शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
3
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
4
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
5
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
6
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
7
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."
8
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
9
Video - "मी तुमच्या मुलीवर उपचार करणार नाही..."; डॉक्टरची रुग्णाच्या वडिलांना मारहाण
10
Vastu Shastra: वास्तु शास्त्रानुसार घराच्या 'या' भागात ठेवा मोरपीस, आयुष्यात भरतील नवे रंग!
11
मायक्रोसॉफ्टने नोकियानंतर या कंपनीवर तगडा पैसा लावला; Ai च्या इतिहासातील सर्वात मोठी डील, फळणार का?
12
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
13
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
14
पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठ्ठा राडा !! मोहम्मद रिझवान पाक क्रिकेट बोर्डाला नडला... काय घडलं?
15
किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; सेन्सेक्स ८५,००० अंकांच्या आणि निफ्टी २६,००० अंकांच्या जवळ
16
PPF ला साधं समजू नका! पती-पत्नी मिळून बनवू शकता ₹१.३३ कोटींचा फंड, तोही टॅक्स फ्री
17
'तो' प्रवास ठरला शेवटचा! कुटुंबीयांसमोरच वडील आणि मुलीचा होरपळून मृत्यू; १० जण जखमी
18
ब्राझीलमध्ये रेड कमांडोविरोधात युद्ध सुरु; रिओमध्ये मोठ्या अड्ड्यावर हेलिकॉप्टरद्वारे हल्ला, माफियांकडून ड्रोन हल्ल्याने प्रत्यूत्तर
19
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
20
Ramkesh Murder Case: बदल्याची आग! मोबाईल डेटा, हार्ड ड्राइव्ह, अश्लील...; २० वर्षीय मुलीने का केली पार्टनरची हत्या?

साखर निर्यात, इथेनॉल निर्मितीने कारखानदारी अडचणीत : यशवंत कुलकर्णी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 20:30 IST

साखर निर्यातीमध्ये ९०० रुपयांची तूट; इथेनॉलला उठाव कमी

ठळक मुद्देस्वदेशी व जैविक धोरणांतर्गत इथेनॉल निर्मितीला अधिक प्रोत्साहनकारखानदारांना साखर निर्यात करणे व इथेनॉल निर्मिती करणे परवडत नाही़

श्रीपूर : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये साखरेचे भाव प्रति क्विंटल २ हजारापर्यंत आहेत़ साखर कारखानदारांनी बँकेकडून त्या साखरेवर २९०० रुपयांप्रमाणे कर्ज घेतले आहे़ साखर निर्यात करायचे ठरवले तर ९०० रुपयांची तूट कारखानदारांना सहन करावी लागणार आहे़ शिवाय इथेनॉल निर्मिती केली तर भारतात इंधनामध्ये केवळ ५ टक्के इथेनॉल वापरले जाते़ त्यामुळे त्याचा उठाव कमी आहे़ या दोन्ही बाबी लक्षात घेता साखर उद्योग भविष्यात संकटात सापडतील, असे मत श्रीपूर येथील पांडुरंग कारखान्याचे कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.

केंद्रीय मंत्रिमंडळाने इथेनॉलच्या दरात वाढ केली़ शिवाय साखरेला २९०० हमीभाव जाहीर केला, या पार्श्वभूमीवर यशवंत कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, मागील दोन वर्षांचा ऊस व साखर उत्पादनाचा आढावा घेतला तर हंगाम २०१६-१७ मध्ये देशांतर्गत २०३ लाख टन साखर उत्पादन झाले.

२०१७-१८ मध्ये मोठी वाढ होऊन ते ३२० लाख टनावर गेले. येणाºया गळीत हंगामात देशांतर्गत ३५५ लाख टन उत्पादनाचा अंदाज आहे.  त्यामध्ये महाराष्ट्रात ११५ लाख टन उत्पादन होईल. म्हणजेच देशातील एकूण साखर खप लक्षात घेता १०५ लाख टन साखर शिल्लक राहील. त्यामुळे देशात साखरेचे दर कमी होणार याची भीती साखर उद्योगास असल्याचेही कुलकर्णी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

कारखानदरीला उभारी येण्यासाठी शासनाने त्यासाठी साखर निर्यात व इथेनॉल निर्मिती भर द्यावा असे सांगण्यात आले, पण महाराष्ट्रात साखरेचा दर २९०० रुपये आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तो दर २००० रुपये आहे़ साखर निर्यात करायचे ठरवले तर एका पोत्यामागे ९०० रुपयांची तूट कारखानदाराला सोसावे लागते, पण निर्यातीसाठी सरकार अनुदानाची रक्कम ५५ रुपये प्रति टन दोन वर्षानंतर देते़ ते कमी प्रमाणात आहे़ त्यामध्ये वाढ करणे गरजेचे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी व जैविक धोरणांतर्गत इथेनॉल निर्मितीला अधिक प्रोत्साहन दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे बी हेवी मोलासेसपासून बनणाºया इथेनॉलला ५ रुपये दर वाढवून दिला आहे. त्यामुळे बी हेवी मोलासेस इथेनॉलसाठी स्वतंत्र यंत्रणा कारखान्यास बसवावी लागेल़ भारतात इंधनामध्ये केवळ ५ टक्के इथेनॉलचा वापर होत असल्यामुळे याचा उठाव कमी आहे़ ते इथेनॉल साठवण्यासाठी कारखानदारांना अधिक आर्थिक भार पडतो़ त्यामुळे कारखानदारांना साखर निर्यात करणे व इथेनॉल निर्मिती करणे परवडत नाही़ परिणामी अडचणी वाढण्याची शक्यता आहे़ त्यासाठी शासनाने निर्यात अनुदानामध्ये वाढ करावे व  इंधनामध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढवावे तर कारखानदारांना याचा आर्थिक फायदा होईल अन्यथा मोठे संकट असल्याची भीती यशवंत कुलकर्णी यांनी व्यक्त केली़ 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखाने