शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

५जी येण्यापूर्वी ४जी महागणार; कंपन्या ३० टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 05:57 IST

सोमवारी ५जी स्पेक्ट्रमचा लिलाव पूर्ण झाला. १.५ लाख कोटी रुपयांची बोली कंपन्यांनी लावली. ही माेठी गुंतवणूक लक्षात घेता कंपन्या ५जी सेवेचे दर वाढीव ठेवतील, असा अंदाज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : देशात ५जी दूरसंचार सेवा सुरू होण्यापूर्वीच ४जी सेवेचे दर वाढू शकतात. क्रिसिल रेटिंग्ज, नोमुरा आणि गोल्डमॅन सॅक्सच्या अनुमानानुसार, २०२२ मध्ये दूरसंचार कंपन्या ३० टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्याची शक्यता आहे.

सोमवारी ५जी स्पेक्ट्रमचा लिलाव पूर्ण झाला. १.५ लाख कोटी रुपयांची बोली कंपन्यांनी लावली. ही माेठी गुंतवणूक लक्षात घेता कंपन्या ५जी सेवेचे दर वाढीव ठेवतील, असा अंदाज आहे. क्रिसिलने म्हटले की, लोकांनी ५जी सेवेचा स्वीकार करावा यासाठी कंपन्या ४जी सेवेचे दर वाढविण्याची शक्यता आहे. सध्या कंपन्या देत असलेल्या ४जीच्या १.५ जीबी प्रतिदिन डाटा प्लॅनच्या दरात ३० टक्क्यांपर्यंत वाढ केली जाऊ शकते.

५जी सेवेसाठी कंपन्यांना मोठी गुंतवणूक करावी लागणार आहे. ५जी सेवेसाठी दूरसंचार कंपन्या ७०० मेगाहर्ट्जच्या स्पेक्ट्रमला प्राधान्य देत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे हे स्पेक्ट्रम हाय फ्रिक्वेन्सीमध्ये येते. त्यासाठी कंपन्यांना टॉवरांची संख्या कमी ठेवली तरी चालेल. त्यामुळे कंपन्यांचा पायाभूत सुविधांवरील खर्च मर्यादित राहण्यास मदत होईल.

१५ हजारांचा स्मार्टफोेन आहे?

सुरुवातीला कंपन्या प्रीमियम ग्राहकांना म्हणजेच १५ हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचे स्मार्टफोन ज्यांच्याकडे आहेत त्यांनाच ५जी सेवा देतील, असा अंदाज आहे.

५जी कधी येणार?

एका अंदाजानुसार, आगामी १० ते १५ दिवसांत कंपन्यांना ५जी स्पेक्ट्रमचे वितरण होईल. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत वा वर्षाच्या अखेरपर्यंत औद्योगिक व व्यावसायिकांसारख्या निवडक वापरकर्त्यांना ५जी सेवा उपलब्ध होईल. सर्वसामान्य लोकांपर्यंत ५जी सेवा पोहोचायला मात्र २ ते ३ वर्षे लागतील.

कधी होणार दरवाढ?

गोल्डमॅन सॅक्सने म्हटले आहे की, आमच्या अंदाजानुसार २०२२ च्या अखेरपर्यंत दूरसंचार कंपन्या पुन्हा एकदा दरवाढ करतील. हा या क्षेत्रातील उत्पन्नवृद्धीचा पुढील टप्पा असेल, असे आम्हाला वाटते. ५जी स्पेक्ट्रम लिलावात रिलायन्स जिओने सर्वाधिक बोली लावली आहे. त्यामुळे कंपनी येणाऱ्या ५जी सेवेत सर्वाधिक मजबूत स्थितीत आहे.

टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओAirtelएअरटेलVodafoneव्होडाफोन