शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

5 जीचे काऊंटडाऊन सुरु; 100 दिवसांत चाचणी सुरु करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 10:17 IST

देशात 5 जी सुविधा असणारे फोन विक्रीस सुरुवात झाली असून सरकारनेही कंबर कसली आहे.

नवी दिल्ली : देशात 5 जी सुविधा असणारे फोन विक्रीस सुरुवात झाली असून सरकारनेही कंबर कसली आहे. येत्या 100 दिवसांत 5 जी सेवेची चाचणी सुरु होणार असल्याची घोषणा दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारताना केली. तसेच स्पेक्ट्रम लिलावही या वर्षीच केला जाणार असून अद्याप हुवाई कंपनीच्या सहभागाबाबत सांगता येत नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

देशातील एक लाख गावांना डिजिटल बनविण्याचे लक्ष्य असल्याचे प्रसाद म्हणाले. टेलिकॉम उत्पादन वाढविण्यासोबतच तोट्यात असलेल्या बीएसएनएल आणि एमटीएनएल या दोन सरकारी कंपन्यांचे पुनरुज्जीवन करण्याचीही घोषणा त्यांनी केली. 

मनोज सिन्हा यांनी हे मंत्रालय गेली तीन वर्षे हाताळले होते. एक लाख गावांना डिजिटल करण्यासाठी पाच लाख वाय फाय स्पॉट तयार केले जाणार आहेत. याद्वारे प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण, ई-हॉस्पिटल, ई-स्कॉलरशिप सारख्या योजनांना प्रोत्साहन मिळण्यास मदत मिळेल. तसेच भारतनेट या ऑप्टिकल फायबर नेटवर्कद्वारे ब्रॉडबँड सुविधा देण्याच्या कामात वेग आणणार असल्याचेही प्रसाद यांनी सांगितले.

 5 जी चाचणीसोबत स्पेक्ट्रम लिलाव आणि लायसन्सची व्यवस्था केली जाणार आहे. मात्र, यासाठी कंपन्यांना ही सुविधा समाजातील वंचित लोकांपर्यंत पोहोचविण्याची अट असणार आहे. परदेशी कंपन्या लिलावात भाग घेणार असल्याकडे लक्ष वेधले असता राष्ट्रीय सुरक्षेची काळजी घेतली जाईल असेही त्यांनी सांगितले. तसेच 5 जी सेवेमध्ये अग्रेसर असलेली कंपनी हुवावे भारतात सहभागी होईल का यावर अद्याप कल्पना नसल्याचे प्रसाद यांनी सांगितले. या कंपनीच्या एका उपकंपनीवर अमेरिकेमध्ये बंदी घालण्यात आली आहे. याचा फटका बसल्यास हुवाईची उपकरणे भारतात उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे. 

टॅग्स :Internetइंटरनेट