शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

5g Spectrum Auction: 5G क्रांतीच्या दिशेने पहिले पाऊल; स्पेक्ट्रमच्या लिलावाला सुरुवात, अंबानी सर्वात पुढे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 11:19 IST

5g spectrum auction: देशातील तीन खासगी टेलिकॉम कंपन्या आणि अदानींची एक कंपनी अशा चार जणांनी सहभाग घेतला आहे. 

गेल्या दीड वर्षापासून सुरु असलेल्या 5G येणार असल्याच्या चर्चांना आता पुर्णविराम मिळणार आहे. कारण त्या दिशेने आज पहिले पाऊल पडणार आहे. आज 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला सुरुवात झाली आहे. या लिलावात देशातील तीन खासगी टेलिकॉम कंपन्या आणि अदानींची एक कंपनी अशा चार जणांनी सहभाग घेतला आहे. या लिलावात जिओ, व्होडाफोन आणि एअरटेलसह गौतम अदानींची Adani Data Networks बोली लावणार आहेत. यामध्ये खरी लढाई अदानी आणि अंबानींमध्ये होण्याची शक्यता आहे. सध्यातरी स्पर्धा नसली तरी भविष्यात या दोन्ही कंपन्या एकमेकांशी स्पर्धा करण्याची शक्यता आहे. 

72 GHz स्पेक्ट्रमचा लिलाव 4.3 लाख कोटी रुपयांवर सुरु होणार आहे. त्याची वैधता 20 वर्षे असेल. लिलावात यशस्वी ठरलेली कंपनी याद्वारे 5G सेवा देऊ शकणार आहे. विविध स्तरावरील बँड विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. विविध कमी वारंवारता बँड (600 MHz, 700 MHz, 800 MHz, 900 MHz, 1800 MHz, 2100 MHz, 2300 MHz), मध्यम (3300 MHz) आणि उच्च वारंवारता बँड (2GHz) मध्ये रेडिओ लहरींसाठी लिलाव आयोजित करण्यात आला आहे.

देशात पुढील काही महिन्यांत ५जी सेवा लाँच होणार आहे. मुंबई, पुणे, दिल्लीसह दहा शहरांमध्ये सुरुवातीला ही सेवा सुरु केली जाईल. या सुपरफास्ट सेवेचा सामान्यांच्या दैनंदिन जीवनात काय फायदा होईल हे ही सेवा प्रत्यक्षात आल्यावरच समोर येणार आहे. पण 5G नंतर बरेच काही बदलणार आहे.

2000 च्या दशकात, बहुतेक लोक 2G किंवा 3G नेटवर्क वापरत होते. भारतात 4G च्या प्रवेशानंतर इंटरनेट स्पीडने मोठी क्रांती घडविली. व्हिडीओंच्या बाबतीत मोठी क्रांती झाली. व्हिडीओ पाहणे, व्हिडीओ कॉल करणे सोपे झाले. त्याचप्रमाणे 5G नेटवर्क आल्यानंतर आपल्याला अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळतील. 4G नेटवर्कवर आपल्याला 100Mbps पर्यंत वेग मिळतो, परंतु 5G वर तो Gbps मध्ये उपलब्ध असेल. 

5G नेटवर्क आणण्यासाठी आणि सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागेल. मोठ्या शहरांमध्ये हे तंत्रज्ञान लवकरच उपलब्ध होणार आहे. पण गावे आणि छोट्या शहरांना अजून थोडी वाट पहावी लागणार आहे.  

टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओAirtelएअरटेलAdaniअदानीVodafoneव्होडाफोन