शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

देशात 25000 टेलिकॉम टॉवर उभारणार, 26000 कोटी रुपये खर्च होणार; काय आहे सरकारची योजना? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 17:42 IST

5G Service : सरकारने येत्या 500 दिवसांत देशभरात 25,000 दूरसंचार टॉवर बसवण्यास मंजुरी दिली आहे.

नवी दिल्ली : देशात 5G लाँच करण्यात आले आहे. आता काही मोठ्या शहरांमध्ये 5G सेवा देण्याची तयारी सुरू आहे. याबाबत दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भाष्य केले आहे.  2023 पर्यंत देशातील 80 ते 90 टक्के शहरांमध्ये 5G सेवा सुरू होईल, असे अश्विनी वैष्णव म्हणाले. दरम्यान, सरकारने येत्या 500 दिवसांत देशभरात 25,000 दूरसंचार टॉवर बसवण्यास मंजुरी दिली आहे.

दूरसंचार टॉवर उभारण्यासाठी जवळपास 26,000 कोटी रुपये खर्च होणार असल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. तसेच, या निर्णयामुळे दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांनाही 5G सुविधेचा लाभ मिळेल. हे देशातील सर्वात दुर्गम भागांना इंटरनेटशी जोडेल आणि डिजिटल क्रांती घडवून आणेल, असे अश्विनी वैष्णव यांचे म्हणणे आहे. तर टॉवर उभारण्यासाठी सरकार युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड वापरणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, टॉवर्स बसवण्यासाठी सरकारी मालकीच्या भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेडचा (BBNL)  वापर केला जाईल. डिजिटल इंडिया प्रेस कॉन्फरन्स आयटी मंत्र्यांच्या कार्यक्रमात बोलताना अश्विनी वैष्णव यांनी पीएम गति शक्तीमध्ये सामील होण्याबद्दल सांगितले होते. याअंतर्गत देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश करण्यात आला आहे. गती शक्ती योजना हे एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, ज्यामध्ये रेल्वे आणि रोडवेशी संबंधित एकूण 16 मंत्रालयांचा समावेश आहे. या अंतर्गत सर्वजण मिळून योजना आखतात आणि त्यावर सहमती दर्शवतात.

कार्यक्रमादरम्यान अश्विनी वैष्णव यांनी सबका साथ, सबका विकास यावर भर दिला आणि सांगितले की, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश डिजिटल इंडियाला उच्च पातळीवर नेण्यासाठी, आत्मनिर्भर भारताची स्वप्ने साकार करण्यासाठी आणि एक ट्रिलियन डॉलरची डिजिटल अर्थव्यवस्था करण्यासाठी महत्त्वाचे आहेत. विशेष म्हणजे, दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी सांगितले होते की, सरकार संपूर्ण भारतात 5G तंत्रज्ञानासाठी 100 प्रयोगशाळा स्थापन करण्याचा विचार करत आहे आणि त्यापैकी किमान 12 प्रयोगशाळांचा वापर विद्यार्थ्यांसाठी चाचण्या आणि प्रयोग करण्यासाठी केला जाईल.

टॅग्स :Internetइंटरनेटtechnologyतंत्रज्ञान