शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

वजन वाढल्याने लॉकडाऊनच्या काळात वाढल्या गुडघादुखीच्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 12:45 IST

वाढलेले वजन प्रमुख कारण : गुडघ्यावर वाढला ताण

ठळक मुद्देगुडघेदुखी अधिक जाणवू लागल्यावर रुग्णांनी डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतले पाहिजेज्येष्ठ नागरिकांनी विश्रांती घ्यावी, जमिनीवर मांडी घालून किंवा पाय मुडपून बसू नये

सोलापूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मार्च महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने नागरिकांना घरातच बसावे लागले होते. या काळात वजन वाढल्यामुळे अनेकांना गुडघेदुखीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

कोरोना महामारीमुळे नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. सतत घरात बसून राहिल्याने ज्येष्ठ नागरिकांमधून तक्रारी वाढल्या आहेत. घराबाहेर पडावे तर कोरोनाची भीती होती त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना पाय मोकळे करण्याची संधीच मिळाली नाही. या कारणामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना आता गुडघेदुखीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. असे असले तरी मागील काही दिवसांपासून कोरोनामुळे अनेक आजारांकडे दुर्लक्ष झाले. कोरोना हा एकमेव आजार समोर असल्याने नागरिकांनी इतर आजारांना मनावर घेतले नाही.

लॉकडाऊनमध्ये व्यायाम करत नसले तरी खाणे पूर्वीसारखेच होते. खाण्यामुळे निर्माण झालेल्या कॅलरीज न घटल्यामुळे वजनात वाढ झाली. सांधेदुखी, गुडघेदुखीचा त्रास वाढू लागला.

वजनावर हवे नियंत्रण

वजन वाढणे हा चिंताजनक आजार आहे. वजन नियंत्रित न ठेवल्यास सांध्याची झीज लवकर होते. वयस्क लोकांना याचा अधिक त्रास होतो. गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी आदी तक्रारी वाढत जातात. वजन जास्त असणे हे आजाराचे प्रमुख कारण आहे. तसेच इतर अनेक आजारांना निमंत्रण देते. सध्या सिव्हिल हॉस्पिटलमधील अस्थिरोग विभागाच्या ओपीडीत रोज १५० ते २०० रुग्ण उपचारांसाठी येत असल्याचे डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थिरोग विभागप्रमुख डॉ. सुनील हंदराळमठ यांनी सांगितले.

गुडघादुखीची अशी घ्यावी काळजी

गुडघेदुखी अधिक जाणवू लागल्यावर रुग्णांनी डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतले पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांनी विश्रांती घ्यावी, जमिनीवर मांडी घालून किंवा पाय मुडपून बसू नये. शक्यतो खुर्चीवर बसावे, पायाचा विशिष्ट व्यायाम करावा. व्यक्तीचे वय लहान असताना अपघात होणे, संधिवात होणे, युरिक ॲसिड वाढलेले असणे, सोरायटिक ॲथ्रायटिस असणे या कारणांमुळे गुडघेदुखी होऊ शकते; पण गुडघा झिजल्यानंतर झालेली गुडघेदुखी साधारणपणे वयाच्या साठीनंतरच डोके वर काढते.

कोट

लॉकडाऊनमध्ये घरी राहिल्याने अनेकांनी व्यायाम केला नाही. त्यामुळे काही जणांचे वजन १० किलोने वाढले आहे. या वाढलेल्या वजनाचा भार हा गुडघ्यावर पडतो त्यामुळे गुडघेदुखीच्या त्रासाला सामोरे जावे लागते. आता थंडी आल्यामुळे गुडघेदुखी असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे.

 

- डॉ. सुनील हंदराळमठ, अस्थिरोगतज्ज्ञ

-------

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यMedicalवैद्यकीय