शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उजनी धरणाची पाणीपातळी खालावली; धरणात उरलं फक्त उणे ३५ टक्के पाणीसाठा

By appasaheb.patil | Updated: March 26, 2024 13:42 IST

सध्या सोलापूरच्या उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. 

आप्पासाहेब पाटील, सोलापूर: यंदा उन्हाळ्यात सोलापूरला पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वाढत्या उन्हामुळे सोलापुरात पाण्याची कमतरता भासत आहे. सोलापुरातील नागरिकांना पाच ते सहा दिवसाआड पाण्याचा पुरवठा हाेत आहे. सध्या उजनी धरणात मायनस ३५.६६ टक्के पाणीसाठा शिल्लक उरला आहे. मागील उजनी धरणातील पाणीपातळी याच काळात ४०. ७४ टक्के एवढी होती. 

दरम्यान, सध्या सोलापूरच्या उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. सोलापूर जिल्ह्यात असलेल्या सर्व धरणातील पाणीसाठा काही टक्केच शिल्लक राहिला आहे. सोलापूरला पाणीपुरवठा करणारा औज बंधारा सध्या भरला आहे, हिप्परगा तलावात ४० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. याशिवाय एकरूख प्रकल्पात २३.२८ टक्के, हिंगणी प्रकल्पात मायनस ९.९१ टक्के, जवळगांव ०.७६ टक्के, मांगी ०.०० टक्के, आष्टी ११.८३ टक्के, बोरी मायनस १.७७ टक्के तर पिंपळगांवढाळे प्रकल्पात मायनस २.८० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या सोलापूरला चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. ग्रामीण भागातही पाणीटंचाईचे चटके बसत असून २१ गावात टँकरव्दारे पाण्याचा पुरवठा हाेत असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरDamधरण