शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

वडकबाळ येथील सीना नदीवर बॅरेजेसऐवजी पुलाचेच काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 12:59 IST

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमक्ष केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सीना व भीमा नदीवरील पुलामध्ये ...

ठळक मुद्देगडकरी यांच्या घोषणेनुसार अंमलबजावणीची प्रतीक्षागेल्या महिन्यात शेतकºयांनी वडकबाळ येथील पुलाचे काम बंद पाडले होतेसोलापूर ते विजयपूर दरम्यानच्या चौपदरीकरणास गती आली

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमक्ष केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सीना व भीमा नदीवरील पुलामध्ये बॅरेजेस बांधण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात सीना नदीवर वडकबाळ येथे पूल बांधण्यात येत असल्याची माहिती भीमा—सीना संघर्ष समितीचे अध्यक्ष विलास लोकरे यांनी दिली. 

केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री गडकरी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या सोलापूर दौºयादरम्यान ९ जानेवारी रोजी ही घोषणा केली होती. महामार्गाच्या कामात सीना व भीमा नदीवरील पुलांमध्ये बॅरेजेस बांधण्याचा देशातील एकमेव प्रकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले होते. पण गडकरी यांनी ही घोषणा करण्यापूर्वीच विजयपूर महामार्गाचे टेंडर निघालेले आहे. त्यामुळे सध्या नव्याने बांधण्यात येणाºया पुलाच्या कामात बॅरेजेसचा समावेश करता येत नसल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे संचालक संजय कदम यांनी सांगितल्याचे लोकरे यांनी म्हटले आहे. वडकबाळ येथे पुलाचे काम प्रगतिपथावर असल्याचे दिसल्यावर संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी कदम यांची भेट घेऊन या कामाविषयी चर्चा केली. त्यावेळी कदम यांनी सद्यस्थितीत वडकबाळ येथे पुलाचे काम होणार असल्याचे स्पष्ट केले. 

बॅरेजेस कशापद्धतीने बांधावयाचे याबाबत अद्याप मार्गदर्शन आलेले नाही. पण महामार्गाचे काम पूर्ण झाल्यावर येणाºया टोलमधून काही रक्कम बॅरेजेस बांधण्यासाठी जलसंपदा विभागाकडेच वळती केली जाणार आहे. त्यामुळे बॅरेजेस उभारण्याचे काम जलसंपदा विभागच करेल असे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे चर्चेतून स्पष्ट झाले आहे. 

बॅरेजेस बांधण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाचे नाही. त्यामुळे या विभागाकडून बॅरेजेस बांधण्याची रक्कम जलसंपदा विभागाकडे वर्ग करण्यात येणार आहे. काम कोणत्या विभागाने करावे हे आम्हाला महत्त्वाचे नाही. पण कोणत्याही परिस्थितीत बॅरेजेस व्हावेत ही शेतकºयांची मागणी असल्याचे मंद्रुपचे माजी सरपंच अप्पाराव कोरे यांनी सांगितले. सध्या पुलाचे बीम उभारणीचे काम वेगात आहे. यात बॅरेजेस बांधण्याच्या रचनेचा संबंध नसल्याचे दिसून आल्यावर राष्ट्रीय महामार्ग अधिकाºयांशी चर्चा केली. त्यावरून पुलाच्या बाजूला जलसंपदा विभागाकडून बॅरेजेस उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे, असे कोरे यांनी सांगितले. 

कामाला आला वेग- बॅरेजेस बांधणीच्या मागणीसाठी गेल्या महिन्यात शेतकºयांनी वडकबाळ येथील पुलाचे काम बंद पाडले होते. सांगली येथील कार्यक्रमात केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री गडकरी यांनी बॅरेजेसबाबत घोषणा केली होती. त्यानंतर शेतकºयांनी आंदोलन मागे घेतले. सोलापूरच्या दौºयात गडकरी यांनी ही बाब स्पष्ट केल्याने शेतकºयांना बॅरेजेसबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. सध्या पुलाचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे सोलापूर ते विजयपूर दरम्यानच्या चौपदरीकरणास गती आली आहे.  

टॅग्स :SolapurसोलापूरNitin Gadkariनितीन गडकरीhighwayमहामार्गKarnatakकर्नाटक