शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

TRAI ची मोठी कारवाई! १.७७ कोटी सिमकार्ड ब्लॉक, बनावट कॉल्स-मेसेजेसला आळा बसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 10:06 IST

DoT blocks 1.77 crore SIM cards : देशातील १२२ कोटींहून अधिक दूरसंचार युजर्सच्या सुरक्षेसाठी दूरसंचार विभाग आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) सहकार्याने हे पाऊल उचलले आहे.

नवी दिल्ली : सरकारी दूरसंचार विभागाने बनावट कॉल्स रोखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. अलीकडेच विभागाने १.७७ कोटी मोबाईल नंबर बंद केले आहेत. हे नंबर बनावट कॉल करण्यासाठी वापरले जात होते. देशातील १२२ कोटींहून अधिक दूरसंचार युजर्सच्या सुरक्षेसाठी दूरसंचार विभाग आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) सहकार्याने हे पाऊल उचलले आहे.

दूरसंचार विभाग आणि ट्रायने संयुक्तरित्या बनावट कॉल्सविरोधात कारवाई तीव्र केली आहे. ट्रायने गेल्या महिन्यातच एक नवीन धोरण तयार केले आहे, ज्याद्वारे आता ऑपरेटर स्वत:च मार्केटिंग आणि बनावट कॉल्स थांबवू शकतात. यामुळे आता व्हॉईसलिस्टिंगची गरज भासणार नाही. 

दूरसंचार विभागाच्या म्हणण्यानुसार, दररोज जवळपास १.३५ कोटी बनावट कॉल्स थांबवले जात आहेत. याशिवाय, विभागाने बनावट कॉल करणारे १.७७ कोटी मोबाईल नंबर बंद केले आहेत. लोकांच्या तक्रारींवर विभागाने कारवाई करत पाच दिवसांत सुमारे ७ कोटी कॉल्स बंद केले आहेत. ही आपल्या मोहिमेची सुरुवात असल्याचे विभागाने म्हटले आहे.

बनावट कॉल्सवर आळा बसेलदूरसंचार विभागाने बनावट कॉल करणाऱ्यांना रोखण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही विभागाने लाखो सिमकार्ड बंद केले होते. बनावट कॉल्स रोखण्यासाठी विभाग कठोर पावले उचलत आहे. तसेच, आतापासून, कॉलर्सना फक्त व्हाइटलिस्ट असलेले टेलीमार्केटिंग कॉल प्राप्त होतील.

११ लाख खाती गोठवण्यात आलीअलीकडेच, दूरसंचार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, जवळपास ११ लाख खाती बँकांनी आणि पेमेंट वॉलेटद्वारे गोठवली आहेत. येत्या काही दिवसांत आणखी सिमकार्ड ब्लॉक केले जातील, असे सरकारचे म्हणणे आहे. दूरसंचार विभाग (DOT) सोबत काम करणाऱ्या चार दूरसंचार सेवा ऑपरेटरने (TSPs) ४५ लाख बनावट आंतरराष्ट्रीय कॉल्स दूरसंचार नेटवर्कपर्यंत पोहोचण्यापासून रोखले होते.

टॅग्स :TRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्रायMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान