शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

विनामास्क तो म्हणाला, सारखं थुंकावं लागतं राव, तिनंही सांगितलं, मॅचिंगचा मास्क मिळालाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 08:42 IST

अचंबित करणारी कारणे; १८ ते ४० वयोगटातील नागरिकांचे प्रमाण सर्वाधिक

यशवंत सादूल

सोलापूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची टांगती तलवार असताना शहरातील निम्मे नागरिक मास्कविना बिनधास्त फिरताना दिसून येत आहेत. यामध्ये अठरा ते चाळीस वयोगटातील नागरिकांचे सर्वाधिक प्रमाण आहे. मास्क न वापरण्याबद्दल विचारणा केली असता त्यांच्याकडून अचंबित करणारी कारणे ऐकावयास मिळाली. दरम्यान, एका रिक्षाचालकाने, सारखं थुकावं लागतं राव, त्यामुळं मास्क वापरत नाही, तर एका महिलेने, पोशाखाला मॅचिंग मास्क मिळालाच नाही, त्यामुळं मी घातला नसल्याचे कारण सांगितले.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, नवी वेस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रंगभवन, सात रस्ता, महापालिका, जिल्हा परिषद, सिव्हिल चौक, पद्मशाली चौक, कन्ना चौक, कोतंम चौक, अशोक चौक परिसरातील दुचाकी वाहनस्वार, रिक्षाचालक, चारचाकी वाहनचालक, सायकलस्वार आणि पादचारी यांचे सर्वेक्षण केले असता पन्नास ते साठ टक्के मास्कविना फिरणारे नागरिक आढळून आले. दहा ते पंधरा टक्के हे मास्क हनुवटीला लावलेले होते. फक्त पंचवीस ते तीस टक्के नागरिक प्रामाणिकपणे मास्क वापरताना आढळून आले. यामध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता.

--------

ही आहेत मास्क न वापरण्याची कारणे...

मास्क न वापरण्याची कारणे विचारली असता रोहितेश वाळके यांनी कोरोना संपलेला आहे, आता मास्कची काय गरज आहे का? असा प्रतिप्रश्न करीत मागील तीन महिन्यांपासून मी मास्क वापरत नाही, असे सांगितले. रिक्षाचालक सुनील कराळे यांनी थुंकण्यासाठी अडचणीचे ठरू नये यासाठी वापरत नाही, असे सांगितले, तर उन्हामुळे घाम येऊन सारखे नाक खाजवते त्यामुळे फुटकुळ्या होत आहेत, असे पंडित वाघमारे यांनी सांगितले. स्नेहा कोळी या तृतीयपंथीयाने तर शृंगार केलेले लिपस्टिक पुसून जाऊ नये यासाठी, दोन्ही मुलांची काळजी घेत त्यांना मास्क लावून काळजी घेणारी मोटारसायकलस्वार अर्पिता गोसावी यांनी पोशाख अनुरूप मॅचिंग मास्क सापडत नव्हते. त्यामळे लावले नाही, असे सांगितले.                         सारखा दम लागतोय, हे कारण मात्र सर्वांत जास्त नागरिकांनी सांगितले. पान आणि तंबाखूजन्य पदार्थ खाणे आणि थुंकता यावे यासाठी मास्क वापरत नसल्याचे बहुतेक नागरिकांनी सांगितले.

-------

दोन लस घेतल्या, आता कशाला मास्क घालू

‘लोकमत’च्या सर्वेक्षणात एका मोटारस्वाराने दोन लस घेतल्या, आता कशाला मास्क घालू, असे उत्तर दिले. याशिवाय मागील वर्ष, दीड वर्षापासून मास्क वापरून कंटाळा आला, मोकळी हवा घेण्यासाठी, गडबडीत विसरलो, मास्क गाडीतच विसरलो, असे सुभाष जळकोटकर यांनी सांगितले. इरप्पा माशाळ नाक सुजत असल्याचे, नागपूरहून आलेले प्रवासी अरुण गेडाम यांनी चिक्कू खाण्यासाठी मास्क काढला, यासह पिशवीत आहे, गाडीला अडकवलेला आहे, कोणी विचारत नाही, अनेक सरकारी कार्यालयांत, आरोग्य कर्मचारी, पोलीस मास्क वापरत नाहीत. मास्क विचारायला आम्हीच सापडलो का? अशी अनेक गमतीदार आणि मनोरंजक कारणे नागरिकांनी सांगितली असली तरी दुर्दैवाने कोरोनाची तिसरी लाट आणि त्याविषयीचे गांभीर्य लक्षात घेऊन यावर समुपदेशन करणे अत्यंत गरजेचे आहे.

 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसHealthआरोग्य