शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
3
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
4
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
5
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
6
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
7
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
8
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
9
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
10
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
11
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
12
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
13
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
14
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
15
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
16
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
17
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
18
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
19
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

तुम्हीही स्टॉलवरून सिम घेताय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2023 10:58 IST

ही तरतूद करण्यात आलीय नव्या दूरसंचार विधेयकात…

मुद्द्याची गोष्ट : मोबाइलसाठी सिम कार्ड घेणे फारच सोपे आहे. अगदी चौकात स्टॉलवरही अवघ्या काही मिनिटांत सिम कार्ड मिळते; परंतु सिम घेताना ते अधिकृत आहे का, बायोमेट्रिक ओळख पडताळणी केली जाते का, याबाबत आता सजग राहावे लागणार आहे. अन्यथा तीन वर्षांचा तुरुंगवास आणि 10 लाखांपर्यंतचा दंड होणार आहे. ही तरतूद करण्यात आलीय नव्या दूरसंचार विधेयकात…

दूरसंचार व्यवस्था पारदर्शी आणि सुटसुटीत करण्यासाठी नव्या विधेयकात अनेक महत्त्वाच्या तरतुदी केल्या आहेत. बोगस सीमकार्डद्वारे वाढलेल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कडक पावले उचलण्यात आली आहेत. त्यासाठी सीम खरेदी करताना संबंधित व्यक्तीची बायोमेट्रिक ओळख पडताळणी अनिवार्य केली आहे. दूरसंचार वा इंटरनेट सुविधा पुरविल्यास किंवा गैरमार्गाने त्यांचा वापर केल्यास कठोर शिक्षा होणार आहे. तसेच प्राधिकरणांच्या नियमांचे उल्लंघन केल्यास टेलिकॉम कंपन्यांना ५ कोटींपर्यंतच्या शिक्षेची तरतूद केली आहे. विधेयकातील तरतुदी...

लायसन्स राज संपणार 

एखाद्या कंपनीला दूरसंचार सेवा सुरू करायची असल्यास, सेवेचा विस्तार करायचा असल्यास किंवा दूरसंचार यंत्रणा स्थापित करायची असल्यास केंद्र सरकारकडून पूर्वपरवानगी आवश्यक असणार आहे. त्यासाठी प्राधान्याने स्पेक्ट्रमच्या लिलावावर भर दिला जाणार, कोणत्याही एका कंपनीला प्राधान्य न देता स्पर्धात्मक बोली लागणार आहे.

सॅटेलाइट टेलिकॉम सेवा

उपग्रहांवर आधारित दूरसंचार सेवा सुरू करण्यासाठी विधेयकात महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यामुळे एलॉन मस्क यांच्या स्टारलिंकसह अन्य कंपन्यांना थेट उपग्रहाशी संबंधित टेलिकॉम वा इंटरनेट सेवा सुरू करण्यास प्रोत्साहन मिळेल.

विनावापर स्पेक्ट्रम परत

यापूर्वी लिलाव केलेले परंतु मुदतीत त्याचा वापर न केल्यास ते स्पेक्ट्रम पुन्हा परत घेण्याचे अधिकार केंद्र सरकारकडे असणार आहेत. शिवाय त्याचे पैसेही संबंधित कंपनीला मिळणार नाहीत. परत घेतलेल्या स्पेक्ट्रमचा पुन्हा लिलाव करून सरकारला पैसे मिळतील.

ओटीटी/सोशल मीडिया कक्षेबाहेर

व्हॉट्सॲप, टेलिग्राम तसेच अन्य ओटीटी प्लॅटफॉर्म्सला या कायद्याच्या कक्षेतून बाहेर ठेवले आहे. त्यांचे नियंत्रण यापुढे माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडे असणार आहे. त्यामुळे या कंपन्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ग्राहकांची पूर्वपरवानगी

दूरसंचार कंपन्यांना त्यांच्या सेवा आणि जाहिरातींसंबंधी माहिती दूरध्वनी वा मेसेजच्या माध्यमातून ग्राहकांना देण्यापूर्वी त्यासाठी त्यांची पूर्वपरवानगी घेणे सक्तीचे केले आहे. अन्यथा कंपन्यांना शिक्षेची तरतूद केली आहे.

इंटरनेट बंदचा अधिकार

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तात्पुरत्या कालावधीसाठी इंटरनेट सेवा बंद करण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारकडे असणार आहे.

...तर सगळ्या सेवा बंद

एखादी कंपनी दिवाळखोरीत निघाली, किंवा त्यासाठी अर्ज केल्यास त्या कंपनीला दूरसंचार सेवा देता येणार नाही, अशीही तरतूद कायद्यात केली आहे.

 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान