शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

चिनी कंपन्यांना LG वैतागली! बड्या कंपनीची Smart Phone बाजारातून एक्झिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 14:15 IST

LG Company Decide to close Smartphone unit: सोनी कंपनीने दोन वर्षांपूवी भारतातील स्मार्टफोन बाजार गुंडाळला होता. चिनी कंपन्यांच्या कमी किंमती आणि आव्हानामुळे या मोठ्या कंपन्यांना व्यवसाय करणे कठीण जात होते. आता एलजीचा नंबर लागला आहे.

इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीतील बडी कंपनी एलजी (LG) मोबाईल बिझनेस (Mobile Business) युनिट बंद करणार आहे. स्मार्टफोनच्या बाजारात फारसा दम दाखवू न शकल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. स्मार्टफोन विभाग बंद केल्याने कंपनीला इलेक्ट्रीक व्हेईकल कंपोनंट्स, आर्टिफिशल इंटेलिजेंस, कनेक्टेड डिव्हाइसेस, स्मार्ट होम्स, बिझनेस-टू-बिझनेस सोल्यूशन सारख्या बाजारावर लक्ष केंद्रीत करता येणार आहे. (LG Electronics decide to close Smartphone unit.)

एलजीने सांगितले की, कंपनी आपला स्टॉक संपविणार आहे. हे फोन संपेपर्यंत बाजारात उपलब्ध असतील. कंपनी या फोनसाठी एका ठराविक कालावधीपर्यंत ग्राहकांना सर्व्हिस सपोर्ट आणि सॉफ्टवेअर अपडेट देत राहणार आहे. मोबाील बिझनेस येत्या 31 जुलैपर्यंत कायमचा बंद केला जाणार आहे. यासाठी कंपनीने काही तयारी देखील केली आहे. या तारखेनंतर देखील काही स्मार्टफोन बाजारात उपलब्ध असतील परंतू नवीन फोनचे उत्पादन बंद झाल्याने विक्री झाल्यानंतर एलजीचा एकही फोन बाजारात नसेल असेही कंपनीने सांगितले. 

यामुळे एलजीच्या भविष्यातील स्मार्टफोनबाबतचे अंदाज आता थांबले आहेत. कंपनीनेच अधिकृतपणे हे सांगितल्याने यापुढे एलजीचे फोन मिळणार नाहीत. कंपनीने मोबाईल युनिटमधील काही कर्मचाऱ्यांना अन्य बिझनेस युनिटमध्ये बदली करण्यास सुरुवात केली आहे. 

काही महिन्यांपूर्वीच एलजीने याबाबत संकेत दिले होते. यावेळी स्मार्टफोन युनिटच्या विक्रीचादेखील पर्याय कंपनीने विचारात घेतला होता. एलजी इलेक्ट्रॉनिक्सने यासाठी गुगल, फेसबुक, फोक्सवॅगन आणि व्हिएतनामच्या बीन ग्रुपशी देखील चर्चा करत होती. मात्र, कंपनीला डील करण्यात अपयश आले. 

कंपनी सलग २३ तिमाही तोट्यात...एलजी कंपनीचा स्मार्टफोन बाजारातील हात काढून घेण्याचा निर्णय धक्कादायक नाही. कारण कंपनी 2015 च्या दुसऱ्या तिमाहीपासून सलग 23 तिमाहीमध्ये तोट्यात गेली आहे. एलजीने 2020 मध्ये एकूण 6.5 दशलक्ष युनिट पाठविले होते आणि 2020 च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा ग्लोबल शेअर हा 2 टक्के राहिला होता. सोनी कंपनीने दोन वर्षांपूवी भारतातील स्मार्टफोन बाजार गुंडाळला होता. चिनी कंपन्यांच्या कमी किंमती आणि आव्हानामुळे या मोठ्या कंपन्यांना व्यवसाय करणे कठीण जात होते. 

टॅग्स :LGएलजीSmartphoneस्मार्टफोन