शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

सांत्वन करायला कुणीबी येतं.. मदत करायची म्हंटल्यावर मायबाप सरकार बी मागं सरकतंय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 12:27 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांची कैफियत; जिल्हाधिकाºयांकडे मदत करण्यासाठी विनंती

ठळक मुद्देविजापूर रोड परिसरातील प्रार्थना फाउंडेशनच्या कार्यालयात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांची बैठकप्रार्थना फाउंडेशनतर्फे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आलेआमच्या घरातील कर्त्या पुरुषाने आत्महत्या केल्यानंतर अनेकांनी मदतीचा हात पुढे केला

सोलापूर : शेतकरी कर्जाच्या बोझ्याखाली बुडतो. त्याच्यापुढं आत्महत्या करण्याशिवाय कोणताच पर्याय राहात नाही. आत्महत्या केल्यावर अनेकजण सांत्वन करण्यासाठी येतात. पण प्रत्यक्षात मदतीची वेळ आल्यावर माणसं काय सरकार पण मागे सरकते, अशी कैफियत शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांनी बैठकीत मांडली.

विजापूर रोड परिसरातील प्रार्थना फाउंडेशनच्या कार्यालयात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांनी त्यांच्या समस्या मांडल्या. या समस्यांवर उपाय काय करायचे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यानंतर आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

प्रार्थना फाउंडेशनतर्फे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात त्यांच्या मागण्या नोंदविण्यात आल्या. यात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील व्यक्तीला योग्यतेनुसार शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्यावे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाना पक्के घर देण्यात यावे. उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस जोडणे, वीज कनेक्शन देण्यात यावे. लघुउद्योग व शेती व्यवसायासाठी मागणीनुसार त्वरित कर्ज उपलब्ध करून द्यावे. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवांना विधवा पेन्शन तत्काळ चालू करण्यात यावी. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील लोकांना आरोग्य सेवा देण्यात यावी. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सर्वांना ग्रामपंचायतीच्या मदतीने शेततळे मिळवून देण्यात यावे. आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या मुलांसाठी मोफत शिक्षण व स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था करण्यात यावी. आत्महत्याग्रस्त कुटुंबाला रिक्षा परमिट द्यावे. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाना विहीर देण्यात यावी.

कांद्याला जरा भाव मिळाला की लोकांच्या पोटात दुखतं- मागील काही दिवसांपासून कांद्याला चांगला भाव मिळत आहे. यामुळे शेतकºयांच्या पदरात काही पैसे पडत आहेत. हे पाहून अनेकांच्या पोटात दुखायला लागलं. कांदा महाग झाला की खूप मोठं संकट आल्यासारखे लोक वागतात; मात्र मोठे दुकाने, मॉलमधून सांगेल त्या किमतीने वस्तू खरेदी करतात. शेतकरी खूप कष्ट करतात तेव्हा कुठे दोनवेळच्या खाण्याची सोय होते. शेतकºयांची परिस्थिती वाईट असते, त्याला दोन पैसे मिळावेत अशी भावना शहरी लोक ांमध्ये यायला हवी, अशी अपेक्षा एका शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा महिलेने व्यक्त केली.

कागदपत्रे नसल्याचे सांगून सवलती नाकारल्या- आमच्या घरातील कर्त्या पुरुषाने आत्महत्या केल्यानंतर अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. यातील मोजक्याच जणांनी प्रत्यक्षात मदत केली. सरकारने देखील पेन्शन देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र हे देखील त्यांनी पूर्ण केले नाही. आमच्या घरात वीज नाही, बँका कर्ज देत नाहीत, सरकारी सवलत मागण्यास गेलो तर कागदपत्राचे नाव सांगून वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांनी केला. आम्ही अशिक्षित असल्यामुळे शासनाने सांगितलेल्या कागदपत्रांची पूर्तता आम्हाला करता येत नाही. याचा विचार करुन शासनाने फक्त आधारकार्डावरच सोईसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी विनंती यावेळी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांनी केली.

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीSuicideआत्महत्याagricultureशेती