शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

खंडित वीजपुरवठ्यामुळे मंगळवेढ्यावर जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 10:28 IST

शहरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येत आल्याने संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देनगरपालिका पाणीपुरवठा विभागाने खंडित वीज पुरवठ्यामुळे शहरावर जलसंकट ओढत असल्याचे सांगितले.सोलापूर शहराला उजनीतून सोडलेल्या पाण्यामुळे सध्या हा बंधारा पाण्याने भरून घेतला आहे.या बंधाºयात मुबलक पाणी असतानाही मंगळवेढा शहराला सुरळीत पाणीपुरवठा होत नाही.  

मंगळवेढा : शहराला पाणीपुरवठा करणारा उचेठाण को. प. बंधारा फुल्ल भरला असतानाही शहरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येत आल्याने संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, नगरपालिका पाणीपुरवठा विभागाने खंडित वीज पुरवठ्यामुळे शहरावर जलसंकट ओढत असल्याचे सांगितले.

शहराला उचेठाण येथील भीमा नदीवरील बंधाºयातून पाणीपुरवठा केला जातो़ सोलापूर शहराला उजनीतून सोडलेल्या पाण्यामुळे सध्या हा बंधारा पाण्याने भरून घेतला आहे. त्यामुळे या बंधाºयात मुबलक पाणी असतानाही मंगळवेढा शहराला सुरळीत पाणीपुरवठा होत नाही.  

उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सर्वत्र पाण्याची मागणी वाढली आहे. शिवाय शहरातील हातपंपाला क्षारयुक्त पाणी येत असल्याने त्याचा वापर केवळ कपडे धुण्यासाठीच केला जातो़ पाणी पुरवठ्यातील अनियमतितेबाबत नगरपालिका पाणीपुरवठा विभागाकडे संपर्क साधला असता वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे़ त्यामुळे शहरातील पाण्याच्या टाक्या भरू शकत नाहीत याचा परिणाम पाणीपुरवठा वितरणावर होत असल्याचे सांगण्यात आले. 

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उचेठाण जॅकवेल व जलशुध्दीकरण केंद्र येथे स्वतंत्र फिडर बसवण्याची मागणी नगरपालिकेने उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी पत्राद्वारे १५ एप्रिल रोजी केली आहे. शहरासाठी ३० लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या ५ टाक्या आहेत. यामध्ये नागणेवाडी येथे (जुनी) ७ लाख लिटर क्षमतेची तर नागणेवाडी येथेच नवीन ६़५० लाख लिटर क्षमतेची दुसरी टाकी बांधण्यात आली आहे. तसेच संभाजीनगर येथे ६़५० लाख लिटर क्षमतेची, सांगोला रोड येथे ६़५० लाख लिटर क्षमतेची, साठेनगर येथे ३़५०  लाख लिटर क्षमतेचे अशा ५ ठिकाणी टाक्या बांधून शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये प्रतिदिनी ३० लाख लिटर पाणी नदीपात्रातून उचलले जाते आहे. शहरामध्ये जवळपास ३३५० बिगर मीटरचे नळ कनेक्शन आहेत़ प्रति व्यक्ती, प्रतिदिनी १३५ एल. पी. सी. डी. पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या उन्हाळा पाण्याची मागणी होत आहे़ 

स्वतंत्र फिडर बसविण्याची केली मागणी- मंगळवेढा शहराला पाणीपुरवठा करणाºया जॅकवेलला सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने पाण्याच्या टाक्या भरण्यास अडचण येत आहे. परिणामी शहराला पाणीपुरवठा करण्यात विलंब होत आहे. स्वतंत्र फिडर बसविण्यासाठी वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता यांना लेखी पत्र दिले आहे. स्वतंत्र फिडर कार्यान्वित झाल्यास नित्यनियमाने शहराला पाणीपुरवठा होईल. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन नगरपालिका पाणीपुरवठा अभियंता अजय नरळे यांनी केले आहे़

मंगळवेढा नगरपालिकेकडून उचेठाण येथील जॅकवेल व जलशुध्दीकरण केंद्रास स्वतंत्र फिडर बसविण्यासाठी मागणी आली आहे़ त्यानुसार त्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. - सत्यजित आमरे, सहायक अभियंता, शहर विभाग

भीमा नदीच्या पात्रात पाणी असतानाही शहराला सुरळीत पाणीपुरवठा होत नाही़ त्यामुळे पाण्यासाठी भर उन्हात भटकंती करावी लागत आहे. शहरामध्ये हातपंपाला क्षारयुक्त पाणी असल्यामुळे ते पिण्यायोग्य नाही़ परिणामी पिण्याचे पाणी कोठून आणायचे असा प्रश्न आहे. - शिवाजी माळी,नागरिक 

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळwater shortageपाणीटंचाईmahavitaranमहावितरण