शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

जिओ फोनला मिळणार तगडी टक्कर, एअरटेलचा 2,500 रूपयात 4G स्मार्टफोन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 14:58 IST

टेलीकॉम कंपनी भारती एअरटेल पुन्हा एकदा रिलायन्स जिओला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल स्वस्त  4G फोन लॉन्च

ठळक मुद्देजिओच्या 1500 रूपयांच्या फोनला टक्कर मिळावी यासाठी एअटरटेलच्या या फोनची किंमत 2 हजार पाचशे रूपये असण्याची शक्यता आहे.  ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातील किंवा सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस कंपनी हा फोन बाजारात आणू शकते.जिओप्रमाणे या फोनमध्ये इंटरनेट आणि व्हॉइस कॉल फ्री

मुंबई, दि. 22 - टेलीकॉम कंपनी भारती एअरटेल पुन्हा एकदा रिलायन्स जिओला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल स्वस्त  4G फोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे. जिओच्या 1500 रूपयांच्या फोनला टक्कर मिळावी यासाठी एअटरटेलच्या या फोनची किंमत 2 हजार पाचशे रूपये असण्याची शक्यता आहे.  इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातील किंवा सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस कंपनी हा फोन बाजारात आणू शकते. यासाठी फोन बनवणा-या कंपन्यांसोबत एअरटेलची चर्चा सुरू आहे. जिओप्रमाणे या फोनमध्ये इंटरनेट आणि व्हॉइस कॉल फ्री मिळण्याचीही शक्यता आहे.  हा फोन अॅंन्ड्रॉइड सिस्टिमवरच आधारित असेल तसंच यामध्ये गुगल प्ले-स्टोअरवरून अॅप डाउनलोड करण्याचं फिचरही मिळेल. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, फोन बनवणा-या कंपन्यांसोबत एअरटेलची चर्चा सुरू आहे. फोनमध्ये मोठी स्क्रीन, चांगला कॅमेरा आणि उत्तम बॅटरी बॅकअप असेल. 4G स्मार्टफोन्स बनवण्याबाबत दिग्गज टेलिकॉम कंपनीसोबत चर्चा अंतिम टप्प्यात आहे असे संकेत फोन निर्माती कंपनी लावा (Lava) किंवा कार्बन (Karbonn) या कंपन्यांनी दिले आहेत. मात्र, दोन्ही कंपनींकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीफ्री इंटरनेट आणि कॉलिंग सर्विसमुळे रिलायन्स जिओने देशभराती टेलीकॉम मार्केटमध्ये खळबळ उडवून दिली होती. आता 24 ऑगस्टपासून जिओचा केवळ 4G बुक करता येणार आहे. 24 ऑगस्टपासून जिओ फोन बुक करता येणार आहे. त्यासाठी 1500 रुपयांची अनामत रक्कम भरावी लागेल. पण, तीन वर्षं फोन वापरल्यानंतर ही रक्कम ग्राहक हवी तेव्हा परत घेऊ शकतात. या जिओ फोनवर 153 रुपयांत जिओ अनलिमिटेड धनधनाधन प्लॅन उपलब्ध असेल, तर जिओ ग्राहकांसाठी व्हॉइस कॉलिंग कायमच मोफत राहणार आहे. 50 कोटी मोबाइल यूजर्सपर्यंत जिओ फोन पोहोचवण्याचा निर्धार कंपनीनं केला आहे. हा फोन पूर्णपणे 'मेड इन इंडिया' असून त्याचं वर्णन रिलायन्सनं 'इंडिया का इंटेलिजन्ट फोन' असं केलं आहे.