शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

देशात 25000 टेलिकॉम टॉवर उभारणार, 26000 कोटी रुपये खर्च होणार; काय आहे सरकारची योजना? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 17:42 IST

5G Service : सरकारने येत्या 500 दिवसांत देशभरात 25,000 दूरसंचार टॉवर बसवण्यास मंजुरी दिली आहे.

नवी दिल्ली : देशात 5G लाँच करण्यात आले आहे. आता काही मोठ्या शहरांमध्ये 5G सेवा देण्याची तयारी सुरू आहे. याबाबत दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भाष्य केले आहे.  2023 पर्यंत देशातील 80 ते 90 टक्के शहरांमध्ये 5G सेवा सुरू होईल, असे अश्विनी वैष्णव म्हणाले. दरम्यान, सरकारने येत्या 500 दिवसांत देशभरात 25,000 दूरसंचार टॉवर बसवण्यास मंजुरी दिली आहे.

दूरसंचार टॉवर उभारण्यासाठी जवळपास 26,000 कोटी रुपये खर्च होणार असल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. तसेच, या निर्णयामुळे दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांनाही 5G सुविधेचा लाभ मिळेल. हे देशातील सर्वात दुर्गम भागांना इंटरनेटशी जोडेल आणि डिजिटल क्रांती घडवून आणेल, असे अश्विनी वैष्णव यांचे म्हणणे आहे. तर टॉवर उभारण्यासाठी सरकार युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड वापरणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, टॉवर्स बसवण्यासाठी सरकारी मालकीच्या भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेडचा (BBNL)  वापर केला जाईल. डिजिटल इंडिया प्रेस कॉन्फरन्स आयटी मंत्र्यांच्या कार्यक्रमात बोलताना अश्विनी वैष्णव यांनी पीएम गति शक्तीमध्ये सामील होण्याबद्दल सांगितले होते. याअंतर्गत देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश करण्यात आला आहे. गती शक्ती योजना हे एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, ज्यामध्ये रेल्वे आणि रोडवेशी संबंधित एकूण 16 मंत्रालयांचा समावेश आहे. या अंतर्गत सर्वजण मिळून योजना आखतात आणि त्यावर सहमती दर्शवतात.

कार्यक्रमादरम्यान अश्विनी वैष्णव यांनी सबका साथ, सबका विकास यावर भर दिला आणि सांगितले की, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश डिजिटल इंडियाला उच्च पातळीवर नेण्यासाठी, आत्मनिर्भर भारताची स्वप्ने साकार करण्यासाठी आणि एक ट्रिलियन डॉलरची डिजिटल अर्थव्यवस्था करण्यासाठी महत्त्वाचे आहेत. विशेष म्हणजे, दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी सांगितले होते की, सरकार संपूर्ण भारतात 5G तंत्रज्ञानासाठी 100 प्रयोगशाळा स्थापन करण्याचा विचार करत आहे आणि त्यापैकी किमान 12 प्रयोगशाळांचा वापर विद्यार्थ्यांसाठी चाचण्या आणि प्रयोग करण्यासाठी केला जाईल.

टॅग्स :Internetइंटरनेटtechnologyतंत्रज्ञान