शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
3
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
4
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
5
"सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
6
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
7
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
8
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
9
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
10
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
11
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
12
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
13
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
14
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
15
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
16
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
18
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
19
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
20
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन

जिओ फोनला मिळणार तगडी टक्कर, एअरटेलचा 2,500 रूपयात 4G स्मार्टफोन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 14:58 IST

टेलीकॉम कंपनी भारती एअरटेल पुन्हा एकदा रिलायन्स जिओला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल स्वस्त  4G फोन लॉन्च

ठळक मुद्देजिओच्या 1500 रूपयांच्या फोनला टक्कर मिळावी यासाठी एअटरटेलच्या या फोनची किंमत 2 हजार पाचशे रूपये असण्याची शक्यता आहे.  ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातील किंवा सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस कंपनी हा फोन बाजारात आणू शकते.जिओप्रमाणे या फोनमध्ये इंटरनेट आणि व्हॉइस कॉल फ्री

मुंबई, दि. 22 - टेलीकॉम कंपनी भारती एअरटेल पुन्हा एकदा रिलायन्स जिओला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल स्वस्त  4G फोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे. जिओच्या 1500 रूपयांच्या फोनला टक्कर मिळावी यासाठी एअटरटेलच्या या फोनची किंमत 2 हजार पाचशे रूपये असण्याची शक्यता आहे.  इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातील किंवा सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस कंपनी हा फोन बाजारात आणू शकते. यासाठी फोन बनवणा-या कंपन्यांसोबत एअरटेलची चर्चा सुरू आहे. जिओप्रमाणे या फोनमध्ये इंटरनेट आणि व्हॉइस कॉल फ्री मिळण्याचीही शक्यता आहे.  हा फोन अॅंन्ड्रॉइड सिस्टिमवरच आधारित असेल तसंच यामध्ये गुगल प्ले-स्टोअरवरून अॅप डाउनलोड करण्याचं फिचरही मिळेल. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, फोन बनवणा-या कंपन्यांसोबत एअरटेलची चर्चा सुरू आहे. फोनमध्ये मोठी स्क्रीन, चांगला कॅमेरा आणि उत्तम बॅटरी बॅकअप असेल. 4G स्मार्टफोन्स बनवण्याबाबत दिग्गज टेलिकॉम कंपनीसोबत चर्चा अंतिम टप्प्यात आहे असे संकेत फोन निर्माती कंपनी लावा (Lava) किंवा कार्बन (Karbonn) या कंपन्यांनी दिले आहेत. मात्र, दोन्ही कंपनींकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीफ्री इंटरनेट आणि कॉलिंग सर्विसमुळे रिलायन्स जिओने देशभराती टेलीकॉम मार्केटमध्ये खळबळ उडवून दिली होती. आता 24 ऑगस्टपासून जिओचा केवळ 4G बुक करता येणार आहे. 24 ऑगस्टपासून जिओ फोन बुक करता येणार आहे. त्यासाठी 1500 रुपयांची अनामत रक्कम भरावी लागेल. पण, तीन वर्षं फोन वापरल्यानंतर ही रक्कम ग्राहक हवी तेव्हा परत घेऊ शकतात. या जिओ फोनवर 153 रुपयांत जिओ अनलिमिटेड धनधनाधन प्लॅन उपलब्ध असेल, तर जिओ ग्राहकांसाठी व्हॉइस कॉलिंग कायमच मोफत राहणार आहे. 50 कोटी मोबाइल यूजर्सपर्यंत जिओ फोन पोहोचवण्याचा निर्धार कंपनीनं केला आहे. हा फोन पूर्णपणे 'मेड इन इंडिया' असून त्याचं वर्णन रिलायन्सनं 'इंडिया का इंटेलिजन्ट फोन' असं केलं आहे.