शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

विनामास्क तो म्हणाला, सारखं थुंकावं लागतं राव, तिनंही सांगितलं, मॅचिंगचा मास्क मिळालाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 08:42 IST

अचंबित करणारी कारणे; १८ ते ४० वयोगटातील नागरिकांचे प्रमाण सर्वाधिक

यशवंत सादूल

सोलापूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची टांगती तलवार असताना शहरातील निम्मे नागरिक मास्कविना बिनधास्त फिरताना दिसून येत आहेत. यामध्ये अठरा ते चाळीस वयोगटातील नागरिकांचे सर्वाधिक प्रमाण आहे. मास्क न वापरण्याबद्दल विचारणा केली असता त्यांच्याकडून अचंबित करणारी कारणे ऐकावयास मिळाली. दरम्यान, एका रिक्षाचालकाने, सारखं थुकावं लागतं राव, त्यामुळं मास्क वापरत नाही, तर एका महिलेने, पोशाखाला मॅचिंग मास्क मिळालाच नाही, त्यामुळं मी घातला नसल्याचे कारण सांगितले.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, नवी वेस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रंगभवन, सात रस्ता, महापालिका, जिल्हा परिषद, सिव्हिल चौक, पद्मशाली चौक, कन्ना चौक, कोतंम चौक, अशोक चौक परिसरातील दुचाकी वाहनस्वार, रिक्षाचालक, चारचाकी वाहनचालक, सायकलस्वार आणि पादचारी यांचे सर्वेक्षण केले असता पन्नास ते साठ टक्के मास्कविना फिरणारे नागरिक आढळून आले. दहा ते पंधरा टक्के हे मास्क हनुवटीला लावलेले होते. फक्त पंचवीस ते तीस टक्के नागरिक प्रामाणिकपणे मास्क वापरताना आढळून आले. यामध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता.

--------

ही आहेत मास्क न वापरण्याची कारणे...

मास्क न वापरण्याची कारणे विचारली असता रोहितेश वाळके यांनी कोरोना संपलेला आहे, आता मास्कची काय गरज आहे का? असा प्रतिप्रश्न करीत मागील तीन महिन्यांपासून मी मास्क वापरत नाही, असे सांगितले. रिक्षाचालक सुनील कराळे यांनी थुंकण्यासाठी अडचणीचे ठरू नये यासाठी वापरत नाही, असे सांगितले, तर उन्हामुळे घाम येऊन सारखे नाक खाजवते त्यामुळे फुटकुळ्या होत आहेत, असे पंडित वाघमारे यांनी सांगितले. स्नेहा कोळी या तृतीयपंथीयाने तर शृंगार केलेले लिपस्टिक पुसून जाऊ नये यासाठी, दोन्ही मुलांची काळजी घेत त्यांना मास्क लावून काळजी घेणारी मोटारसायकलस्वार अर्पिता गोसावी यांनी पोशाख अनुरूप मॅचिंग मास्क सापडत नव्हते. त्यामळे लावले नाही, असे सांगितले.                         सारखा दम लागतोय, हे कारण मात्र सर्वांत जास्त नागरिकांनी सांगितले. पान आणि तंबाखूजन्य पदार्थ खाणे आणि थुंकता यावे यासाठी मास्क वापरत नसल्याचे बहुतेक नागरिकांनी सांगितले.

-------

दोन लस घेतल्या, आता कशाला मास्क घालू

‘लोकमत’च्या सर्वेक्षणात एका मोटारस्वाराने दोन लस घेतल्या, आता कशाला मास्क घालू, असे उत्तर दिले. याशिवाय मागील वर्ष, दीड वर्षापासून मास्क वापरून कंटाळा आला, मोकळी हवा घेण्यासाठी, गडबडीत विसरलो, मास्क गाडीतच विसरलो, असे सुभाष जळकोटकर यांनी सांगितले. इरप्पा माशाळ नाक सुजत असल्याचे, नागपूरहून आलेले प्रवासी अरुण गेडाम यांनी चिक्कू खाण्यासाठी मास्क काढला, यासह पिशवीत आहे, गाडीला अडकवलेला आहे, कोणी विचारत नाही, अनेक सरकारी कार्यालयांत, आरोग्य कर्मचारी, पोलीस मास्क वापरत नाहीत. मास्क विचारायला आम्हीच सापडलो का? अशी अनेक गमतीदार आणि मनोरंजक कारणे नागरिकांनी सांगितली असली तरी दुर्दैवाने कोरोनाची तिसरी लाट आणि त्याविषयीचे गांभीर्य लक्षात घेऊन यावर समुपदेशन करणे अत्यंत गरजेचे आहे.

 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसHealthआरोग्य