शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जिल्ह्यातील ४० टँकरने पाणी पुरवठा, सर्वाधिक टंचाई माळशिरस मध्ये सुरु

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: April 6, 2024 17:19 IST

एप्रिल महिना सुरू होताच जिल्ह्यात टँकरची संख्या वाढत आहे.

बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर : एप्रिल महिना सुरू होताच जिल्ह्यात टँकरची संख्या वाढत आहे. मार्च अखेर जिल्ह्यात केवळ एक अंकी टँकर सुरू होता. एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात टँकरची संख्या चाळीसवर पोहोचली आहे. सर्वाधिक टंचाई माळशिरस तालुक्यात असून या ठिकाणी १४ गावांमध्ये चौदा टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.

माळशिरस तालुक्यानंतर सर्वाधिक पाणी टंचाई करमाळ्यात आहे. करमाळ्यात दहा टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. सांगोल्यात ७ गावात तसेच माढ्यात तीन गावात चार टँकर सुरू आहेत. मंगळवेढ्यात एका गावात तर दक्षिण सोलापूर मध्ये दोन गावात पाच टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. माळशिरस मध्ये भांब, पिंपरी, गारवाड, मगरवाडी, फडतरी, फडतरी शिवारवस्ती, फडतरी निटवेवाडी, कोथळे, बचेरी, माणकी, लोंढेमोहितेवाडी, सुळेवाडी, जळभावी, लोणंद आदी गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. तसेच माढ्यात तुळशी,बावी, कुर्डू या तीन गावात चार टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. 

करमाळ्यात घाटी, साडे, आळसुंदे, फिसरे, सालसे, निबोरे, रायगाव, देलवडी, वरकुटे आदी गावात तसेच सांगोल्यात सोनलवाडी, बागलवाडी, लक्ष्मीनगर, कटफळ, अचकदानी, चिकमहुद, चिकमहूद १ या गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरwater shortageपाणीकपात