शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

जागतिक वन दिन - ओसाड सोलापूर जिल्ह्याचे वनक्षेत्र केवळ ०.३६ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 11:42 IST

सोलापूरचे वनक्षेत्र कोणत्या पद्धतीने वाढले जाईल, याचा कोणताही कार्यक्रम हाती घेण्यात आलेला नाही.

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४ हजार ८९५ चौरस किलोमीटरखुरट्या वनांचे क्षेत्रदेखील इथे अवघे १६ चौरस किलोमीटरसोलापूर जिल्ह्यातील वनविभागाचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होते आहे

 समीर इनामदारसोलापूर : केवळ ०.३६ टक्के वनक्षेत्र असणाºया सोलापूरची ओळख आता ‘राज्याचे वाळवंट’ अशी बनली आहे. ती पुसायची वेळ सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांवर आली आहे. आताच याबाबत जागरुकता आली नाही, तर भविष्यात हे संकट आणखी गहिरे होऊन जाणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यात किमान ३३ टक्के इतके वनक्षेत्र आवश्यक असताना त्या तुलनेत अवघे ०.३६ टक्के इतके क्षेत्र सोलापूर जिल्ह्यात राहिले असल्याची माहिती राज्याच्या वनसंरक्षण विभागाने प्रफुल्ल सारडा यांनी विचारलेल्या माहितीच्या अधिकारानंतर दिली आहे. इतकी बिकट परिस्थिती सोलापूर जिल्ह्याची झाली असताना, याची कुणाला खंत आहे ना खेद. 

सोलापूरचे वनक्षेत्र कोणत्या पद्धतीने वाढले जाईल, याचा कोणताही कार्यक्रम हाती घेण्यात आलेला नाही. केवळ शासकीय सोपस्कार पुढे नेण्यात येत आहेत. उद्दिष्ट पूर्ण करण्याशिवाय या कार्यक्रमाचे काही महत्त्व उरलेले नाही. मागील वर्षी नऊ लाख झाडांचे वृक्षारोपण केल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. यंदा १६ लाख वृक्षांचे रोपण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.  वनविभागाने २२ लाख वृक्षारोपणाची तयारी केली असून, २७ लाख रोपे तयार ठेवल्याचे वनविभागाने सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांनी वृक्षारोपण कार्यक्रमात अधिकाधिक वृक्ष लावले पाहिजे, असे सांगितले. सोलापूरची स्थिती इतकी बिकट असताना सर्व विभागाला या कामी सहभागी करून घेतल्यानंतरच सोलापूर पर्यावरणीय दृष्टीने चांगल्या दिशेने पावले उचलेल; अन्यथा सोलापूरची स्थिती हाताबाहेर गेलेली असेल, यात शंका नाही.

सोलापूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, गैरशासकीय संस्था, पर्यावरणात काम करणाºया संस्था, ज्येष्ठ नागरिक संघटना यांना हाताशी धरून कोट्यवधी झाडांची लागवड केल्यानंतर सोलापूरच्या वनक्षेत्राचे प्रमाण वाढू शकेल. शौचालयाप्रमाणे झाडे लावणे आवश्यक केल्याशिवाय झाडांचे प्रमाण वाढणार नाही. मोकळ्या किंवा पडीक जमिनीवर अधिकाधिक प्रमाणात वृक्षारोपण करण्यासाठी शासकीय संस्थांसह सर्वांनीच पुढे येणे आवश्यक बनले आहे.

वनक्षेत्राबद्दल ‘ब्र’ही नाही!- सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४ हजार ८९५ चौरस किलोमीटर असून, त्यापैकी ५३ चौरस किलोमीटर क्षेत्रावर वनराई आहे. त्यात ३७ चौरस किलोमीटर दाट आणि १६ चौरस किलोमीटर खुले क्षेत्र आहे. खुरट्या वनांचे क्षेत्रदेखील इथे अवघे १६ चौरस किलोमीटर आहे. इतकी भयानक स्थिती सोलापूरची झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील वनविभागाचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होते आहे. वनविभागाच्या जागा इतरांना दिल्या जात आहेत. त्याबाबत कोणी ‘ब्र’ही काढताना दिसलेले नाही. 

टॅग्स :Solapurसोलापूरforestजंगलforest departmentवनविभाग