शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Jio ला मोठा धक्का! किमतीत वाढ झाल्याने युजर्संनी सोडली साथ; 'या' कंपनीची झाली चांदी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 16:39 IST

Reliance Jio : रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि व्होडाफोन-आयडियाला (Vodafone-Idea) मोठा झटका बसला आहे.

नवी दिल्ली : रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि व्होडाफोन-आयडियाला (Vodafone-Idea) मोठा झटका बसला आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या डेटानुसार रिलायन्स जिओने डिसेंबर 2021 मध्ये 12.9 मिलियन ग्राहक गमावले. भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आणि भारती एअरटेलने याच महिन्यात 1.1 मिलियन आणि 0.47 मिलियन युजर्स जोडले. व्होडाफोन-आयडियाने डिसेंबरमध्ये पुन्हा 1.6 लाख युजर्स गमावले.

मार्केट शेअरच्या बाबतीत, रिलायन्स जिओकडे 36 टक्के, त्यानंतर भारती एअरटेल 30.81 टक्के, व्होडाफोन-आयडिया जवळ 23 टक्के,बीएसएनएल आणि एमटीएनएलचे अनुक्रमे 9.90 टक्के आणि 0.28 टक्के आहेत. बीएसएनएल देशभरात 4G नेटवर्क सुरू करण्यापासून दूर आहे, ग्राहक बीएसएनएलकडे वळले आहेत. यामागचे मुख्य कारण म्हणजे नोव्हेंबरच्या अखेरीस खासगी दूरसंचार कंपन्यांकडून लागू करण्यात येणारी प्रीपेड दरवाढ आहे.

बीएसएनएलने जोडले नवीन युजर्सखाजगी दूरसंचार कंपन्यांनी कमी पैसे देणाऱ्या ग्राहकांपासून मुक्ती मिळवली, ज्यामुळे त्यांचा सरासरी महसूल प्रति युजर्सच्या (ARPU) आकड्यात सुधारणा होईल आणि बीएसएनएलने नवीन ग्राहक जोडले. मुळात ही सर्वांसाठी एक फायद्याची परिस्थिती आहे. बीएसएनएलने महिन्याभरात प्रभावीपणे जास्तीत जास्त ग्राहक जोडले. टेलिकॉम कंपनीचे 4G नेटवर्क एकदा लाइव्ह झाले की ते अधिक परवडणारे असल्याने लोक खाजगी टेलिकॉम कंपन्यांपेक्षा त्याला प्राधान्य देतील याचा हा पुरावा आहे. या डेटामुळे बीएसएनएलचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल.

8.54 मिलियन युजर्सनी केला नंबर पोर्टमहिन्यादरम्यान, एकूण 8.54 मिलियन मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (MNP) विनंत्या करण्यात आल्या, ज्यामध्ये 4.91 मिलियन विनंत्या झोन-1 मधून आल्या आणि उर्वरित 3.63 मिलियन विनंत्या झोन-2 मधून आल्या. मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी झोन-1 मध्ये सर्वाधिक विनंत्या महाराष्ट्रात करण्यात आल्या, तर मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी झोन-2 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक विनंत्या करण्यात आल्या. 

टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओBSNLबीएसएनएलVodafoneव्होडाफोन