शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

मोडनिंबचा पाणीपुरवठा पाच दिवसांपासून बंद; नागरिकांचे हाल सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 11:46 IST

मोडनिंब : गावातील नळयोजनेद्वारे होणारा पाणीपुरवठा पाच दिवसांपासून बंद आहे. येवती तलावातील पाणीपातळी खालावल्याने नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत.  ...

ठळक मुद्देमोडनिंब पाणीपुरवठ्यासाठी चार जलकुंभ असून, यामधून एक दिवसाआड नळाद्वारे पाणीपुरवठाविहिरीतील पाणी पाईपलाईनद्वारे मोडनिंबजवळील जलशुध्दीकरण केंद्रात सोडले येवती तलावातील पाणीपातळी खालावल्याने नागरिकांचे हाल सुरू

मोडनिंब : गावातील नळयोजनेद्वारे होणारा पाणीपुरवठा पाच दिवसांपासून बंद आहे. येवती तलावातील पाणीपातळी खालावल्याने नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. 

याबाबत सविस्तर असे, मोहोळ तालुक्यातील येवती तलावातून मोडनिंब, माढा, आष्टी, रोपळे, शेटफळ यासह अन्य गावांना पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र सध्या येवती तलावातून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने व नळपाणीपुरवठा बंद असल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

मोडनिंब पाणीपुरवठ्यासाठी चार जलकुंभ असून, यामधून एक दिवसाआड नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र पंधरा दिवसांपासून येवती तलावातील पाणीपातळी खालावल्याने मोडनिंब गावाला पाणीपुरवठा करणाºया विहिरीत तलावाजवळील विद्युतपंपाच्या साह्याने पाणी टाकले जाते व ते विहिरीतील पाणी पाईपलाईनद्वारे मोडनिंबजवळील जलशुध्दीकरण केंद्रात सोडले जाते. तेथून गावातील जलकुंभात सोडले जाते.

या धरणात पाटबंधारे खाते पाणी कधी सोडणार, याबाबत कार्यकारी अभियंता नारायण जोशी यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अनेकदा प्रयत्नही करून फोन घेतला नाही. याबाबत मोडनिंबचे सरपंच जयसिंग म्हणाले, पाणी संपुष्टात आल्याने गढूळ व गाळमिश्रित पाणी व तेही अपुरे यामुळे पाणीपुरवठा बंद आहे. येवती तलावात पाणी सोडावे, यासाठी १४ मार्चपासून येवती तलावालगतच आमरण उपोषणास बसणार असून, याबाबत संबंधित खात्यास कळविले असल्याचे सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणीdroughtदुष्काळwater transportजलवाहतूक