शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

4G की 5G? कोणता स्मार्टफोन घ्यायचा? संभ्रमात आहात ना, हे वाचा...

By हेमंत बावकर | Updated: January 20, 2021 12:50 IST

Want to Buy 5G Smartphone or 4g better choice : बाजारात मोटरोला, शाओमी, वनप्लस, रिअलमी  सारख्या कंपन्या 5G फोन आणू लागल्या आहेत. सध्या सर्वात स्वस्त असलेला 5G स्मार्टफोन हा मोटरोलाचाच आहे. त्यानंतर अन्य कंपन्यांचा नंबर लागतो. परंतू, यामुळे नवीन फोन घेऊ इच्छिनाऱ्यांसाठी 4G की 5G स्मार्टफोन घ्यायचा यावरून कन्फ्यूजन पहायला मिळतेय. चला जाणून घेऊया...

- हेमंत बावकर

भारतात सध्या 5G तंत्रज्ञानाची चर्चा आहे. सध्या केवळ चर्चाच आहे, बरं का. परंतू बाजारात मोटरोला, शाओमी, वनप्लस, रिअलमी  सारख्या कंपन्या 5G फोन आणू लागल्या आहेत. सध्या सर्वात स्वस्त असलेला 5G स्मार्टफोन हा मोटरोलाचाच आहे. त्यानंतर अन्य कंपन्यांचा नंबर लागतो. परंतू, यामुळे नवीन फोन घेऊ इच्छिनाऱ्यांसाठी 4G की 5G स्मार्टफोन घ्यायचा यावरून कन्फ्यूजन पहायला मिळतेय. चला जाणून घेऊया...

एक उदाहरण घेऊया, पती-पत्नीकडे सध्या दोन 4G फोन आहेत. परंतू पत्नीला नवीन फोन घ्यायचा आहे, मग नवीन तंत्रज्ञानाचा घ्यायचा की सध्या सुरु आहे त्या 4जीचा. 4जी फोन 6000 रुपयांपासून सुरु आहेत. तर 5जी चे फोन 20000 रुपयांपासून. भविष्याचा विचार करता तिप्पट पैसे घालून 5जीचा फोन घेणे परवडेल का? की त्यापेक्षा 9 ते 10 हजारांत चांगला फोन घेतला तर परवडेल असा प्रश्न पतीराजांच्या मनात घोळत आहे. पतीराज म्हणतायत ५जी आणि पत्नी म्हणतेय कशाला एवढे पैसे खर्च करताय, ४जीच घ्या. आता गणित समजून घेऊया.

 साधारण चार वर्षांपूर्वी 4जी ला सुरुवात झाली. पुणे, मुंबईसारख्या शहरांत पहिल्यांदा ट्रायल म्हणून देण्यात येत होते. ग्रामीण महाराष्ट्रात 4जी यायला साधारण दीड-दोन वर्षे गेली. मग अजून 5जी स्पेक्ट्रमचा लिलाव झालेला नसताना, मुंबई-पुण्यात आलेले नसताना आणि त्यापलीकडे जाऊन अद्याप कंपन्यांची चाचणी प्रक्रिया सुरु झालेली नसताना 5 जी फोन घेणे परवडणारे असेल का, नाही ना. अजून शहरातच आले नाही तर गावात कुठून येणार, हा प्रश्न देखील आहेच. 

यामुळे जर नवीन फोन घ्यायचा असेल तर गावातील लोकांना 4जी शिवाय पर्याय नाही. जसे ४जी फोन स्वस्त झाले तसे ५जी फोनही स्वस्त होतील. कारण गेल्या आठवड्यात कमी किंमतीच्या 4जी फोनसाठी जो चिपसेट लागतो तसाच चिपसेट 5जीसाठी विकसित झाला आहे. मग आता 20000 ते 50000 रुपयांचे 5G स्मार्टफोन विकत घेऊन ते पुढील वर्षभर 4जीसाठी वापरणार आणि वर्षभराने त्या फोनची किंमत निम्मी होणार, या व्यवहारात काय हशील. कदाचित सहा महिन्यांनी आणखी काहीतरी नवीन फिचर असलेले फोन 20000 हजारात मिळू शकतील. 

देशात 5G चे इन्फ्रास्ट्रक्चर कधीपर्यंत उपलब्ध होईल, स्पेक्ट्रम लिलाव परवडणारे असतील की नाही, कंपन्या स्पेक्ट्रम घेतील की नाही हे देखील माहिती नाहीय. 5G चे नेटवर्क उभारण्यासाठी जो पैसा लागेल तो कुठून येणार हा देखील एक या महामंदीच्या काळातला मोठा प्रश्नच आहे. कंपन्यांनाही माहिती नाहीय की यातून फायदा होईल की नाही. व्होडाफोन, एअरटेल, बीएसएनएल या कंपन्या सध्या लॉस मध्ये आहेत. एकटी जिओच फायद्यात चाललेली आहे. बीएसएनएलकडे तर अद्याप ४जी देखील आलेले नाही. 

शहरांमध्ये ५जी उपयुक्त?5G चे नेटवर्क जरी शहरात आले तरीही ते हाय स्पीड असल्याने अडथळे पार करू शकणार नाही. यामुळे शहरांतील इमारतींमध्ये हे नेटवर्क जाण्याची शक्यता कमी आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर टॉवर उभारावे लागणार आहेत. यासाठीदेखील खर्च मोठा आहे. शहरात हा खर्च भरून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ग्राहक मिळतीलही. यामुळेच जगभरातही केवळ शहरांतच ५जी नेटवर्क देण्यात येत आहे. या साऱ्या परिस्थितीचा विचार करता ग्रामीण काय की शहरी काय, सध्याच्या काळात ५जी फोन न घेता ४जी घेतलेला उत्तम. ५जी नेटवर्क आल्यावरच 5G फोनचा विचार केल्यास फायद्याचे ठरेल. बाकी चारचौघांत मिरविण्यासाठी ५जी फोन घेतल्यास काहीच समस्या नाही.  

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानMotorolaमोटोरोलाxiaomiशाओमीOneplus mobileवनप्लस मोबाईल