शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीतील EVM स्ट्राँगरुमचे CCTV अचानक बंद झाल्याचा सुळेंचा आरोप; निवडणूक अधिकारी म्हणाले...
2
Rahul Gandhi : "सरकार स्थापन झालं तर खटा-खट, खटा-खट पैसे..."; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
4
भाजपा उमेदवार माधवी लता आणखी एका वादात; मतदान केंद्रावर महिलांच्या चेहऱ्यावरून काढला बुरखा;ओळखपत्र तपासले
5
मतदानानंतर मोहन आगाशेंची राजकारणावर टिप्पणी, म्हणाले - "पाच मिनिटं मशीन वाचण्यात गेली..."
6
निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ, खरा चेहरा समोर आला; राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल
7
सावनी रविंद्रनंतर सुयश टिळकलाही बजावता आला नाही मतदानाचा हक्क, म्हणाला - "ह्याची खंत वाटते..."
8
पोलीस कॉन्स्टेबल वराला प्रेयसीने भर मंडपातून पळवले, दुसऱ्या तरुणीशी विवाह होण्यापूर्वी रंगला ड्रामा
9
पराभव समोर दिसू लागल्यानं खापर फोडण्याचं काम सुरू केलंय; सामंतांचा राऊतांना टोला
10
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
11
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
12
PAK vs IRE: पहिल्या पराभवानंतर पाकिस्तानने लाज राखली; आयर्लंडची कडवी झुंज!
13
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
14
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
15
'१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनला, मग भारत हिंदू राष्ट्र का नाही बनला?' कंगना राणौतचा सवाल
16
Sonia Gandhi : Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
17
Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?
18
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
19
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
20
Maharashtra Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन

सावधान..! मोबाइलच्या अतिवापराने आळसावतो आपला मेंदू!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 12:13 AM

मोबाइल फोनशिवाय जगणे ही कल्पनाच अनेकांना सहन होणार नाही.

नवी दिल्ली: मोबाइल फोनशिवाय जगणे ही कल्पनाच अनेकांना सहन होणार नाही. स्मार्टफोन हा जणू शरीराचा एक अवयव झालाआहे! अठरापगड कामांचा व्याप असला तरी एक डोळा मोबाइलवर असतो आणि मेंदूचा एक कोपरा जणू मोबाइल फोनने व्यापलेला असतो. मात्र मोबाइल फोनवर आपण जितके अवलंबून राहू, त्याच्यात गुंतत जाऊ तेवढा आपला मेंदू आळशी बनतो.मोबाइल कितीही सोयीचा वाटत असला तरी त्याकडेच सतत लक्ष देणे हे शरीरस्वास्थ्यासाठी अजिबात चांगले नाही. त्यामुळे शरीरातील स्ट्रेस हार्मोन्स सक्रिय होतात. हृदयाच्या ठोक्यांची गती वाढते. श्वास रोखला जातो. मोबाइल फोनवर जे संदेश किंवा कॉल येतात त्यांना प्रतिसाद द्यावा म्हणून शरीरातील घटक अशारितीने सक्रिय होतात असे अजिबात नाही. उलट या गोष्टींना जलद प्रतिसाद देण्याची जी धडपड चालते त्यातल्या धोक्याचे संकेत शरीर अशा लक्षणांद्वारे देत असते.

सर्च इंजिनहून पुस्तक सरसप्रत्येक संकेदाला ६० बीट या वेगाने आपला मेंदू माहिती ग्रहण करु शकतो. कामाचे खूप ओझे असेल तर मेंदूला अधिक ताण द्यावा लागेल. त्यामुळे मोबाइल फोनच्या सहाय्याने यातील अतिरिक्त कामांचा उरक करण्याकडे कोणाचाही कल असू शकतो. मात्र या कृतीमुळे मेंदू शिणतो व आळशीही बनतो. यासंदर्भात काही संशोधनही झाले आहे. संशोधक, विचारवंत असे बुद्धिमान लोक आपल्या मोबाइल फोनमधील सर्च इंजिनचा इतर लोकांपेक्षा खूप कमी वापर करतात. मोबाइलफोनवर इंटरनेटच्या माध्यमातून कोणत्याही गोष्टीच्या माहितीचा शोध घेतल्याने कोणीही कमी बुद्धिचा ठरत नाही. मात्र बुद्धिमान लोकांना जास्त गोष्टींची माहिती असल्याने ते सर्च इंजिनचा कमी वापर करतात ही वस्तुस्थिती आहे.सतत स्मार्टफोन वापरल्यामुळे मेंदू तणावग्रस्त होतो. बोटेही शिणतात, असा निष्कर्ष स्वित्झर्लंडमधील स्मार्टफोन वापरणाऱ्यांची अलीकडेच पाहणी करण्यात आली, त्यानंतर काढण्यात आला. मोबाइलवर सतत टाइप करत राहिल्याने, सोशल मीडियामध्ये गुरफटून राहिल्याने किंवा स्क्रोलिंग करणाºयांच्या मेंदूवर जास्त आघात होतो.

टॅग्स :MobileमोबाइलHealth Tipsहेल्थ टिप्स