शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

प्रत्येक गावात मिळणार हाय-स्पीड इंटरनेट, BSNL ने बनवला 'हा' जबरदस्त प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 21:42 IST

BSNL : बीएसएनएलने आपल्या पायाभूत सुविधांसाठी अनेक कंत्राटे दिली आहेत. तर, कंपनी सक्रिय पायाभूत सुविधांसाठी करारनामा अंतिम करण्याच्या प्रक्रियेत आहे, असे दूरसंचार सचिव के राजारमन यांनी एका कार्यक्रमात सांगितले.

नवी दिल्ली : सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) एका नवीन योजनेवर काम करत आहे. या नवीन योजनेअंतर्गत बीएसएनएल देशातील प्रत्येक गावाला हायस्पीड इंटरनेटने जोडणार आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, बीएसएनएल सरकारच्या 4G सॅच्युरेशन प्रोग्रामवर काम करत आहे, ज्यामध्ये एका वर्षाच्या आत प्रत्येक गावापर्यंत सर्व्हिस पोहोचेल, जिथे हाय स्पीड ब्रॉडबँड कनेक्शन उपलब्ध नसेल, असे दूरसंचार सचिव के राजारमन यांनी सांगितले. 

बीएसएनएलने आपल्या पायाभूत सुविधांसाठी अनेक कंत्राटे दिली आहेत. तर, कंपनी सक्रिय पायाभूत सुविधांसाठी करारनामा अंतिम करण्याच्या प्रक्रियेत आहे, असे दूरसंचार सचिव के राजारमन यांनी एका कार्यक्रमात सांगितले. तसेच, दूरसंचार राज्यमंत्री देवुसिंह चौहान म्हणाले की, भारताने डिजिटल भेदभाव दूर करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत आणि 2040 पर्यंत भारतात 100 टक्के डिजिटल पेमेंट सुविधा उपलब्ध होईल.

दूरसंचार राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, 2017 मध्ये डिजिटल व्यवहार करणाऱ्या भारतीयांची संख्या चीनच्या लोकसंख्येच्या निम्म्या इतकीच होती. परंतु 2021 मधील आकडेवारीनुसार, नवीन डेटा दर्शवितो की, भारतातील डिजिटल व्यवहारांची संख्या चीनच्या लोकसंख्येच्या दुप्पट आहे. 4G नेटवर्कच्या विस्ताराच्या या योजनेत भारत नेट प्रोग्राम देखील मदत करत आहे. या प्रोग्रामांतर्गत ग्रामीण भागात ऑप्टिक फायबरचे जाळे टाकण्यात येत आहे.

भारत नेट प्रोग्रामद्वारे मिळतेय मददभारत नेट प्रोग्रामच्या मदतीने 1.9 लाख गावांपर्यंत पोहोचले आहे आणि पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत 2.2 लाख गावांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य आहे. दूरसंचार विभाग (DoT) भारतातील सर्व सहा लाख गावांमध्ये भारत नेट नेटवर्कचा विस्तार करण्याच्या योजनेवरही काम करत आहे. सरकार 600 ब्लॉक्समध्ये एक पायलट प्रोजेक्ट चालवत आहे, ज्यामध्ये ते भारत नेट अंतर्गत 30,000 हून अधिक कुटुंबांना अनुदानित किंमतीवर फायबर कनेक्शन देतात, असे के राजारमन म्हणाले. दरम्यान, शुक्रवारी माहिती देताना दूरसंचार राज्यमंत्री देवुसिंह चौहान म्हणाले होते की, देशात 5G सेवा देण्यासाठी टेलिकॉम ऑपरेटर दर आठवड्याला सुमारे 2,500 बेस स्टेशन तयार करत आहेत. 26 नोव्हेंबरपर्यंत 20,980 मोबाईल बेस स्टेशन्सची स्थापना करण्यात आली होती.

टॅग्स :BSNLबीएसएनएलtechnologyतंत्रज्ञान