शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
5
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
6
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
7
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
8
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
9
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
10
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
11
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
12
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
13
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
14
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
15
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
16
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
18
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
19
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
20
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

5 जीचे काऊंटडाऊन सुरु; 100 दिवसांत चाचणी सुरु करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 10:17 IST

देशात 5 जी सुविधा असणारे फोन विक्रीस सुरुवात झाली असून सरकारनेही कंबर कसली आहे.

नवी दिल्ली : देशात 5 जी सुविधा असणारे फोन विक्रीस सुरुवात झाली असून सरकारनेही कंबर कसली आहे. येत्या 100 दिवसांत 5 जी सेवेची चाचणी सुरु होणार असल्याची घोषणा दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारताना केली. तसेच स्पेक्ट्रम लिलावही या वर्षीच केला जाणार असून अद्याप हुवाई कंपनीच्या सहभागाबाबत सांगता येत नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

देशातील एक लाख गावांना डिजिटल बनविण्याचे लक्ष्य असल्याचे प्रसाद म्हणाले. टेलिकॉम उत्पादन वाढविण्यासोबतच तोट्यात असलेल्या बीएसएनएल आणि एमटीएनएल या दोन सरकारी कंपन्यांचे पुनरुज्जीवन करण्याचीही घोषणा त्यांनी केली. 

मनोज सिन्हा यांनी हे मंत्रालय गेली तीन वर्षे हाताळले होते. एक लाख गावांना डिजिटल करण्यासाठी पाच लाख वाय फाय स्पॉट तयार केले जाणार आहेत. याद्वारे प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण, ई-हॉस्पिटल, ई-स्कॉलरशिप सारख्या योजनांना प्रोत्साहन मिळण्यास मदत मिळेल. तसेच भारतनेट या ऑप्टिकल फायबर नेटवर्कद्वारे ब्रॉडबँड सुविधा देण्याच्या कामात वेग आणणार असल्याचेही प्रसाद यांनी सांगितले.

 5 जी चाचणीसोबत स्पेक्ट्रम लिलाव आणि लायसन्सची व्यवस्था केली जाणार आहे. मात्र, यासाठी कंपन्यांना ही सुविधा समाजातील वंचित लोकांपर्यंत पोहोचविण्याची अट असणार आहे. परदेशी कंपन्या लिलावात भाग घेणार असल्याकडे लक्ष वेधले असता राष्ट्रीय सुरक्षेची काळजी घेतली जाईल असेही त्यांनी सांगितले. तसेच 5 जी सेवेमध्ये अग्रेसर असलेली कंपनी हुवावे भारतात सहभागी होईल का यावर अद्याप कल्पना नसल्याचे प्रसाद यांनी सांगितले. या कंपनीच्या एका उपकंपनीवर अमेरिकेमध्ये बंदी घालण्यात आली आहे. याचा फटका बसल्यास हुवाईची उपकरणे भारतात उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे. 

टॅग्स :Internetइंटरनेट