शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

5G service in India : इंटरनेटच्या बाबतीत भारत किती मागे? 5G गावात कधी पोहोचेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 18:27 IST

5G service in India : रिलायन्स जिओ दिवाळीच्या मुहूर्तावर 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरू करणार आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दिल्लीतील प्रगती मैदानावर 5G इंटरनेट सेवेची औपचारिक घोषणा केली. आता भारत 5G सेवा देणाऱ्या देशांच्या यादीत आणखी एक पाऊल टाकणार आहे. मात्र, देशात 5G इंटरनेट सेवा सुरू होण्यास थोडा वेळ लागेल. 

रिलायन्स जिओ दिवाळीच्या मुहूर्तावर 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरू करणार आहे. यानंतर देशात अधिकृतपणे 5G सेवा सुरू होईल. जगातील अनेक देशांमध्ये 5G सेवा आधीच वापरली जात आहे, त्यामुळे आत्ता भारतातील इंटरनेट स्पीडची स्थिती काय आहे आणि भारताच्या ग्रामीण भागात 5G इंटरनेट स्पीड पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल, हे जाणून घेऊया...

टॉप - 10 देशांमध्ये भारताचे नाव नाहीजर आपण इंटरनेट स्पीडबद्दल बोललो तर सौदी अरेबियामध्ये सर्वात वेगवान इंटरनेट प्रदान केले जात आहे. OpenSignal च्या रिपोर्टनुसार, सौदी अरेबियामध्ये मोबाईल यूजर्सना 414.2 Mbps चा डाउनलोड स्पीड मिळतो. म्हणजेच वेगाच्या बाबतीत सौदी अरेबिया अव्वल आहे. इतर देशांमध्ये वेगाची स्थिती काय आहे, खालीलप्रमाणे पाहू शकता.

सौदी अरेबिया - 414.2 Mbpsदक्षिण कोरिया - 312.7 Mbpsऑस्ट्रेलिया - 215.7 Mbpsतैवान - 210.2 Mbpsकॅनडा - 178.1 Mbpsस्वित्झर्लंड - 150.7 Mbpsहाँगकाँग - 142.8 Mbpsयुनायटेड किंगडम - 133.5 Mbpsजर्मनी - 102.0 Mbpsनेदरलँड आणि अमेरिका - 79.2 Mbps

भारतातील इंटरनेट स्पीडजर भारतातील इंटरनेट स्पीडबद्दल बोलायचे झाले, तर भारतातील गाझियाबाद जिल्ह्यात 50.9 Mbps चा डाउनलोड स्पीड उपलब्ध आहे. जर आपण संपूर्ण देशाबद्दल बोललो तर, फिक्स्ड ब्रॉडबँड कनेक्शनवरून यजुर्सना सरासरी 30 ते 35 एमबीपीएस दरम्यान स्पीड मिळतो.

5G भारतातील गावोगावी कधी पोहोचेल?Reliance Jio, Airtel आणि Vodafone-Idea ने देशाच्या कानाकोपऱ्यात 5G इंटरनेट पसरवण्याची तयारी केली आहे. जिओने देशातील प्रत्येक गावात 5G इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी 2 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची चर्चा केली आहे. मात्र, ते अजूनही दूरचे मानले जाते. तांत्रिक तज्ज्ञांच्या मते, ही सेवा गावोगावी पोहोचण्यासाठी किमान दीड वर्ष लागू शकतात. त्याचवेळी मोबाईल कंपन्या असाही दावा करत आहेत की, 5G सेवा डिसेंबर 2023 पर्यंत त्या देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवतील.

टॅग्स :Internetइंटरनेटtechnologyतंत्रज्ञान