शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

क्या बात हैं... द्राक्ष निर्यातीसाठी राज्यातील ४३ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 17:49 IST

गुणवत्तापूर्व द्राक्ष निर्मितीकडे कल वाढला, युवकांच्या सहभागाने संधी

सोलापूर : थंडी कमी झाल्यानंतर उन्हाचा कडाका सुरू होईल व निर्यातीला चालना मिळेल, या अपेक्षेने राज्यातील ४३ हजार शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. दोन वर्षांच्या कोरोनाच्या प्रभावात युवक शेतकरीही द्राक्ष शेतीला जोडले असले तरी विक्रीसाठी देशभरात नेटवर्क तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या द्राक्ष निर्यातीला म्हणावा तितका वेग आला नसला तरी गुणवत्तेचा माल तयार करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.

महाराष्ट्रातून विशेषतः नाशिक, सांगली, पुणे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, सातारा या जिल्ह्यांत निर्यातक्षम गुणवत्तेची द्राक्षं तयार केली जातात. यामध्ये नाशिक जिल्हा आघाडीवर आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यातून ३५ हजार शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. नाशिक जिल्ह्यातील ६ हजार, पुणे जिल्ह्यातील १३००, अहमदनगर जिल्ह्यातील ९५०, सोलापूर जिल्ह्यातील ७००, उस्मानाबाद जिल्ह्यातील ६००, सातारा जिल्ह्यातील ५०० व लातूर जिल्ह्यातून १५० शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे.

कोरोनाच्या प्रभावानंतर तरुणवर्ग द्राक्ष शेतीला जोडला असल्याने निर्यातक्षम द्राक्ष तयार करण्यासाठी कल वाढला असल्याचे सांगण्यात आले. सध्याचा थंडीचा कालावधी कमी झाल्यानंतर ग्राहकांकडून द्राक्षाची मागणी वाढेल असे सांगण्यात आले. सोलापूर जिल्ह्यात मागील वर्षी ५०० तर यावर्षी ७०० शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे.

शेतकऱ्यांनी नोंदणी

  • २०१८-१९ मध्ये ३५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली; मात्र १२ हजार शेतकऱ्यांची एक लाख ९५ हजार मे. टन, १९-२० मध्ये ३८ शेतकऱ्यांची नोंदणी व दोन लाख १० हजार मे. टन, २०-२१ मध्ये ४५ हजार शेतकऱ्यांची नोंदणी व १३०० शेतकऱ्यांची दोन लाख ४६ हजार मे. टन द्राक्ष निर्यात झाली होती.
  • * देशभरात द्राक्षाला ग्राहक आहे; पण तरुण शेतकऱ्यांना द्राक्ष विक्रीसाठी ‘नेटवर्क’ तयार करण्यास पाहिजे तेवढे यश येईल. गुणवत्ता, ग्रेडिंग, पॅकिंग चांगली केली तर इतर राज्यांत मार्केटिंगची अडचण नसल्याचे जाणकारांनी सांगितले.
  • * निर्यातीतून राज्यात दरवर्षी २२०० ते २३०० कोटी रुपये मिळतात, असे निर्यात सल्लागार गोविंद हांडे यांनी सांगितले.

 

निर्यातीच्या निमित्ताने गुणवत्तेची द्राक्षं तयार होतील, निर्यात नाही झाली तरी विविध राज्यांत शेतकऱ्यांनी थेट दलाल विरहित द्राक्ष बाजार शोधला पाहिजे. किमान आधारभूत किंमत ठरविण्याचा निर्णय चांगला आहे; मात्र एकीने शेतकऱ्यांनी नेटवर्क तयार केले पाहिजे.

- गोविंद हांडे, राज्य निर्यात सल्लागार

 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीMarketबाजार