शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

गणपती विसर्जन करताना विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 10:39 IST

सोलापूर तालुक्यातील नान्नज येथील गणपतीचे विसर्जन करताना तोल जाऊन पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

सोलापूर : सोलापूर तालुक्यातील नान्नज येथील गणपतीचे विसर्जन करताना तोल जाऊन पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. समाधान हनुमंत गवळी (30) या तरुणाचं नाव असून वैभव पाटील यांच्या शेतातील विहिरीमध्ये त्याचा मृत्यू झाला. शनिवारी (22 सप्टेंबर) रात्री ही घटना घडली. 

नान्नज येथील वैभव पाटील यांच्या शेतामध्ये गेल्या दोन दिवसांपासून गणेश मूर्तीचे विसर्जन सुरू आहे. समाधान गवळी येणाऱ्या विसर्जन मिरवणुकांच्या मूर्तीचे विसर्जन करीत होता. पावणे नऊ वाजता शिवनेरी तरुण मंडळाचा गणपती विसर्जनासाठी आला होता. या गणपतीचं विसर्जन करण्यासाठी समाधान गवळी मूर्ती घेऊन खाली उतरत असताना अचानक तोल जाऊन तो पाण्यात पडला. पाण्यात पडल्यानंतर तो लवकर वर आला नाही त्यामुळे जवळ असलेल्या इतर कार्यकर्त्यांनी पाण्यामध्ये उड्या मारल्या आणि समाधान गवळी याला बाहेर काढले. समाधान गवळी यांच्या डोक्याला मार लागला होता. त्याला उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र समाधान गवळी याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी सिव्हिल पोलिस चौकीत मृत्यूची नोंद झाली आहे.

 

टॅग्स :SolapurसोलापूरGanesh Visarjanगणेश विसर्जनDeathमृत्यू