शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

फेसबुकवर द्वेष पसरवल्याचा केंद्राचा आरोप, कंपनीकडून मागितली अल्गोरिदम आणि रिस्पॉन्सची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 16:19 IST

केंद्र सरकारनं फेसबुकला (Facebook) पत्र लिहून कंपनीद्वारे वापरले जाणारे अग्लोरिदम आणि इतर प्रक्रियेची सविस्तर माहिती मागितली आहे. भारत फेसबुकची ...

केंद्र सरकारनंफेसबुकला (Facebook) पत्र लिहून कंपनीद्वारे वापरले जाणारे अग्लोरिदम आणि इतर प्रक्रियेची सविस्तर माहिती मागितली आहे. भारत फेसबुकची सर्वात मोठी ग्राहकपेठ असूनही खोटी माहिती, द्वेषयुक्त भाषण आणि हिंसेवर सेलिब्रेशन करणारे व्हिडिओ अशा पद्धतीच्या साम्रगीकडे दुर्लक्ष केलं जात असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं लिहिलेलं हे पत्र महत्त्वाचं ठरणार आहे. 

अमेरिकी माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार फेसबुकवर असे अनेक ग्रप्स आणि पेज आहेत की जे भ्रामक, द्वेषयुक्त आणि मुस्लिम विरोधी माहितीनं भरलेले असल्याचं सोशल मीडिया संशोधकांनी अधोरेखित केलं आहे. इलेक्ट्रॉनिक आणि सूचना मंत्रालयानं फेसबुकला पत्र लिहून कंपनीकडून वापरलेलं जाणारं अग्लोरिदम आणि प्रक्रियेबाबतची माहिती मागितली आहे. याशिवाय युझर्सच्या सुरक्षेसाठी उचलण्यात आलेल्या पावलांची माहितीही केंद्रानं फेसबुकडे मागितली आहे. दरम्यान, फेसबुकनं याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास विरोध केला आहे. 

भारत सरकारद्वारे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशात ५३ कोटींहून अधिक लोक व्हॉट्सअॅप, ४१ कोटी लोक फेसबुक आणि २१ कोटी लोक इन्स्टाग्रामचा वापर करत आहेत. दरम्यान या वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारनं नवे आयटी नियम लागू करत ट्विटर आणि फेसबुकसह अनेक बड्या टेक्नोलॉजी कंपन्यांना अधिक जबाबदारीनं वागण्यासाठीची तरतूद केली आहे. 

अल्गोरिदमची माहिती घेण्यासाठी २०१९ मध्ये तयार करण्यात आलेलं 'टेस्ट अकाऊंट'ब्लूमबर्ग आणि इतर अमेरिकी माध्यमांच्या समूहांनी मिळवलेल्या कागदपत्रांनुसार फेसबुकनं २०१९ साली अग्लोरिदमचा प्रभाव समजून घेण्यासाठी एक टेस्ट अकाऊंटची निर्मिती केली होती. ज्यात भारतात युझर्सद्वारे पाहण्यात येणाऱ्या माहितीची चाचणी केली गेली. न्यूयॉर्क टाइम्सनं देलेल्या वृत्तानुसार फेब्रुवारी २०१९ मध्ये प्रकाशित एका आंतरिक रिपोर्टमध्ये अकाऊंट तयार केलेल्या संशोधकानं म्हटलंय की, "टेस्ट यूझरच्या न्यूज फीडमध्ये गेल्या तीन आठवड्यांमध्ये मृत व्यक्तींचे फोटो सर्वाधिक वेळा पाहिलं गेले. हे असं मी माझ्या आजवरच्या आयुष्यात कधीच पाहिलं नव्हतं"

टॅग्स :FacebookफेसबुकCentral Governmentकेंद्र सरकार