शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Video : आबासाहेब, तुम्हीच निवडणूक लढवा, तेव्हा पायावर डोकं ठेवून रडले होते कार्यकर्ते

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 23:16 IST

सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घेतलेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा गणपतराव देशमुख यांनाच उमेदवारी घेण्याचा आग्रह केला होता. विशेष म्हणजे सभेच्या ठिकाणी शेकापच्या कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर गर्दी करत गणपतराव देशमुख यांच्या पायावरच डोकं ठेवलं.

ठळक मुद्देसांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घेतलेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा गणपतराव देशमुख यांनाच उमेदवारी घेण्याचा आग्रह केला आहे. विशेष म्हणजे सभेच्या ठिकाणी शेकापच्या कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर गर्दी करत गणपतराव देशमुख यांच्या पायावरच डोकं

सोलापूर/ मुंबई - सांगोल्याचे माजी आमदार आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते गणपतराव देशमुख यांनी आज सोलापुरात अखेरचा श्वास घेतला. अखेरच्या श्वासापर्यंत समाजकारण करणाऱ्या आबांनी पक्षनिष्ठेचा पाठ महाराष्ट्राला, देशाला शिकवला. सांगोल्याच्या लाखो जनांना पोरकं करुन आज आबासाहेब निघून गेले. तब्बल 11 वेळा आमदार होण्याचा विक्रमच आपल्या नावावर केला. विशेष म्हणजे एकाच पक्षातून त्यांनी आपल्या विचारांशी ठाम राहून विधानसभा गाजवली. गणपतराव देशमुख यांच्या साधेपणाचे अनेक किस्से मीडियात रंगतात. सांगोल्याची जनता या वयोवृद्ध आमदारांवर, लाडक्या नेत्यावर जीवापाड प्रेम करते. सांगोल्यातील एका कार्यक्रमात जनतेचं हे प्रेम दिसून आलं होतं.  

सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घेतलेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा गणपतराव देशमुख यांनाच उमेदवारी घेण्याचा आग्रह केला होता. विशेष म्हणजे सभेच्या ठिकाणी शेकापच्या कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर गर्दी करत गणपतराव देशमुख यांच्या पायावरच डोकं ठेवलं. आबा, काहीही झालं तरी यंदाही तुम्हीच निवडणूक लढवा असं म्हणत कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाल्याचंही पाहायला मिळालं. कार्यकर्त्यांनी भावुक केललं हे वातावरण पाहून गणपतरावही गहिवरले होते.

मला शेकापला सांगोल्यात जिवंत ठेवायचं आहे. त्यामुळे, मी ह्यात असेपर्यंत शेकापचाच दुसरा आमदार सांगोल्यातून निवडून आणायचाय, असे गणपत देशमुख यांनी त्यावेळी म्हटले होते. विधानसभा निवडणुकीमध्ये मी उभा राहिलो तर आमदार म्हणून निश्चित निवडून येईन, पण माझ्या माघारी शेकापचे भवितव्य काय? भविष्यात शेकापचे तत्त्वज्ञान तालुक्यात टिकले पाहिजे. यासाठी मी ही निवडणूक लढवत नाही, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. पक्षासाठी शेवटपर्यंत काम करणारा कार्यकर्ता म्हणूनच आबासाहेब राजकारणात जगले. 

निवडणूक न लढविण्याची आबासाहेबांची घोषणा ऐकताच कित्येकांना रडू कोसळलं होतं. अनेकांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं होतं. गणपत आबांच्या निधनानंतर आज, तोच दिवस पुन्हा पाहायला मिळणार आहे. कित्येकांना रडू कोसळणार आहे, अनेकजण आबांच्या पायावर डोकंही ठेकवणार आहेत, फरक एवढाच... तेव्हा समजवायला आबासाहेब होते, आज त्यांचीच उणीव पोरकं झालेल्या शेकापच्या कार्यकर्त्यांना, सांगोलाकरांना भासणार आहे.  

टॅग्स :Ganpatrao Deshmukhगणपतराव देशमुखDeathमृत्यूMLAआमदारsangole-acसांगोला