शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

साखर निर्यात, इथेनॉल निर्मितीने कारखानदारी अडचणीत : यशवंत कुलकर्णी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 20:30 IST

साखर निर्यातीमध्ये ९०० रुपयांची तूट; इथेनॉलला उठाव कमी

ठळक मुद्देस्वदेशी व जैविक धोरणांतर्गत इथेनॉल निर्मितीला अधिक प्रोत्साहनकारखानदारांना साखर निर्यात करणे व इथेनॉल निर्मिती करणे परवडत नाही़

श्रीपूर : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये साखरेचे भाव प्रति क्विंटल २ हजारापर्यंत आहेत़ साखर कारखानदारांनी बँकेकडून त्या साखरेवर २९०० रुपयांप्रमाणे कर्ज घेतले आहे़ साखर निर्यात करायचे ठरवले तर ९०० रुपयांची तूट कारखानदारांना सहन करावी लागणार आहे़ शिवाय इथेनॉल निर्मिती केली तर भारतात इंधनामध्ये केवळ ५ टक्के इथेनॉल वापरले जाते़ त्यामुळे त्याचा उठाव कमी आहे़ या दोन्ही बाबी लक्षात घेता साखर उद्योग भविष्यात संकटात सापडतील, असे मत श्रीपूर येथील पांडुरंग कारखान्याचे कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.

केंद्रीय मंत्रिमंडळाने इथेनॉलच्या दरात वाढ केली़ शिवाय साखरेला २९०० हमीभाव जाहीर केला, या पार्श्वभूमीवर यशवंत कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, मागील दोन वर्षांचा ऊस व साखर उत्पादनाचा आढावा घेतला तर हंगाम २०१६-१७ मध्ये देशांतर्गत २०३ लाख टन साखर उत्पादन झाले.

२०१७-१८ मध्ये मोठी वाढ होऊन ते ३२० लाख टनावर गेले. येणाºया गळीत हंगामात देशांतर्गत ३५५ लाख टन उत्पादनाचा अंदाज आहे.  त्यामध्ये महाराष्ट्रात ११५ लाख टन उत्पादन होईल. म्हणजेच देशातील एकूण साखर खप लक्षात घेता १०५ लाख टन साखर शिल्लक राहील. त्यामुळे देशात साखरेचे दर कमी होणार याची भीती साखर उद्योगास असल्याचेही कुलकर्णी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

कारखानदरीला उभारी येण्यासाठी शासनाने त्यासाठी साखर निर्यात व इथेनॉल निर्मिती भर द्यावा असे सांगण्यात आले, पण महाराष्ट्रात साखरेचा दर २९०० रुपये आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तो दर २००० रुपये आहे़ साखर निर्यात करायचे ठरवले तर एका पोत्यामागे ९०० रुपयांची तूट कारखानदाराला सोसावे लागते, पण निर्यातीसाठी सरकार अनुदानाची रक्कम ५५ रुपये प्रति टन दोन वर्षानंतर देते़ ते कमी प्रमाणात आहे़ त्यामध्ये वाढ करणे गरजेचे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी व जैविक धोरणांतर्गत इथेनॉल निर्मितीला अधिक प्रोत्साहन दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे बी हेवी मोलासेसपासून बनणाºया इथेनॉलला ५ रुपये दर वाढवून दिला आहे. त्यामुळे बी हेवी मोलासेस इथेनॉलसाठी स्वतंत्र यंत्रणा कारखान्यास बसवावी लागेल़ भारतात इंधनामध्ये केवळ ५ टक्के इथेनॉलचा वापर होत असल्यामुळे याचा उठाव कमी आहे़ ते इथेनॉल साठवण्यासाठी कारखानदारांना अधिक आर्थिक भार पडतो़ त्यामुळे कारखानदारांना साखर निर्यात करणे व इथेनॉल निर्मिती करणे परवडत नाही़ परिणामी अडचणी वाढण्याची शक्यता आहे़ त्यासाठी शासनाने निर्यात अनुदानामध्ये वाढ करावे व  इंधनामध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढवावे तर कारखानदारांना याचा आर्थिक फायदा होईल अन्यथा मोठे संकट असल्याची भीती यशवंत कुलकर्णी यांनी व्यक्त केली़ 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखाने