शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Car Blast: अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे
2
Mumbai: अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, डॉक्टरांकडून ५ लाखांत विकण्याचा प्रयत्न, ५ जणांवर गुन्हा दाखल
3
दोन PAN Card ठेवल्यास ₹१०,००० दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा; 'या' सोप्या पद्धतीने सरेंडर करा दुसरे कार्ड!
4
नवी मुंबईत शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला; नुकतेच अमित ठाकरेंनी आंदोलन करत केले होते अनावरण
5
शेअर बाजारातील 'जॅकपॉट' स्टॉक्स : १० महिन्यांत ₹१०००० चे झाले ₹५ लाख; पैशांचा वर्षाव करताहेत ‘हे’ ४ स्टॅाक
6
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
7
Mumbai: मुंबईत कांदा स्वस्त होणार की महागणार? पावसामुळे मोठे नुकसान; उत्पादनाचा अंदाज येईना
8
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
9
Mumbai: शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्याने २० विद्यार्थ्यांना विषबाधा, तेलात कापूर पडल्याची माहिती
10
Stock Market: उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स १९५ अंकांनी घसरला; Nifty २६०००० च्या खाली, 'या' स्टॉक्सवर नजर
11
Mumbai: घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू; आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप
12
सुनेसोबत अनैतिक संबंध, मुलाला मार्गातून हटवण्यासाठी बाप झाला हैवान, मग रचलं असं नाटक
13
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
14
दिल्लीतील स्फोटापूर्वी रेकॉर्ड केलेला डॉ. उमरचा व्हिडिओ आला समोर; 'सुसाइड बॉम्बर'चा उल्लेख
15
सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS
16
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
17
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
18
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
19
Raigad: रायगडमधील १० नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड!
20
Mumbai: दहिसर-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर सुपरवायझरचा मृत्यू; कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड!
Daily Top 2Weekly Top 5

उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीच्या कामाची वर्कऑर्डर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 14:43 IST

तीस महिन्यांमध्ये पूर्ण करून घेणार काम; आयुक्त दिपक तावरे यांची माहिती

ठळक मुद्दे११० किमीचे अंतर, तांत्रिक आराखडा पोचमपाड कंपनी करेलतांत्रिक आराखडा मुंबई आयआयटीकडून तपासून घेणारकंपनीने दरमहा १० किमीचे काम पूर्ण करणे अपेक्षितउजनीपासून कामाला सुरुवात होणारनव्या जलवाहिनीतून दररोज ११० एमएलडी पाणी उपसा अपेक्षित. 

सोलापूर: सोलापूर डेव्हलपमेंट कॉर्पाेरेशन कंपनीने सोमवारी हैदराबाद येथील पोचमपाड कंपनीला उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीच्या कामाची वर्कऑर्डर  दिली. मनपा आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे सीईओ दीपक तावरे आणि पोचमपाड कंपनीचे कार्यकारी संचालक एम.राव. यांनी  आयुक्त कार्यालयात करारावर सह्या केल्या. काम पूर्ण करण्यासाठी कंपनीला ३० महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. शहरात नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा दावा महापालिका आयुक्त दिपक तावरे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केला.

शहरात चार दिवसाआड पाणीपुरवठा होतो. औज आणि चिंचपूर बंधारा शहर पाणीपुरवठा स्त्रोतांपैकी एक आहे. या दोन बंधाºयांची क्षमता ०.४२ टीएमसी आहे; मात्र त्यासाठी उजनीतून पाच टीएमसी पाणी सोडावे लागते. वर्षाला जवळपास २५ टीएमसी पाणी लागते. यावर तोडगा काढण्यासाठी उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम प्रस्तावित करण्यात आले होते. या कामासाठी एनटीपीसीने २५० कोटी तर स्मार्ट सिटी योजनेतून २०० कोटी रुपये मंजूर केले आहे. स्मार्ट सिटी कंपनीने नोव्हेंबर २०१८ मध्ये ३५९ कोटी रुपयांची निविदा काढली होती. पोचमपाड कंपनीने या कामासाठी ४६४ कोटी रुपये मागितले होते. स्मार्ट सिटी कंपनी आणि पोचमपाड कंपनीमध्ये वाटाघाटी झाल्या.  पोचमपाड कंपनीला ४०५ कोटी रुपयांना हे काम देण्याचा निर्णय झाला. स्मार्ट सिटी कंपनीच्या २९ आॅगस्टच्या बैठकीत वर्कऑर्डर  देण्यास मंजुरी देण्यात आली. सोमवारी करारावर सह्या झाल्या.  

यावेळी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख संजय धनशेट्टी, उपअभियंता विजय राठोड, स्मार्ट सिटीचे तपन डंके यांच्यासह स्मार्ट सिटीचे अधिकारी उपस्थित होते. एकूण ४०५ कोटी रुपयांचे काम असून त्यावरील कर पाहता ४५० कोटी रुपये लागणार असल्याचे स्मार्ट सिटीचे सीईओ दीपक तावरे यांनी सांगितले. 

दर महिन्याला दहा किमी काम अपेक्षित 

  • - मूळ आराखड्यातील पाकणी जलशुद्धीकरण केंद्र, रेल्वे क्रॉसिंग, एनटीपीसीच्या परिसरातील चार गावचा पाणीपुरवठा योजना ही कामे योजनेतून होतील. 
  • - ११० किमीचे अंतर, तांत्रिक आराखडा पोचमपाड कंपनी करेल
  • - तांत्रिक आराखडा मुंबई आयआयटीकडून तपासून घेणार
  • - कंपनीने दरमहा १० किमीचे काम पूर्ण करणे अपेक्षित
  • - उजनीपासून कामाला सुरुवात होणार
  • - नव्या जलवाहिनीतून दररोज ११० एमएलडी पाणी उपसा अपेक्षित. 
  • - शेतकºयांना मिळणार पीक नुकसानभरपाई.

पहिल्या जलवाहिनीचे आयुष्यमान संपले- उजनी ते सोलापूर पहिल्या जलवाहिनीच्या कामाला १९९२ मध्ये मंजुरी मिळाली होती. महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाने १९९५ साली या कामाला सुरुवात केली. १९९८ साली काम पूर्ण झाले. २००० साली जीवन प्राधिकरणाने ही योजना महापालिकेकडे हस्तांतरीत केली. योजना सुरू झाल्यानंतर जलवाहिनीला नियमित गळती लागत आहे. आता या जलवाहिनीचे आयुष्यमान संपले आहे. जीवन प्राधिकरणने २००४ साली समांतर जलवाहिनीची गरज असल्याचा प्रस्ताव दिला होता. 

टिंगल करणाºयाला हे उत्तर - वर्कऑर्डर  दिल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत महापौर शोभा बनशेट्टी म्हणाल्या, आमच्या पक्षातील काही लोकांनी समांतर जलवाहिनीच्या कामाची टिंगल केली होती. काम पूर्ण करून दाखवाच, असे आव्हान काही लोकांनी दिले होते. हा प्रस्ताव सभागृहात आल्यानंतर पालकमंत्र्यांच्या मुलासह २० नगरसेवक बाहेर पडले होते, परंतु मी जिद्दीने हे काम इथपर्यंत आणले आहे. शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावल्याचा आनंद आहे. यावेळी सभागृह नेते श्रीनिवास करली उपस्थित होते. 

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater transportजलवाहतूकSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाSmart Cityस्मार्ट सिटी