शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शाओमीच्या या स्मार्टफोन्सवर Jio 5G चालणार नाही; धक्कादायक कारण समोर, तुमचा तर नाहीय ना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 15:27 IST

तुम्ही जर शाओमी आणि रिलायन्स जिओचे युजर असाल तर तुम्हाला शाओमीच्या काही स्मार्टफोन्सवर जिओ ५जी सेवा वापरता येणार नाहीय.

देशात शाओमीचे सर्वाधिक स्मार्टफोन आहेत. स्वस्त किंमतीत मोबाईल आणत शाओमीने सॅमसंग, मायक्रोमॅक्ससह अनेक कंपन्यांना पळती भुई थोडी केली होती. आता ५जी मध्येही शाओमीचे फोन बऱ्यापैकी आले आहेत. परंतू शाओमी वापरकर्त्यांसाठी एक वाईट बातमी आहे. 

तुम्ही जर शाओमी आणि रिलायन्स जिओचे युजर असाल तर तुम्हाला शाओमीच्या काही स्मार्टफोन्सवर जिओ ५जी सेवा वापरता येणार नाहीय. जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. तर शाओमी हा सर्वात मोठा ब्रँड आहे. यामुळे या कंपनीच्या फोनवर भारतातील एक मोठा ग्राहक वर्ग जिओचे ५जी वापरू शकणार नाहीय. 

Telecom Talk च्या रिपोर्टनुसार Xiaomi Mi 10 आणि और Xiaomi Mi 10i स्मार्टफोनवर Jio 5G सर्व्हिस वापरता येणार नाहीय. याचे कारण असे आहे की, Xiaomi Mi 10 आणि Xiaomi Mi 10i हे Jio च्या 5G स्टँड अलोन नेटवर्कला सपोर्ट करणार नाहीत. 

5G नेटवर्क भारतात दोन प्रकारे काम करते. यामध्ये जिओ स्टँड अलोन 5जी नेटवर्कवर काम करते, तर एअरटेल नॉन स्टँड अलोन नेटवर्कवर काम करते. नॉन स्टँड अलोन नेटवर्कमध्ये फक्त 4G टॉवर अपग्रेड केले जाते, तर स्टँड अलोनमध्ये 4G टॉवरची मदत घेतली जात नाही. म्हणजेच स्वतंत्र टॉवर असतो. हेच कारण आहे की Jio चे 5G इंटरनेट Mi 10 आणि Mi 10i स्मार्टफोनमध्ये काम करू शकणार नाही. या दोन्ही स्मार्टफोन्सना 5G स्टँडअलोन किंवा 5G SA सॉफ्टवेअर दिलेले नाही. 

Xiaomi Mi 10 Smartphone 2020 मध्ये लाँच झाला होता. Xiaomi Mi 10i स्मार्टफोन वर्ष 2021 मध्ये लाँच झाला होता. भारतात Mi 10 ची सध्याची किंमत 31,999 रुपये आहे. तर Mi 10i स्मार्टफोन 21,999 रुपयांना येतो. यामुळे हा मोबाईल असलेल्या लोकांना एकतर एअरटेलकडे स्विच व्हावे लागेल किंवा दुसरा मोबाईल घ्यावा लागणार आहे. 

टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओ5G५जी