शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
2
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
3
IND vs SA Turning Point Of The Match : ती एक चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
4
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
5
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
6
IND vs SA : पंचांनी चेंडू बदलून दिला, पण... KL राहुलनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?   
7
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
8
"हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे...!" जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी यांचं विधान
9
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
10
अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!
11
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
12
60% हूनही अधिक घसरला ओला इलेक्ट्रिकचा शेअर, गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ!
13
'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
14
₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
15
MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम
16
पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे शेअर बाजारात खळबळ, 'हे' शेअर्स फोकसमध्ये राहणार...
17
Team India's New Jersey For T20 World Cup 2026: रोहितनं दाखवली टीम इंडियाची नवी जर्सी; कॉलरवरील तिरंगा चर्चेत!
18
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
19
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
20
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील शेतीपंपांच्या २१८ पैकी ६० फिडर्सवर भारनियमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 13:05 IST

अधीक्षक अभियंत्यांची माहिती: विजेच्या मागणीत वाढ, निर्मितीत घट

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यात तांत्रिक, वाणिज्य असे गृहीत धरून ४० टक्के वीज गळतीसोलापूर जिल्ह्यात फक्त शेतीपंपांवरील जोडणीवर भारनियमन हे भारनियमन थोड्या काळासाठी असून, ग्राहकांनी या काळात महावितरणला सहकार्य करावे

अप्पासाहेब पाटीलसोलापूर : कोळशाचा तुटवडा, पाणी वापरावर आलेले निर्बंध यामुळे राज्यातील वीजनिर्मितीत मोठ्या प्रमाणात घट झाली़ यामुळेच महावितरण प्रशासनाला नाइलाजास्तव भारनियमन करावे लागत आहे़ सोलापूर जिल्ह्यातील शेतीपंपांच्या २१८ पैकी ६० फिडर्सवरून पहिल्या तासापेक्षा २ तास अधिकचे भारनियमन करण्यात येत असल्याची माहिती सोलापूर मंडलचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यात सोलापूर ग्रामीण, सोलापूर शहर, अकलूज, पंढरपूर, बार्शी असे पाच विभाग येतात़ या पाच विभागांतर्गत जिल्ह्यात २५४ उपविभागीय कार्यालये कार्यरत आहेत़ त्यात १३६६ फिडर्स आहेत़ त्यापैकी २१८ फिडर्स शेतीपंपांचे आहेत़ आॅक्टोबर हीटमुळे वाढलेली विजेची मागणी, कोळशाचा तुटवडा आणि पाण्याची पातळी खालावल्याने कोयना जलविद्युत प्रकल्पावर आलेली बंधने यामुळे वीजनिर्मिती आणि मागणीमध्ये पाच हजार मेगावॅटचा फरक पडला आहे. त्यामुळे सोमवारपासून सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. कोळशाचा तुटवडा व पाण्याची कमतरता जाणवत असल्याने भारनियमन करण्यात येत असल्याचे महावितरणने सांगितले़ सोलापूर जिल्ह्यातील ज्या भागात वसुली कमी आहे व वीज गळती जास्त त्या भागात प्रामुख्याने भारनियमन करण्यात येत असल्याचेही सांगितले.

शहरात भारनियमन नाही... पण

- सोलापूर शहरात महावितरणकडून कोणत्याही प्रकारचे भारनियमन करण्यात येत नाही़ मात्र ज्या भागात लाईन बंद होणे, स्मार्ट सिटीच्या कामासाठी बंद करणे, तारा तुटणे, शॉर्टसर्किटने वायर जळणे, ट्रान्स्फॉर्मर बदलणे, महावितरणकडून दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येतात आदी प्रकारांमुळे त्या त्या भागातील वीज काही काळासाठी बंद करण्यात येत असते़ त्यामुळे ग्राहकांना वाटते की, भारनियमन सुरू झाले की काय? पण शहरात कुठेही भारनियमन नसल्याचेही स्पष्टीकरण ज्ञानदेव पडळकर यांनी दिले़

सोलापूर जिल्ह्यात फक्त शेतीपंपांवरील जोडणीवर भारनियमन करण्यात येत आहे़ ज्या भागात ४० टक्के विजेची हानी आहे, जिथे वसुली कमी आहे, त्याच भागात प्रामुख्याने भारनियमन करण्यात येत आहे़ हे भारनियमन थोड्या काळासाठी असून, ग्राहकांनी या काळात महावितरणला सहकार्य करावे़- ज्ञानदेव पडळकर,अधीक्षक अभियंता, सोलापूर

वीज गळती ४० टक्क्यांवर पोहोचलीमहावितरणच्या मुख्य तारेवर आकडा टाकणे, अनधिकृत वीजजोडणी, हुक टाकणे, मीटर डायरेक्ट करणे, मीटरमध्ये पट्टी टाकणे, मीटरमध्ये छेडछाड करून चुकीचे रीडिंग दाखविणे, मीटर बंद पाडणे यांसारख्या चुका करून शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वीजचोरी होती़ सोलापूर जिल्ह्यात तांत्रिक, वाणिज्य असे गृहीत धरून ४० टक्के वीज गळती होत असल्याची माहिती महावितरणने सांगितली.

टॅग्स :SolapurसोलापूरmahavitaranमहावितरणPower Shutdownभारनियमन