शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांसाठीची वजनकाटे भरारी पथके कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 12:52 IST

सोलापूर : साखर हंगाम सुरू होऊन ७८ दिवस उलटले तरी जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याच्या वजनकाट्याची तपासणी झालेली नाही. वजनकाटे ...

ठळक मुद्देवजनकाटे तपासणीसाठी भरारी पथकांची स्थापना २२ दिवसाखाली करण्यात आलीवजनकाटे तपासणीसाठी भरारी पथके स्थापन करण्याच्या सूचना साखर आयुक्तांनी दिल्यापथके तयार करण्याच्या सूचना लक्षात घेऊन जिल्हाधिकाºयांनी तशी २७ डिसेंबरच्या आदेशान्वये मंजुरी दिली

सोलापूर : साखर हंगाम सुरू होऊन ७८ दिवस उलटले तरी जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याच्या वजनकाट्याची तपासणी झालेली नाही. वजनकाटे तपासणीसाठी भरारी पथकांची स्थापना २२  दिवसाखाली करण्यात आली आहे. 

साखर कारखान्यांच्या वजनकाट्याबाबत शेतकरी संघटनांच्या पदाधिकाºयांकडून सातत्याने संशय व्यक्त केल्याने मागील वर्षापासून साखर कारखान्यांचे वजनकाटे तपासणीसाठी भरारी पथके स्थापन करण्याच्या सूचना साखर आयुक्तांनी दिल्या आहेत. याहीवर्षी भरारी पथके तयार करण्याच्या सूचना लक्षात घेऊन जिल्हाधिकाºयांनी तशी २७ डिसेंबरच्या आदेशान्वये मंजुरी दिली आहे. वैधमापन शास्त्र विभाग, महसूल विभाग, पोलीस कर्मचारी, प्रादेशिक सहसंचालक(साखर) व साखर कारखाना कार्यक्षेत्रातील एक शेतकरी अशी संयुक्त समिती प्रत्येक कारखान्याचा वजनकाटा तपासणी करणार आहे.  

साखर हंगाम सुरू झाल्यानंतर लागलीच या समित्या स्थापन करून कारखान्याच्या वजनकाट्याची तपासणी करणे अपेक्षित आहे; मात्र तहसीलदार पातळीवर भरारी पथकांच्या समित्याही स्थापन झालेल्या नाहीत. राज्यात एक नोव्हेंबरपासून ऊस गाळप हंगाम सुरू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील ३१ साखर कारखान्यांचे गुरुवातपर्यंत एक कोटी ९ लाख १८ मे.टन गाळप झाले आहे. या कालावधीत अवघ्या दोन कारखान्यांच्या वजनकाट्यांची तपासणी करण्यात आली आहे. गाळप हंगामाचा परतीचा प्रवास सुरू झाला तरी भरारी पथकांची तपासणी अन्य तालुक्यात सुरू झालेली नाही. 

सूचना देऊन होतेय तपासणीभरारी पथकाने कधीही व कोणत्याही साखर कारखान्याच्या वजनकाट्याची तपासणी करणे अपेक्षित आहे; मात्र तसे होत नाही. कारखाना कार्यक्षेत्रातील तहसीलदार, नायब  तहसीलदार किंवा अव्वल कारकुनावर वजनकाट्याची तपासणी करण्याची जबाबदारी सोपवितात. पोलीस खात्याचा एखादा पोलीस व सोईचा शेतकरी समितीवर घेऊन कारखाना प्रशासनाला सांगून वजनकाट्याची तपासणी मागील वर्षी केली होती. यावर्षी तपासणीच झाली नाही. 

जिल्हाधिकाºयांनी वजनमापे निरीक्षक शिवाजी बागल यांच्यावर सर्व तालुक्यातील कारखाने तपासणीची जबाबदारी दिली आहे. लेखापरीक्षक पी. आर. शिंदे यांच्यावर पंढरपूर,सांगोला व माळशिरस, एन.डी. गाढे यांच्यावर बार्शी,माढा, करमाळा व मोहोळ तर के.आर. धायफुले यांच्यावर उत्तर, दक्षिण, अक्कलकोट व मंगळवेढ्याची जबाबदारी दिली आहे.जिल्हाधिकाºयांच्या २७ डिसेंबरच्या पत्राचा संदर्भ देत सहायक नियंत्रक वैधमापन शिवाजी बागल यांनी हीच तारीख देत प्रत्येक तालुक्यासाठी निरीक्षकांची नियुक्ती आदेश काढला आहे. २७ डिसेंबर रोजी भरारी पथकांचा आदेश असला तरी २२  दिवसानंतरही तपासणीला मुहूर्त लागला नाही.

भरारी पथक हंगामात एकदाच तपासणी करते व साखर कारखानदारांना  तपासणीला येणार हे अगोदरच माहीत असते. यावर शेतकºयांनी एकत्रित येऊन वजनकाटा तयार करणे हाच मार्ग आहे. त्यासाठी प्रयत्न करु.- महामूद पटेलअध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटनाजिल्हाधिकाºयांकडून मिळालेल्या आदेशाच्या आधारे तहसीलदारांना पत्र दिले आहे. त्यांनी तालुका पातळीवर पथक तयार करावयाचे आहे. तहसीलदारांकडून अद्याप तपासणीचे निरोप नाहीत.- शिवाजी बागल,सहायक नियंत्रक,वैधमापन 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय