शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

लहान मुलांच्या हातात फोन, टॅब देत आहात ?... तर मग वेळीच सावध व्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 09:15 IST

मुलांच्या हातात स्वत:चे मोबाइल, टॅब आणि लॅपटॉप कौतुकानं देणं हा काही स्टेटस सिम्बॉल नाही. ‘आम्ही किती आधुनिक’ म्हणून मिरवण्याचीही गोष्ट नाही.

मुंबई - मुलांच्या हातात स्वत:चे मोबाइल, टॅब आणि लॅपटॉप कौतुकानं देणं हा काही स्टेटस सिम्बॉल नाही. ‘आम्ही किती आधुनिक’ म्हणून मिरवण्याचीही गोष्ट नाही. उलट यामुळं तुमच्या मुलाला याचा फटका बसू शकतो. इंग्लंडमधील डॉक्टरांनी नुकत्याच दिलेल्या अहवालानुसार, जी मुलं फोन किंवा टॅबचा वापर करतात त्यांच्या बोटाच्या मांसपेशींचा विकास व्यवस्थित होत नाही. त्यामुळं त्यांना पेन अथवा पेन्सिल पकडताना त्रास होऊ शकतो.  ब्रिटनमधील हॉर्ट ऑफ इंग्लंड फाउंडेशन एनएचएस ट्रस्टमधील लहान मुलांचा थेरपिस्ट सैली म्हणतात की, सध्या शाळेत शिकत असलेल्या लहान मुलांच्या हाताचे स्नायू तितकेसे मजबूजत नाही जे दहा वर्षांपूर्वींच्या मुलांमध्ये पहायला मिळायचे. पेन, पेन्सिल पकडण्यासाठी आणि लिहण्यासाठी आपल्या बोटाच्या मासपेशीवर आपलं नियंत्रण असावं लागते.

या कौशल्याचा विकास करण्यासाठी मुलांना परिश्रम करावे लागतात. लहान वयामध्ये बोटाचा विकास होणं गरजेच आहे. त्यासाठी तो व्यायाम व्हावा. मोबाइल आणि टॅबच्या वापरामुळं मुलांचे पेन, पेन्सिल वापरण्याचं प्रमाण कमी झालं आहे. त्याचप्रमाणे ते मैदानी खेळही विसरले आहेत.  गार्डियनच्या वृत्तानुसार, मुलांची मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती मिळवण्यासाठी मैदानी खेळ खेळले पाहिजेत. त्यामुळं मासपेक्षीचा विकास चांगल्या प्रकारे होतील. पालकांनी आपल्या मुलांच्या हातात मोबाईल आणि टॅब देण्याऐवजी त्यांना मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहित करावं. 

लहान मुलांचा विकास कसा होतो यावर अभ्यास करणाऱ्या लंडनमधील एका संस्थेच्या प्रूंटी म्हणाल्या की, तंत्रज्ञानाचा आधिकाधिक वापर करणाऱ्या मुलांचे लेखन कौशल्य विकसित होण्यासाठी वेळ लागतो. इतर विद्यार्थांच्या तुलनेत त्यांना लिहताना त्रास होण्याचे प्रमाण आधिक आहे. अमेरिकेत झालेल्या एका संशोधनात स्मार्ट फोन्स, टॅब वापरामुळे अनेकांची स्मृती कमी होत असल्याचे आढळून आले आहे. स्मार्ट फोन्स आणि इंटरनेटमुळे मुलांची स्मरणशक्ती आणि एकाग्रता कमी होत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. 

अनेक जण लहान मुलांना विरंगुळा म्हणून स्वत:चे स्मार्ट फोन्स खेळण्यासाठी देतात किंवा शाळेतून घरी येताना मुले एकटीच येतात. त्यांना काही निरोप द्यायचा असल्यास पटकन संपर्क साधता यावा, म्हणून पालकच लहान मुलांना स्मार्ट फोन्स देतात. पण, त्याचा परिणाम त्यांच्या स्मरणशक्तीवर आणि एकाग्रतेवर होताना दिसत आहे. सतत स्मार्ट फोनचा वापर केल्यामुळे नैसर्गिकरीत्या मुलांची इतर गोष्टींत एकाग्रता कमी व्हायला लागते. या मुलांना स्मार्ट फोन दिला नाही, तर ते चिडचिडेपणा करायला लागतात, असेही काही तज्ञांचे मत आहे.

टॅग्स :Healthआरोग्यtechnologyतंत्रज्ञान