शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीच्या कामाची वर्कऑर्डर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 14:43 IST

तीस महिन्यांमध्ये पूर्ण करून घेणार काम; आयुक्त दिपक तावरे यांची माहिती

ठळक मुद्दे११० किमीचे अंतर, तांत्रिक आराखडा पोचमपाड कंपनी करेलतांत्रिक आराखडा मुंबई आयआयटीकडून तपासून घेणारकंपनीने दरमहा १० किमीचे काम पूर्ण करणे अपेक्षितउजनीपासून कामाला सुरुवात होणारनव्या जलवाहिनीतून दररोज ११० एमएलडी पाणी उपसा अपेक्षित. 

सोलापूर: सोलापूर डेव्हलपमेंट कॉर्पाेरेशन कंपनीने सोमवारी हैदराबाद येथील पोचमपाड कंपनीला उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीच्या कामाची वर्कऑर्डर  दिली. मनपा आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे सीईओ दीपक तावरे आणि पोचमपाड कंपनीचे कार्यकारी संचालक एम.राव. यांनी  आयुक्त कार्यालयात करारावर सह्या केल्या. काम पूर्ण करण्यासाठी कंपनीला ३० महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. शहरात नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा दावा महापालिका आयुक्त दिपक तावरे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केला.

शहरात चार दिवसाआड पाणीपुरवठा होतो. औज आणि चिंचपूर बंधारा शहर पाणीपुरवठा स्त्रोतांपैकी एक आहे. या दोन बंधाºयांची क्षमता ०.४२ टीएमसी आहे; मात्र त्यासाठी उजनीतून पाच टीएमसी पाणी सोडावे लागते. वर्षाला जवळपास २५ टीएमसी पाणी लागते. यावर तोडगा काढण्यासाठी उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम प्रस्तावित करण्यात आले होते. या कामासाठी एनटीपीसीने २५० कोटी तर स्मार्ट सिटी योजनेतून २०० कोटी रुपये मंजूर केले आहे. स्मार्ट सिटी कंपनीने नोव्हेंबर २०१८ मध्ये ३५९ कोटी रुपयांची निविदा काढली होती. पोचमपाड कंपनीने या कामासाठी ४६४ कोटी रुपये मागितले होते. स्मार्ट सिटी कंपनी आणि पोचमपाड कंपनीमध्ये वाटाघाटी झाल्या.  पोचमपाड कंपनीला ४०५ कोटी रुपयांना हे काम देण्याचा निर्णय झाला. स्मार्ट सिटी कंपनीच्या २९ आॅगस्टच्या बैठकीत वर्कऑर्डर  देण्यास मंजुरी देण्यात आली. सोमवारी करारावर सह्या झाल्या.  

यावेळी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख संजय धनशेट्टी, उपअभियंता विजय राठोड, स्मार्ट सिटीचे तपन डंके यांच्यासह स्मार्ट सिटीचे अधिकारी उपस्थित होते. एकूण ४०५ कोटी रुपयांचे काम असून त्यावरील कर पाहता ४५० कोटी रुपये लागणार असल्याचे स्मार्ट सिटीचे सीईओ दीपक तावरे यांनी सांगितले. 

दर महिन्याला दहा किमी काम अपेक्षित 

  • - मूळ आराखड्यातील पाकणी जलशुद्धीकरण केंद्र, रेल्वे क्रॉसिंग, एनटीपीसीच्या परिसरातील चार गावचा पाणीपुरवठा योजना ही कामे योजनेतून होतील. 
  • - ११० किमीचे अंतर, तांत्रिक आराखडा पोचमपाड कंपनी करेल
  • - तांत्रिक आराखडा मुंबई आयआयटीकडून तपासून घेणार
  • - कंपनीने दरमहा १० किमीचे काम पूर्ण करणे अपेक्षित
  • - उजनीपासून कामाला सुरुवात होणार
  • - नव्या जलवाहिनीतून दररोज ११० एमएलडी पाणी उपसा अपेक्षित. 
  • - शेतकºयांना मिळणार पीक नुकसानभरपाई.

पहिल्या जलवाहिनीचे आयुष्यमान संपले- उजनी ते सोलापूर पहिल्या जलवाहिनीच्या कामाला १९९२ मध्ये मंजुरी मिळाली होती. महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाने १९९५ साली या कामाला सुरुवात केली. १९९८ साली काम पूर्ण झाले. २००० साली जीवन प्राधिकरणाने ही योजना महापालिकेकडे हस्तांतरीत केली. योजना सुरू झाल्यानंतर जलवाहिनीला नियमित गळती लागत आहे. आता या जलवाहिनीचे आयुष्यमान संपले आहे. जीवन प्राधिकरणने २००४ साली समांतर जलवाहिनीची गरज असल्याचा प्रस्ताव दिला होता. 

टिंगल करणाºयाला हे उत्तर - वर्कऑर्डर  दिल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत महापौर शोभा बनशेट्टी म्हणाल्या, आमच्या पक्षातील काही लोकांनी समांतर जलवाहिनीच्या कामाची टिंगल केली होती. काम पूर्ण करून दाखवाच, असे आव्हान काही लोकांनी दिले होते. हा प्रस्ताव सभागृहात आल्यानंतर पालकमंत्र्यांच्या मुलासह २० नगरसेवक बाहेर पडले होते, परंतु मी जिद्दीने हे काम इथपर्यंत आणले आहे. शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावल्याचा आनंद आहे. यावेळी सभागृह नेते श्रीनिवास करली उपस्थित होते. 

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater transportजलवाहतूकSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाSmart Cityस्मार्ट सिटी