शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
3
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
4
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
5
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
6
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
7
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
8
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
9
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
10
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
11
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
13
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
14
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
15
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
16
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
17
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
18
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
19
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
20
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

चिनी कंपन्यांना LG वैतागली! बड्या कंपनीची Smart Phone बाजारातून एक्झिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 14:15 IST

LG Company Decide to close Smartphone unit: सोनी कंपनीने दोन वर्षांपूवी भारतातील स्मार्टफोन बाजार गुंडाळला होता. चिनी कंपन्यांच्या कमी किंमती आणि आव्हानामुळे या मोठ्या कंपन्यांना व्यवसाय करणे कठीण जात होते. आता एलजीचा नंबर लागला आहे.

इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीतील बडी कंपनी एलजी (LG) मोबाईल बिझनेस (Mobile Business) युनिट बंद करणार आहे. स्मार्टफोनच्या बाजारात फारसा दम दाखवू न शकल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. स्मार्टफोन विभाग बंद केल्याने कंपनीला इलेक्ट्रीक व्हेईकल कंपोनंट्स, आर्टिफिशल इंटेलिजेंस, कनेक्टेड डिव्हाइसेस, स्मार्ट होम्स, बिझनेस-टू-बिझनेस सोल्यूशन सारख्या बाजारावर लक्ष केंद्रीत करता येणार आहे. (LG Electronics decide to close Smartphone unit.)

एलजीने सांगितले की, कंपनी आपला स्टॉक संपविणार आहे. हे फोन संपेपर्यंत बाजारात उपलब्ध असतील. कंपनी या फोनसाठी एका ठराविक कालावधीपर्यंत ग्राहकांना सर्व्हिस सपोर्ट आणि सॉफ्टवेअर अपडेट देत राहणार आहे. मोबाील बिझनेस येत्या 31 जुलैपर्यंत कायमचा बंद केला जाणार आहे. यासाठी कंपनीने काही तयारी देखील केली आहे. या तारखेनंतर देखील काही स्मार्टफोन बाजारात उपलब्ध असतील परंतू नवीन फोनचे उत्पादन बंद झाल्याने विक्री झाल्यानंतर एलजीचा एकही फोन बाजारात नसेल असेही कंपनीने सांगितले. 

यामुळे एलजीच्या भविष्यातील स्मार्टफोनबाबतचे अंदाज आता थांबले आहेत. कंपनीनेच अधिकृतपणे हे सांगितल्याने यापुढे एलजीचे फोन मिळणार नाहीत. कंपनीने मोबाईल युनिटमधील काही कर्मचाऱ्यांना अन्य बिझनेस युनिटमध्ये बदली करण्यास सुरुवात केली आहे. 

काही महिन्यांपूर्वीच एलजीने याबाबत संकेत दिले होते. यावेळी स्मार्टफोन युनिटच्या विक्रीचादेखील पर्याय कंपनीने विचारात घेतला होता. एलजी इलेक्ट्रॉनिक्सने यासाठी गुगल, फेसबुक, फोक्सवॅगन आणि व्हिएतनामच्या बीन ग्रुपशी देखील चर्चा करत होती. मात्र, कंपनीला डील करण्यात अपयश आले. 

कंपनी सलग २३ तिमाही तोट्यात...एलजी कंपनीचा स्मार्टफोन बाजारातील हात काढून घेण्याचा निर्णय धक्कादायक नाही. कारण कंपनी 2015 च्या दुसऱ्या तिमाहीपासून सलग 23 तिमाहीमध्ये तोट्यात गेली आहे. एलजीने 2020 मध्ये एकूण 6.5 दशलक्ष युनिट पाठविले होते आणि 2020 च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा ग्लोबल शेअर हा 2 टक्के राहिला होता. सोनी कंपनीने दोन वर्षांपूवी भारतातील स्मार्टफोन बाजार गुंडाळला होता. चिनी कंपन्यांच्या कमी किंमती आणि आव्हानामुळे या मोठ्या कंपन्यांना व्यवसाय करणे कठीण जात होते. 

टॅग्स :LGएलजीSmartphoneस्मार्टफोन