबाइलवर आलेला ओटीपी आणि डेबिट कार्डवरील सीव्हीव्हीसारखी महत्त्वाची माहिती देतात. यामुळे फसवणूक होते. अशी कोणतीही माहिती देणे टाळावे, असे ते म्हणाले.

टॅग्स :MONEYपैसाReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक