शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

५जी येण्यापूर्वी ४जी महागणार; कंपन्या ३० टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 05:57 IST

सोमवारी ५जी स्पेक्ट्रमचा लिलाव पूर्ण झाला. १.५ लाख कोटी रुपयांची बोली कंपन्यांनी लावली. ही माेठी गुंतवणूक लक्षात घेता कंपन्या ५जी सेवेचे दर वाढीव ठेवतील, असा अंदाज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : देशात ५जी दूरसंचार सेवा सुरू होण्यापूर्वीच ४जी सेवेचे दर वाढू शकतात. क्रिसिल रेटिंग्ज, नोमुरा आणि गोल्डमॅन सॅक्सच्या अनुमानानुसार, २०२२ मध्ये दूरसंचार कंपन्या ३० टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्याची शक्यता आहे.

सोमवारी ५जी स्पेक्ट्रमचा लिलाव पूर्ण झाला. १.५ लाख कोटी रुपयांची बोली कंपन्यांनी लावली. ही माेठी गुंतवणूक लक्षात घेता कंपन्या ५जी सेवेचे दर वाढीव ठेवतील, असा अंदाज आहे. क्रिसिलने म्हटले की, लोकांनी ५जी सेवेचा स्वीकार करावा यासाठी कंपन्या ४जी सेवेचे दर वाढविण्याची शक्यता आहे. सध्या कंपन्या देत असलेल्या ४जीच्या १.५ जीबी प्रतिदिन डाटा प्लॅनच्या दरात ३० टक्क्यांपर्यंत वाढ केली जाऊ शकते.

५जी सेवेसाठी कंपन्यांना मोठी गुंतवणूक करावी लागणार आहे. ५जी सेवेसाठी दूरसंचार कंपन्या ७०० मेगाहर्ट्जच्या स्पेक्ट्रमला प्राधान्य देत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे हे स्पेक्ट्रम हाय फ्रिक्वेन्सीमध्ये येते. त्यासाठी कंपन्यांना टॉवरांची संख्या कमी ठेवली तरी चालेल. त्यामुळे कंपन्यांचा पायाभूत सुविधांवरील खर्च मर्यादित राहण्यास मदत होईल.

१५ हजारांचा स्मार्टफोेन आहे?

सुरुवातीला कंपन्या प्रीमियम ग्राहकांना म्हणजेच १५ हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचे स्मार्टफोन ज्यांच्याकडे आहेत त्यांनाच ५जी सेवा देतील, असा अंदाज आहे.

५जी कधी येणार?

एका अंदाजानुसार, आगामी १० ते १५ दिवसांत कंपन्यांना ५जी स्पेक्ट्रमचे वितरण होईल. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत वा वर्षाच्या अखेरपर्यंत औद्योगिक व व्यावसायिकांसारख्या निवडक वापरकर्त्यांना ५जी सेवा उपलब्ध होईल. सर्वसामान्य लोकांपर्यंत ५जी सेवा पोहोचायला मात्र २ ते ३ वर्षे लागतील.

कधी होणार दरवाढ?

गोल्डमॅन सॅक्सने म्हटले आहे की, आमच्या अंदाजानुसार २०२२ च्या अखेरपर्यंत दूरसंचार कंपन्या पुन्हा एकदा दरवाढ करतील. हा या क्षेत्रातील उत्पन्नवृद्धीचा पुढील टप्पा असेल, असे आम्हाला वाटते. ५जी स्पेक्ट्रम लिलावात रिलायन्स जिओने सर्वाधिक बोली लावली आहे. त्यामुळे कंपनी येणाऱ्या ५जी सेवेत सर्वाधिक मजबूत स्थितीत आहे.

टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओAirtelएअरटेलVodafoneव्होडाफोन