शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

क्या बात हैं... द्राक्ष निर्यातीसाठी राज्यातील ४३ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 17:49 IST

गुणवत्तापूर्व द्राक्ष निर्मितीकडे कल वाढला, युवकांच्या सहभागाने संधी

सोलापूर : थंडी कमी झाल्यानंतर उन्हाचा कडाका सुरू होईल व निर्यातीला चालना मिळेल, या अपेक्षेने राज्यातील ४३ हजार शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. दोन वर्षांच्या कोरोनाच्या प्रभावात युवक शेतकरीही द्राक्ष शेतीला जोडले असले तरी विक्रीसाठी देशभरात नेटवर्क तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या द्राक्ष निर्यातीला म्हणावा तितका वेग आला नसला तरी गुणवत्तेचा माल तयार करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.

महाराष्ट्रातून विशेषतः नाशिक, सांगली, पुणे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, सातारा या जिल्ह्यांत निर्यातक्षम गुणवत्तेची द्राक्षं तयार केली जातात. यामध्ये नाशिक जिल्हा आघाडीवर आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यातून ३५ हजार शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. नाशिक जिल्ह्यातील ६ हजार, पुणे जिल्ह्यातील १३००, अहमदनगर जिल्ह्यातील ९५०, सोलापूर जिल्ह्यातील ७००, उस्मानाबाद जिल्ह्यातील ६००, सातारा जिल्ह्यातील ५०० व लातूर जिल्ह्यातून १५० शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे.

कोरोनाच्या प्रभावानंतर तरुणवर्ग द्राक्ष शेतीला जोडला असल्याने निर्यातक्षम द्राक्ष तयार करण्यासाठी कल वाढला असल्याचे सांगण्यात आले. सध्याचा थंडीचा कालावधी कमी झाल्यानंतर ग्राहकांकडून द्राक्षाची मागणी वाढेल असे सांगण्यात आले. सोलापूर जिल्ह्यात मागील वर्षी ५०० तर यावर्षी ७०० शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे.

शेतकऱ्यांनी नोंदणी

  • २०१८-१९ मध्ये ३५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली; मात्र १२ हजार शेतकऱ्यांची एक लाख ९५ हजार मे. टन, १९-२० मध्ये ३८ शेतकऱ्यांची नोंदणी व दोन लाख १० हजार मे. टन, २०-२१ मध्ये ४५ हजार शेतकऱ्यांची नोंदणी व १३०० शेतकऱ्यांची दोन लाख ४६ हजार मे. टन द्राक्ष निर्यात झाली होती.
  • * देशभरात द्राक्षाला ग्राहक आहे; पण तरुण शेतकऱ्यांना द्राक्ष विक्रीसाठी ‘नेटवर्क’ तयार करण्यास पाहिजे तेवढे यश येईल. गुणवत्ता, ग्रेडिंग, पॅकिंग चांगली केली तर इतर राज्यांत मार्केटिंगची अडचण नसल्याचे जाणकारांनी सांगितले.
  • * निर्यातीतून राज्यात दरवर्षी २२०० ते २३०० कोटी रुपये मिळतात, असे निर्यात सल्लागार गोविंद हांडे यांनी सांगितले.

 

निर्यातीच्या निमित्ताने गुणवत्तेची द्राक्षं तयार होतील, निर्यात नाही झाली तरी विविध राज्यांत शेतकऱ्यांनी थेट दलाल विरहित द्राक्ष बाजार शोधला पाहिजे. किमान आधारभूत किंमत ठरविण्याचा निर्णय चांगला आहे; मात्र एकीने शेतकऱ्यांनी नेटवर्क तयार केले पाहिजे.

- गोविंद हांडे, राज्य निर्यात सल्लागार

 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीMarketबाजार