शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ४० टँकरने पाणी पुरवठा, सर्वाधिक टंचाई माळशिरस मध्ये सुरु

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: April 6, 2024 17:19 IST

एप्रिल महिना सुरू होताच जिल्ह्यात टँकरची संख्या वाढत आहे.

बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर : एप्रिल महिना सुरू होताच जिल्ह्यात टँकरची संख्या वाढत आहे. मार्च अखेर जिल्ह्यात केवळ एक अंकी टँकर सुरू होता. एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात टँकरची संख्या चाळीसवर पोहोचली आहे. सर्वाधिक टंचाई माळशिरस तालुक्यात असून या ठिकाणी १४ गावांमध्ये चौदा टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.

माळशिरस तालुक्यानंतर सर्वाधिक पाणी टंचाई करमाळ्यात आहे. करमाळ्यात दहा टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. सांगोल्यात ७ गावात तसेच माढ्यात तीन गावात चार टँकर सुरू आहेत. मंगळवेढ्यात एका गावात तर दक्षिण सोलापूर मध्ये दोन गावात पाच टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. माळशिरस मध्ये भांब, पिंपरी, गारवाड, मगरवाडी, फडतरी, फडतरी शिवारवस्ती, फडतरी निटवेवाडी, कोथळे, बचेरी, माणकी, लोंढेमोहितेवाडी, सुळेवाडी, जळभावी, लोणंद आदी गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. तसेच माढ्यात तुळशी,बावी, कुर्डू या तीन गावात चार टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. 

करमाळ्यात घाटी, साडे, आळसुंदे, फिसरे, सालसे, निबोरे, रायगाव, देलवडी, वरकुटे आदी गावात तसेच सांगोल्यात सोनलवाडी, बागलवाडी, लक्ष्मीनगर, कटफळ, अचकदानी, चिकमहुद, चिकमहूद १ या गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरwater shortageपाणीकपात