शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

५जी येण्यापूर्वी ४जी महागणार; कंपन्या ३० टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 05:57 IST

सोमवारी ५जी स्पेक्ट्रमचा लिलाव पूर्ण झाला. १.५ लाख कोटी रुपयांची बोली कंपन्यांनी लावली. ही माेठी गुंतवणूक लक्षात घेता कंपन्या ५जी सेवेचे दर वाढीव ठेवतील, असा अंदाज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : देशात ५जी दूरसंचार सेवा सुरू होण्यापूर्वीच ४जी सेवेचे दर वाढू शकतात. क्रिसिल रेटिंग्ज, नोमुरा आणि गोल्डमॅन सॅक्सच्या अनुमानानुसार, २०२२ मध्ये दूरसंचार कंपन्या ३० टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्याची शक्यता आहे.

सोमवारी ५जी स्पेक्ट्रमचा लिलाव पूर्ण झाला. १.५ लाख कोटी रुपयांची बोली कंपन्यांनी लावली. ही माेठी गुंतवणूक लक्षात घेता कंपन्या ५जी सेवेचे दर वाढीव ठेवतील, असा अंदाज आहे. क्रिसिलने म्हटले की, लोकांनी ५जी सेवेचा स्वीकार करावा यासाठी कंपन्या ४जी सेवेचे दर वाढविण्याची शक्यता आहे. सध्या कंपन्या देत असलेल्या ४जीच्या १.५ जीबी प्रतिदिन डाटा प्लॅनच्या दरात ३० टक्क्यांपर्यंत वाढ केली जाऊ शकते.

५जी सेवेसाठी कंपन्यांना मोठी गुंतवणूक करावी लागणार आहे. ५जी सेवेसाठी दूरसंचार कंपन्या ७०० मेगाहर्ट्जच्या स्पेक्ट्रमला प्राधान्य देत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे हे स्पेक्ट्रम हाय फ्रिक्वेन्सीमध्ये येते. त्यासाठी कंपन्यांना टॉवरांची संख्या कमी ठेवली तरी चालेल. त्यामुळे कंपन्यांचा पायाभूत सुविधांवरील खर्च मर्यादित राहण्यास मदत होईल.

१५ हजारांचा स्मार्टफोेन आहे?

सुरुवातीला कंपन्या प्रीमियम ग्राहकांना म्हणजेच १५ हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचे स्मार्टफोन ज्यांच्याकडे आहेत त्यांनाच ५जी सेवा देतील, असा अंदाज आहे.

५जी कधी येणार?

एका अंदाजानुसार, आगामी १० ते १५ दिवसांत कंपन्यांना ५जी स्पेक्ट्रमचे वितरण होईल. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत वा वर्षाच्या अखेरपर्यंत औद्योगिक व व्यावसायिकांसारख्या निवडक वापरकर्त्यांना ५जी सेवा उपलब्ध होईल. सर्वसामान्य लोकांपर्यंत ५जी सेवा पोहोचायला मात्र २ ते ३ वर्षे लागतील.

कधी होणार दरवाढ?

गोल्डमॅन सॅक्सने म्हटले आहे की, आमच्या अंदाजानुसार २०२२ च्या अखेरपर्यंत दूरसंचार कंपन्या पुन्हा एकदा दरवाढ करतील. हा या क्षेत्रातील उत्पन्नवृद्धीचा पुढील टप्पा असेल, असे आम्हाला वाटते. ५जी स्पेक्ट्रम लिलावात रिलायन्स जिओने सर्वाधिक बोली लावली आहे. त्यामुळे कंपनी येणाऱ्या ५जी सेवेत सर्वाधिक मजबूत स्थितीत आहे.

टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओAirtelएअरटेलVodafoneव्होडाफोन