शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

सोलापूरात विस्कळीत पाणीपुरवठा, चार दिवसाआड येतेय पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 12:46 IST

सोलापूर : पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी बैठक घेऊन पुढील आठवड्यापासून तीन दिवसाआड पाणीपुरवठ्याचे आदेश दिल्यावर महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे रजेवर गेले आहेत. विस्कळीत पाणीपुरवठ्यात सातत्य असून, नवीन नियोजन पावसाळ्यात होण्याची चिन्हे दिसत आहेत. शहरात चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. नगरसेवकांनी त्रागा व्यक्त ...

ठळक मुद्देउजनीहून दररोज ७0 दशलक्ष लिटर पाणी शहरात येतेशहरात चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत आहेशहरात तिन्ही उद्भवातून येणाºया पाण्याची परिस्थिती वाईट

सोलापूर : पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी बैठक घेऊन पुढील आठवड्यापासून तीन दिवसाआड पाणीपुरवठ्याचे आदेश दिल्यावर महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे रजेवर गेले आहेत. विस्कळीत पाणीपुरवठ्यात सातत्य असून, नवीन नियोजन पावसाळ्यात होण्याची चिन्हे दिसत आहेत. 

शहरात चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. नगरसेवकांनी त्रागा व्यक्त करण्यास सुरुवात केल्यावर पालकमंत्री देशमुख यांनी पुढाकार घेऊन पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याचे आदेश दिले. पण त्यानंतरही शहरात तिन्ही उद्भवातून येणाºया पाण्याची परिस्थिती वाईट असल्याचे चित्र समोर येत आहे.

उजनीहून दररोज ७0 दशलक्ष लिटर पाणी शहरात येते. पाकणी जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्धीकरणानंतर हे पाणी वितरणासाठी शहराकडे पाठविले जाते. चिंचोळी एमआयडीसीला यातील साडेपाच दशलक्ष लिटर पाणी जाते. त्यानंतर केगाव, बाळे येथील टाक्यांना पाणी दिले जाते. तेथून अवंतीनगर, नेहरुनगरपर्यंतच्या टाक्या भरून पाणी वितरण केले जाते. हिप्परग्यातून पाणी कमी येत असल्याने भवानीपेठ जलशुद्धीकरण केंद्राकडे यातील १५ दसलक्ष लिटरची एक जलवाहिनी टाकण्यात आली आहे. पण या जलवाहिनीतून पाणी गिरणीला पाणी येतच नसल्याचे दिसून येत आहे. वाटेत थेट कनेक्शन देऊन हे पाणी पळविण्यात आल्यामुळे हद्दवाढ भागाला याचा मोठा फटका बसत आहे.जलशुद्धीकरण केंद्रातील व वितरणाच्या इतर टाक्या भरल्यावर टाकळी व उजनी पंपहाऊसमधील चौथा पंप दर सहा तासांनी बंद करावा लागतो. अशी स्थिती असताना पाईपलाईनमध्ये बरेच पाणी जाते असे दाखवून अशा थेट कनेक्शनला संरक्षण देण्यात येत आहे. चिंचपूर बंधाºयातील पातळी खालावल्यावर औज बंधाºयातील सर्व पाणी खाली घेण्यात आले आहे. यामुळे औज बंधाºयातून शेतीसाठी होणारा उपसा थांबला आहे. आता टाकळी इंटेकजवळ ५ जूनपर्यंत पुरेल इतपत पाणीसाठा आहे. याबाबत पाणी पुरवठा विभागाने जिल्हाधिकाºयांना कळविले आहे. पुढील आठवडाभरात पाऊस न झाल्यास औज बंधाºयातून उजनीतून पाणी सोडण्याशिवाय पर्याय नाही. अशा स्थितीत तीन दिवसाआड पाणीपुरवठा केल्यास हा कालावधी आणखी खाली येणार आहे. एकूणच पुढील आठवड्यात तीन दिवसाआडच्या गणितावर गंडांतर येण्याची चिन्हे दिसत आहेत.  टँकर घोटाळ्याबाबत पळापळ- विभागीय कार्यालय क्र. २ मधील टँकर घोटाळ्याबाबत नगरसेवक नागेश वल्याळ  यांनी संबंधित अधिकाºयांच्या लागेबांधे उघड केले आहेत. याबाबत आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांना लेखी पुरावे दिले आहेत. त्यानंतर अधिकाºयांमध्ये पळापळ सुरू झाली आहे. भवानीपेठ येथील रजिस्टर गायब झाल्याचे नगरसेवक वल्याळ यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका