शहरं
Join us  
Trending Stories
1
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
2
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
3
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
4
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
5
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
6
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
7
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
8
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
9
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
10
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
11
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
12
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
13
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
14
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
15
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
16
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
17
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
18
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
19
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
20
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Daily Top 2Weekly Top 5

5G Launched in India: 5G साठी कमीतकमी १५ हजार खर्च करावा लागणार; तरच वापरता येणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 15:10 IST

5G Launched in India: एअरटेलने काही दिवसांपूर्वी आपण नवीन ५जी सिम तयार केल्याचे म्हटले आहे.

देशात आजपासून ५जी नेटवर्कची घोषणा झाली आहे. एअरटेलने आजपासून आठ शहरांत ५जी सेवा सुरु करणार असल्याचे म्हटले आहे. तर रिलायन्सने दिवाळीपर्यंत देशातील महत्वाच्या शहरांमध्ये सेवा सुरु करणार असल्याचे म्हटले आहे. व्होडाफोनचा तर पत्ताच नाहीय. अशावेळी तुम्हाला ५जी कसे वापरता येणार? त्यासाठी सिमकार्ड बदलावे लागणार की मोबाईल आदीची माहिती घेणे महत्वाचे आहे. 

5G Launched in India: एअरटेल की रिलायन्स? कोणाचे 5G नेटवर्क पहिले सुरु होणार; मित्तलांनी अंबानींना ऐकवलेच

नवा मोबाईल घेतला असेल तर सर्वात महत्वाचे म्हणजे त्याचे बँडस् कोणते आहेत ते. १०-११ हजारापासून ५जी फोन बाजारात आहेत. त्यामध्ये दोन बँडपासून बँड सुरु होतात. काही मोबाईलमध्ये पाच, सात, ११ आणि १३ असे बँड्स देण्यात आले आहेत. कमी बँडच्या स्मार्टफोनवर रिलायन्सची सेवा मिळू शकते, परंतू तिचा वेगही कमी असण्याची शक्यता आहे. म्हणजे ४जी पेक्षा थोडा जास्त असेल परंतू एअरटेलच्या हाय बँडपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. यासाठी कमीतकमी १५ हजारांचा स्मार्टफोन घ्यावा लागणार आहे. 

आता प्रश्न उरतो तो सिमकार्डचा. एअरटेलने काही दिवसांपूर्वी आपण नवीन ५जी सिम तयार केल्याचे म्हटले आहे. परंतु, तुम्ही वापरत असलेल्या ४जी सिमवरच ५जी नेटवर्क वापरता येणार आहे. या दोन्ही नेटवर्कच्या सिममधील टेक्निकमध्ये फारसा फरक नाहीय. सिमच्या माध्यमातून तुम्हाला युनिक आयडी दिला जातो. त्यानुसार तुमचे नेटवर्क आणि प्लान अॅक्टिव्ह असतो. यामुळे तुम्हाला नवीन सिम घेण्याची गरज पडणार नाही. 

जसे ४जी सोबत झाले तसेच ५जी सोबत होणार आहे. तुम्हाला ५जी वापरण्यासाठी ५जी फोनच वापरावा लागणार आहे. जर कंपन्यांनी खास ५जी सिम दिले तर सिमकार्डच्या साईजमध्ये देखील कोणताही बदल असणार नाही. परंतू, 5G SIM असले काय आणि 4G SIM असले काय, तुम्ही तेव्हाच ५जी नेटवर्क वापरू शकता जेव्हा तुम्ही ५जी चे रिचार्ज मारणार. म्हणजेच ५जी च्या प्लॅननुसार तुम्हाला डेटा वापरता येणार आहे. 

'आज 130 कोटी भारतीयांना 5G च्या रूपाने एक अद्भुत भेट मिळत आहे. 5G नव्या युगाची दार ठोठावत आहे. ही अनेक संधींची सुरुवात आहे. यासाठी मी प्रत्येक भारतीयाचे खूप खूप अभिनंदन करतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशात 5G सेवांचा शुभारंभ करण्यात आला. याअगोदर देशाला बाहेरुन मोबाईल आयात करावे लागत होते, पण आता देश मोबाईल निर्यात करत आहे. जगात भारत मोबाईल निर्मिती करण्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. आत्मनिर्भर भारताने हे करुन दाखवले आहे, असंही मोदी म्हणाले.

टॅग्स :5G५जी