शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

जागतिक वन दिन - ओसाड सोलापूर जिल्ह्याचे वनक्षेत्र केवळ ०.३६ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 11:42 IST

सोलापूरचे वनक्षेत्र कोणत्या पद्धतीने वाढले जाईल, याचा कोणताही कार्यक्रम हाती घेण्यात आलेला नाही.

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४ हजार ८९५ चौरस किलोमीटरखुरट्या वनांचे क्षेत्रदेखील इथे अवघे १६ चौरस किलोमीटरसोलापूर जिल्ह्यातील वनविभागाचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होते आहे

 समीर इनामदारसोलापूर : केवळ ०.३६ टक्के वनक्षेत्र असणाºया सोलापूरची ओळख आता ‘राज्याचे वाळवंट’ अशी बनली आहे. ती पुसायची वेळ सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांवर आली आहे. आताच याबाबत जागरुकता आली नाही, तर भविष्यात हे संकट आणखी गहिरे होऊन जाणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यात किमान ३३ टक्के इतके वनक्षेत्र आवश्यक असताना त्या तुलनेत अवघे ०.३६ टक्के इतके क्षेत्र सोलापूर जिल्ह्यात राहिले असल्याची माहिती राज्याच्या वनसंरक्षण विभागाने प्रफुल्ल सारडा यांनी विचारलेल्या माहितीच्या अधिकारानंतर दिली आहे. इतकी बिकट परिस्थिती सोलापूर जिल्ह्याची झाली असताना, याची कुणाला खंत आहे ना खेद. 

सोलापूरचे वनक्षेत्र कोणत्या पद्धतीने वाढले जाईल, याचा कोणताही कार्यक्रम हाती घेण्यात आलेला नाही. केवळ शासकीय सोपस्कार पुढे नेण्यात येत आहेत. उद्दिष्ट पूर्ण करण्याशिवाय या कार्यक्रमाचे काही महत्त्व उरलेले नाही. मागील वर्षी नऊ लाख झाडांचे वृक्षारोपण केल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. यंदा १६ लाख वृक्षांचे रोपण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.  वनविभागाने २२ लाख वृक्षारोपणाची तयारी केली असून, २७ लाख रोपे तयार ठेवल्याचे वनविभागाने सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांनी वृक्षारोपण कार्यक्रमात अधिकाधिक वृक्ष लावले पाहिजे, असे सांगितले. सोलापूरची स्थिती इतकी बिकट असताना सर्व विभागाला या कामी सहभागी करून घेतल्यानंतरच सोलापूर पर्यावरणीय दृष्टीने चांगल्या दिशेने पावले उचलेल; अन्यथा सोलापूरची स्थिती हाताबाहेर गेलेली असेल, यात शंका नाही.

सोलापूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, गैरशासकीय संस्था, पर्यावरणात काम करणाºया संस्था, ज्येष्ठ नागरिक संघटना यांना हाताशी धरून कोट्यवधी झाडांची लागवड केल्यानंतर सोलापूरच्या वनक्षेत्राचे प्रमाण वाढू शकेल. शौचालयाप्रमाणे झाडे लावणे आवश्यक केल्याशिवाय झाडांचे प्रमाण वाढणार नाही. मोकळ्या किंवा पडीक जमिनीवर अधिकाधिक प्रमाणात वृक्षारोपण करण्यासाठी शासकीय संस्थांसह सर्वांनीच पुढे येणे आवश्यक बनले आहे.

वनक्षेत्राबद्दल ‘ब्र’ही नाही!- सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४ हजार ८९५ चौरस किलोमीटर असून, त्यापैकी ५३ चौरस किलोमीटर क्षेत्रावर वनराई आहे. त्यात ३७ चौरस किलोमीटर दाट आणि १६ चौरस किलोमीटर खुले क्षेत्र आहे. खुरट्या वनांचे क्षेत्रदेखील इथे अवघे १६ चौरस किलोमीटर आहे. इतकी भयानक स्थिती सोलापूरची झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील वनविभागाचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होते आहे. वनविभागाच्या जागा इतरांना दिल्या जात आहेत. त्याबाबत कोणी ‘ब्र’ही काढताना दिसलेले नाही. 

टॅग्स :Solapurसोलापूरforestजंगलforest departmentवनविभाग