शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

शंभर दिवसांत जे होऊ शकलं नाही; ते आता दहा दिवसांमध्ये कसं करणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 10:54 AM

संचारबंदीवर तिखट प्रतिक्रिया; हातावर पोट असणाºया लाखो कामगारांचं पोट कसं भरणार ?

ठळक मुद्देकोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी शहर आणि परिसरातील दोन तालुक्यांमध्ये १६ जुलैच्या रात्रीपासून कडक संचारबंदीया पार्श्वभूमीवर लोकमतने रविवारी शहरातील विविध क्षेत्रातील कामगार, हॉटेल व्यावसायिक, रिक्षा चालक यांच्याशी संवाद साधला.गेल्या तीन महिन्यात जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलीस, आरोग्य विभागाने केलेल्या कामावर नाराजी व्यक्त

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १०० पेक्षा अधिक दिवसांचा लॉकडाऊन केला. तरीही प्रशासनाला त्यावर नियंत्रण मिळवता आले नाही. आता दहा दिवस पुन्हा लॉकडाऊनमध्ये काय साध्य करणार आहात? या काळात हातावरचे पोट असलेल्या कामगारांसाठी काय करणार आहात, असा सवाल सोलापूरकरांनी ‘लोकमत’च्या माध्यमातून उपस्थित केला.

कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी शहर आणि परिसरातील दोन तालुक्यांमध्ये १६ जुलैच्या रात्रीपासून कडक संचारबंदी जाहीर आली. या पार्श्वभूमीवर लोकमतने रविवारी शहरातील विविध क्षेत्रातील कामगार, हॉटेल व्यावसायिक, रिक्षा चालक यांच्याशी संवाद साधला. त्यांनी लॉकडाऊनच्या निर्णयाचे स्वागत केले; मात्र गेल्या तीन महिन्यात जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलीस, आरोग्य विभागाने केलेल्या कामावर नाराजी व्यक्त केली. लॉकडाऊनमुळे कोरोनाची साखळी तुटेल का? याबद्दल शंका उपस्थित केली. लॉकडाऊनच्या काळात कामगारांचे हाल होतील, व्यवसायाचे नुकसान होईल. त्याबद्दलही प्रशासनाने विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

संचारबंदीमुळे अर्थव्यवस्था थांबेल !साडेतीन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर अनलॉक सुरू झाले. यामध्ये व्यापार आणि उद्योग सुरू झाले. कामगार, कारागिरांच्या हाताला काम मिळू लागले. या स्थितीत दहा दिवसांची संचारबंदी लागू झाली तर सर्व अर्थव्यवस्था ठप्प होईल, असे कामगारांनी स्पष्ट केले. 

हॉटेल कामगार, आचारी यांना मागील तीन महिने सांभाळले. आता पुन्हा दहा दिवस बंद राहणार. व्यवसाय विस्कळीत होणार. या सर्व .माणसांना कसे सांभाळणार. परगावी गेलेल्या कामगारांना परवाच आणले होते. आता पुन्हा प्रशासनाने काम बंद ठेवायला सांगितले. हे किती दिवस चालणार. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर तुम्ही दुकानांना, हॉटेल व्यवसायाला वेळेत मुभा दिली नाही. तुम्ही चुकीचे धोरण राबविले. वारंवार होणाºया बंदला आम्ही वैतागलो आहोत.-सीताराम शिकरे, हॉटेल व्यावसायिक

मागील तीन महिन्यात प्रशासन कोरोनाची साखळी तोडण्यात अपयशी ठरले. आता पुन्हा लॉकडाऊन केल्यानंतर कोरोनाला रोखले जाईल याची काय शाश्वती? आज अनेक कामगार उपाशी मरत आहेत. चार-चार महिने कामगार बिनकामाचा कसा काय राहू शकेल. लोक कोरोनामुळे नव्हे तर उपाशी राहिलो म्हणून मरतील. दहा दिवसानंतर पुन्हा लॉकडाऊनचे अस्र उपसू नका.- नागेश गोटे, हॉटेल व्यावसायिक.

हॉटेल बंद करुन मी भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. तोंडाला मास्क, हातात मोजे घालूनच भाजी विक्री केली. माझ्यामुळे कुणालाही कोरोनाची लागण झाली नाही. तरीही मी लॉकडाऊनच्या निर्णयाचे स्वागत करतो. पण दहा दिवस बंदच्या काळात माझ्या कुटुंबाचे हाल होतील. त्याबद्दल प्रशासन काय करणार आहे? कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाने अन्य पर्यायांचा वापर करावा.- भारत औरंगे, भाजी विक्रेते.

मी भाड्याने रिक्षा घेऊन चालवतो. तीन महिने रिक्षा बंद होती. परवा चालू झाली तर दोनच माणसांना घेऊन प्रवास करायला परवानगी दिली. मागच्या तीन महिन्यात कोरोना गेला नाही पण काम बंद असल्याने आमचा जीव जायची वेळ आली होती. आता कुठे व्यवसाय सुरळीत होईल म्हटले तर पुन्हा बंद केला आहे. प्रशासनाने दहा दिवसांत कडक उपाययोजना करुन कोरोनाला रोखले पाहिजे.-सुहास ढमढेरे, रिक्षा चालक.

उत्तर प्रदेशातील आमच्या मूळगावातून परवाच आम्ही सोलापुरात आलो. आमचे दुसरे कामगार बांधव सोलापूरकडे येण्यासाठी निघाले आहेत. ते पोहोचतील त्यावेळी सर्वकाही बंद झालेले असेल. तीन महिने हे लोक कामाविना राहिले. आता इथे आल्यानंतर त्यांचे हाल होणार आहेत. प्रशासनाने त्यांची उपासमार होऊ नये यासाठी काहीतरी करायला हवे. वारंवार काम बंद ठेवू नका.मिथीलेश जैस्वाल, बांधकाम कामगार

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस