शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

5G Launched in India: 5G साठी कमीतकमी १५ हजार खर्च करावा लागणार; तरच वापरता येणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 15:10 IST

5G Launched in India: एअरटेलने काही दिवसांपूर्वी आपण नवीन ५जी सिम तयार केल्याचे म्हटले आहे.

देशात आजपासून ५जी नेटवर्कची घोषणा झाली आहे. एअरटेलने आजपासून आठ शहरांत ५जी सेवा सुरु करणार असल्याचे म्हटले आहे. तर रिलायन्सने दिवाळीपर्यंत देशातील महत्वाच्या शहरांमध्ये सेवा सुरु करणार असल्याचे म्हटले आहे. व्होडाफोनचा तर पत्ताच नाहीय. अशावेळी तुम्हाला ५जी कसे वापरता येणार? त्यासाठी सिमकार्ड बदलावे लागणार की मोबाईल आदीची माहिती घेणे महत्वाचे आहे. 

5G Launched in India: एअरटेल की रिलायन्स? कोणाचे 5G नेटवर्क पहिले सुरु होणार; मित्तलांनी अंबानींना ऐकवलेच

नवा मोबाईल घेतला असेल तर सर्वात महत्वाचे म्हणजे त्याचे बँडस् कोणते आहेत ते. १०-११ हजारापासून ५जी फोन बाजारात आहेत. त्यामध्ये दोन बँडपासून बँड सुरु होतात. काही मोबाईलमध्ये पाच, सात, ११ आणि १३ असे बँड्स देण्यात आले आहेत. कमी बँडच्या स्मार्टफोनवर रिलायन्सची सेवा मिळू शकते, परंतू तिचा वेगही कमी असण्याची शक्यता आहे. म्हणजे ४जी पेक्षा थोडा जास्त असेल परंतू एअरटेलच्या हाय बँडपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. यासाठी कमीतकमी १५ हजारांचा स्मार्टफोन घ्यावा लागणार आहे. 

आता प्रश्न उरतो तो सिमकार्डचा. एअरटेलने काही दिवसांपूर्वी आपण नवीन ५जी सिम तयार केल्याचे म्हटले आहे. परंतु, तुम्ही वापरत असलेल्या ४जी सिमवरच ५जी नेटवर्क वापरता येणार आहे. या दोन्ही नेटवर्कच्या सिममधील टेक्निकमध्ये फारसा फरक नाहीय. सिमच्या माध्यमातून तुम्हाला युनिक आयडी दिला जातो. त्यानुसार तुमचे नेटवर्क आणि प्लान अॅक्टिव्ह असतो. यामुळे तुम्हाला नवीन सिम घेण्याची गरज पडणार नाही. 

जसे ४जी सोबत झाले तसेच ५जी सोबत होणार आहे. तुम्हाला ५जी वापरण्यासाठी ५जी फोनच वापरावा लागणार आहे. जर कंपन्यांनी खास ५जी सिम दिले तर सिमकार्डच्या साईजमध्ये देखील कोणताही बदल असणार नाही. परंतू, 5G SIM असले काय आणि 4G SIM असले काय, तुम्ही तेव्हाच ५जी नेटवर्क वापरू शकता जेव्हा तुम्ही ५जी चे रिचार्ज मारणार. म्हणजेच ५जी च्या प्लॅननुसार तुम्हाला डेटा वापरता येणार आहे. 

'आज 130 कोटी भारतीयांना 5G च्या रूपाने एक अद्भुत भेट मिळत आहे. 5G नव्या युगाची दार ठोठावत आहे. ही अनेक संधींची सुरुवात आहे. यासाठी मी प्रत्येक भारतीयाचे खूप खूप अभिनंदन करतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशात 5G सेवांचा शुभारंभ करण्यात आला. याअगोदर देशाला बाहेरुन मोबाईल आयात करावे लागत होते, पण आता देश मोबाईल निर्यात करत आहे. जगात भारत मोबाईल निर्मिती करण्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. आत्मनिर्भर भारताने हे करुन दाखवले आहे, असंही मोदी म्हणाले.

टॅग्स :5G५जी