शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

धनगर, मुस्लीम आरक्षणाचे काय झाले; सुशीलकुमार शिंदेंचा भाजपाला सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 15:30 IST

भाजपाला गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता दिलीत, तुम्हाला काय मिळाले ? असा सवाल करताना शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली.

ठळक मुद्देरात्रीत नोटाबंदी करून सर्वसामान्यांना रांगेत उभे केले. यामुळे अनेकांचा बळी गेला - सुशीलकुमार शिंदेशेतीमालाला भाव न मिळाल्याने शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या - सुशीलकुमार शिंदे कर्जमाफी नावाला दिली. शेतकºयांना फायदा झालाच नाही - सुशीलकुमार शिंदे

सोलापूर : गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता दिली तरी सोलापूरकरांना पाच दिवसाआड पाणी मिळते. भाजपाचा हाच विकास का, असा सवाल सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवारी येथे बोलताना उपस्थित केला. 

काँग्रेस आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सलगरवस्ती येथे आयोजित महिला मेळाव्यात शिंदे बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते मनोहर सपाटे, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलाताई शिंदे, शहर अध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले, गटनेते चेतन नरोटे, माजी महापौर संजय हेमगड्डी, अलका राठोड आदी उपस्थित होते. प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षा सुनीता रोटे यांनी प्रास्ताविक केले. 

यावेळी बोलताना शिंदे यांनी धनगर, मुस्लीम आरक्षण मिळाले का, असा सवाल केला. भाजपाला गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता दिलीत, तुम्हाला काय मिळाले? पाच दिवसाआड पाणी येते, हाच विकास आहे का? असा सवाल करताना शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. रात्रीत नोटाबंदी करून सर्वसामान्यांना रांगेत उभे केले. यामुळे अनेकांचा बळी गेला. शेतीमालाला भाव न मिळाल्याने शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या. कर्जमाफी नावाला दिली. शेतकºयांना फायदा झालाच नाही. बेकारीमुळे तरूणवर्ग हवालदिल आहे. खात्यावर १५ लाख जमा करतो म्हणणाºयांनी सामान्यांना काय दिले? रेशनचे धान्य बंद केले. दुष्काळ पडला तरी हाताला काम दिले जात नाही. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेNarendra Modiनरेंद्र मोदीSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाBJPभाजपाDhangar Reservationधनगर आरक्षण