शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

क्या बात हैं... द्राक्ष निर्यातीसाठी राज्यातील ४३ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 17:49 IST

गुणवत्तापूर्व द्राक्ष निर्मितीकडे कल वाढला, युवकांच्या सहभागाने संधी

सोलापूर : थंडी कमी झाल्यानंतर उन्हाचा कडाका सुरू होईल व निर्यातीला चालना मिळेल, या अपेक्षेने राज्यातील ४३ हजार शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. दोन वर्षांच्या कोरोनाच्या प्रभावात युवक शेतकरीही द्राक्ष शेतीला जोडले असले तरी विक्रीसाठी देशभरात नेटवर्क तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या द्राक्ष निर्यातीला म्हणावा तितका वेग आला नसला तरी गुणवत्तेचा माल तयार करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.

महाराष्ट्रातून विशेषतः नाशिक, सांगली, पुणे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, सातारा या जिल्ह्यांत निर्यातक्षम गुणवत्तेची द्राक्षं तयार केली जातात. यामध्ये नाशिक जिल्हा आघाडीवर आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यातून ३५ हजार शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. नाशिक जिल्ह्यातील ६ हजार, पुणे जिल्ह्यातील १३००, अहमदनगर जिल्ह्यातील ९५०, सोलापूर जिल्ह्यातील ७००, उस्मानाबाद जिल्ह्यातील ६००, सातारा जिल्ह्यातील ५०० व लातूर जिल्ह्यातून १५० शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे.

कोरोनाच्या प्रभावानंतर तरुणवर्ग द्राक्ष शेतीला जोडला असल्याने निर्यातक्षम द्राक्ष तयार करण्यासाठी कल वाढला असल्याचे सांगण्यात आले. सध्याचा थंडीचा कालावधी कमी झाल्यानंतर ग्राहकांकडून द्राक्षाची मागणी वाढेल असे सांगण्यात आले. सोलापूर जिल्ह्यात मागील वर्षी ५०० तर यावर्षी ७०० शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे.

शेतकऱ्यांनी नोंदणी

  • २०१८-१९ मध्ये ३५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली; मात्र १२ हजार शेतकऱ्यांची एक लाख ९५ हजार मे. टन, १९-२० मध्ये ३८ शेतकऱ्यांची नोंदणी व दोन लाख १० हजार मे. टन, २०-२१ मध्ये ४५ हजार शेतकऱ्यांची नोंदणी व १३०० शेतकऱ्यांची दोन लाख ४६ हजार मे. टन द्राक्ष निर्यात झाली होती.
  • * देशभरात द्राक्षाला ग्राहक आहे; पण तरुण शेतकऱ्यांना द्राक्ष विक्रीसाठी ‘नेटवर्क’ तयार करण्यास पाहिजे तेवढे यश येईल. गुणवत्ता, ग्रेडिंग, पॅकिंग चांगली केली तर इतर राज्यांत मार्केटिंगची अडचण नसल्याचे जाणकारांनी सांगितले.
  • * निर्यातीतून राज्यात दरवर्षी २२०० ते २३०० कोटी रुपये मिळतात, असे निर्यात सल्लागार गोविंद हांडे यांनी सांगितले.

 

निर्यातीच्या निमित्ताने गुणवत्तेची द्राक्षं तयार होतील, निर्यात नाही झाली तरी विविध राज्यांत शेतकऱ्यांनी थेट दलाल विरहित द्राक्ष बाजार शोधला पाहिजे. किमान आधारभूत किंमत ठरविण्याचा निर्णय चांगला आहे; मात्र एकीने शेतकऱ्यांनी नेटवर्क तयार केले पाहिजे.

- गोविंद हांडे, राज्य निर्यात सल्लागार

 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीMarketबाजार